शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची जिल्हा परिषदेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:16 IST

नाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात शासकीय कर्मचाºयांच्या बदल्यांवरून सुरू असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने विनंती व निकड असलेल्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची तयारी सुरू केली आहे. किती कर्मचाºयांच्या बदल्या करायच्या व कोणाला प्राधान्य द्यायची याबाबत प्रशासन पदाधिकाºयांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्दे निकडीला प्राधान्य : प्रशासन करणार पदाधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात शासकीय कर्मचाºयांच्या बदल्यांवरून सुरू असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने विनंती व निकड असलेल्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची तयारी सुरू केली आहे. किती कर्मचाºयांच्या बदल्या करायच्या व कोणाला प्राधान्य द्यायची याबाबत प्रशासन पदाधिकाºयांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.राज्य शासनाने शासकीय कर्मचारी, अधिकाºयांच्या बदल्यांना १० आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली असली तरी, या संदर्भात सुरू असलेली तयारी मात्र कायम आहे. त्याचाच आधार घेत, जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वीच सर्व खातेप्रमुखांकडून बदलीपात्र व कर्मचाºयांची सेवाज्येष्ठतेच्या याद्या मागविल्या होत्या. बदल्या आॅनलाइन कराव्यात की आॅफलाइन याबाबत संभ्रम असला तरी, कोरोनाचा काळ असल्यामुळे सहजसोपी असलेली आॅफलाइनची पद्धत वापरून कर्मचाºयांच्या बदल्या करता येतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने १५ टक्के कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची अनुमती गृहीत धरून पती-पत्नी एकत्रीकरण, दिव्यांग, दुर्धर आजारी, सेवानिवृत्तीनजीक असलेल्या कर्मचाºयांनाच बदल्यांमध्ये प्राधान्य देण्याचा विचार केला जात आहे. या बदल्या करताना प्रादेशिक समतोलही राखण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. नांदगाव, बागलाण, मालेगाव या तालुक्यांमध्ये बदलून जाण्यास कर्मचारी अनुत्सुक असतात तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, दिंडोरी, नाशिक या तालुक्यांमध्ये बदली करून जाण्यास कर्मचाºयांचा ओढा अधिक आहे. त्यातच आॅफलाइन बदल्या असल्यामुळे पदाधिकारी, सदस्यांकडून त्यांच्या मर्जीतील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशावेळी बदल्या करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. अर्थात अशा बदल्या करण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यानंतरच बदल्यांचे धोरण ठरणार आहे.मंजूरपदांपैकी ४५ टक्के पदे रिक्तजिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी व पेसा क्षेत्रातील असून, सात तालुके बिगर आदिवासी आहेत. पेसा क्षेत्रात कर्मचाºयांची रिक्तपदे राहू नयेत, असे राज्यपालांचे आदेश आहेत. हे आदेश पाहता अगोदरच जिल्हा परिषदेतील एकूण मंजूर पदांपैकी ४५ टक्के पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा भार मात्र बिगर आदिवासी तालुक्यांवरच असून, आता बदल्या करण्याची वेळ आल्यास याच तालुक्यांतून पुन्हा बदल्या केल्या जातील.

टॅग्स :Transferबदलीzpजिल्हा परिषद