शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

पोलीस हुतात्म्यांना १ कोटी, एकविसाव्या शतकात संयम आवश्यक - राजनाथ सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 1:57 AM

देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली.

मेरठ : देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली. पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात राजनाथ सिंह बोलत होते.एकविसाव्या शतकातील पोलिसांनी क्रूरपणे वागून चालणार नाही. पोलिसांनी सभ्यपणेच वागायला हवे आणि दंगली व निदर्शनांसारख्या आव्हानात्मक स्थितीचा सामना करताना, पोलिसांनी संयम ठेवायला हवा, असे प्रतिपादन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे शनिवारी केले.केंद्र आणि राज्य अशा दोन्ही पोलीस दलांना आवाहन करताना, राजनाथ सिंग म्हणाले की, दंगली आणि निदर्शनांसारख्या परिस्थितीत गर्दीला नियंत्रित करण्यासाठीसंपूर्ण नवीन तंत्रज्ञान आणिमानसिक उपाययोजना करायला हव्यात. जात, धर्म आणि प्रादेशिकवाद या आधारे देशाला तोडू पाहणाºया शक्तींवर पोलिसांनी प्रभावी लक्ष ठेवायला हवा.राजनाथ सिंह म्हणाले की, आपण एकविसाव्या शतकात वावरताना पोलीस दलाने क्रूर असू नये. पोलिसांना सर्वांशी सभ्यपणच वागावे लागेल. सामान्यांपासून आंंदोलक असोत, संशयित असोत वा आरोपी, या सर्वांशी पोलिसांना चांगलीच वागणूक द्यायला हवी. कधी-कधी पोलिसांना कठोर व्हावे लागते, हे मी समजू शकतो. मात्र, अशा परिस्थितीतही संयम बाळगणे आवश्यक आहे.‘कमी कठोरता असलेला मार्ग शोधण्याच्या सूचना मी ‘ब्युरो आॅफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ला यापूर्वीच दिल्या आहेत,’ असेसांगून गृहमंत्री राजनाथ सिंहम्हणाले की, ‘सर्वच पोलिसांनी कमीतकमी बळाचा वापर करून अधिकाधिक परिणाम प्राप्त करायला हवा.’ (वृत्तसंस्था)राजनाथ सिंह म्हणाले की, द्रुत कृती दलाच्या सध्या १0 बटालियन कार्यरत आहेत. संवेदनशील असलेल्या १0 शहरांत त्या स्थापित आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना आता तयार गणवेश दिला जाणार नाही.त्याऐवजी १0 हजारांचा गणवेश भत्ता त्यांना दिला जाईल. सुरक्षा दलांतील १0 लाख जवानांना योग्य वेळी पदोन्नती मिळावी, यासाठी उपाय शोधण्यावर गंभीरपणे विचार केला जात आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह