शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण मंत्रालयाला १ कोटीचे दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:47 IST

समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून भारतीय वायू दलातील एका माजी कर्मचाऱ्याने निवृत्तीनंतर संरक्षण मंत्रालयाला १.०८ कोटी रुपयांची देणगी दिली.

नवी दिल्ली : समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून भारतीय वायू दलातील एका माजी कर्मचाऱ्याने निवृत्तीनंतर संरक्षण मंत्रालयाला १.०८ कोटी रुपयांची देणगी दिली. माजी एअरमन सीबीआर प्रसाद (७४) यांनी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन उपरोक्त रकमेचा धनादेश सुपूर्द केला. आजवरच्या आयुष्यात सर्व पै-पै जमवून केलेली संपूर्ण बचत त्यांनी दान केली, त्यांचे हे औदार्य पाहून मीही भारावून गेलो, असे राजनाथसिंह म्हणाले.वायू दलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर प्रसाद यांनी उदरनिर्वाह चालविण्यासाठी कुक्कुटपालन सुरू केले. त्यातून मिळणाºया कमाईतून कौटुंबिक जबाबदाºया समर्थपणे पार पाडल्या. भारतीय रेल्वेत नोकरी करण्यासाठी त्यांनी नऊ वर्षांच्या सेवेनंतर वायू दल सोडले. दुर्दैवाने रेल्वेत नोकरी मिळाली नाही. तेव्हा उदरनिर्वाहासाठी कुक्कुटपालन सुरू केले. सुदैवाने संसाराचा गाडा व्यवस्थित चालला. सर्व कौटुंबिक जबाबदाºया पार पाडता आल्या. दोन टक्के संपत्ती मुलीला आणि एक टक्के संपत्ती पत्नीला दिली.बाकी ९७ टक्के संपत्ती समाजाला दान देत आहे. माझ्या या निर्णयाला कुटुंबियांकडून कसलीही आडकाठी झाली नाही, असे प्रसाद यांनी सांगितले.आयुष्यात वाटचालीत कराव्या लागलेल्या संघर्षमय दिवसांची आठवण सांगत ते म्हणाले, ‘मी घर सोडले तेव्हा खिशात फक्त पाच रुपये होते. मेहनत करून पाचशे एकर जमीन घेतली. माझे बालपणी आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न होते; परंतु मला ते साकार करता आले नाही. भारतीय मुलांनी आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकावे म्हणून मी पाचशे एकर जमिनीत विद्यापीठासारखे क्रीडा संकुल उभारले. गेल्या वीस वर्षांपासून मी मुलांना प्रशिक्षण देत आहे.’