शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची जिल्हा परिषदेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:16 IST

नाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात शासकीय कर्मचाºयांच्या बदल्यांवरून सुरू असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने विनंती व निकड असलेल्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची तयारी सुरू केली आहे. किती कर्मचाºयांच्या बदल्या करायच्या व कोणाला प्राधान्य द्यायची याबाबत प्रशासन पदाधिकाºयांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्दे निकडीला प्राधान्य : प्रशासन करणार पदाधिकाऱ्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात शासकीय कर्मचाºयांच्या बदल्यांवरून सुरू असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषद प्रशासनाने विनंती व निकड असलेल्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची तयारी सुरू केली आहे. किती कर्मचाºयांच्या बदल्या करायच्या व कोणाला प्राधान्य द्यायची याबाबत प्रशासन पदाधिकाºयांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.राज्य शासनाने शासकीय कर्मचारी, अधिकाºयांच्या बदल्यांना १० आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली असली तरी, या संदर्भात सुरू असलेली तयारी मात्र कायम आहे. त्याचाच आधार घेत, जिल्हा परिषद प्रशासनाने यापूर्वीच सर्व खातेप्रमुखांकडून बदलीपात्र व कर्मचाºयांची सेवाज्येष्ठतेच्या याद्या मागविल्या होत्या. बदल्या आॅनलाइन कराव्यात की आॅफलाइन याबाबत संभ्रम असला तरी, कोरोनाचा काळ असल्यामुळे सहजसोपी असलेली आॅफलाइनची पद्धत वापरून कर्मचाºयांच्या बदल्या करता येतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने १५ टक्के कर्मचाºयांच्या बदल्या करण्याची अनुमती गृहीत धरून पती-पत्नी एकत्रीकरण, दिव्यांग, दुर्धर आजारी, सेवानिवृत्तीनजीक असलेल्या कर्मचाºयांनाच बदल्यांमध्ये प्राधान्य देण्याचा विचार केला जात आहे. या बदल्या करताना प्रादेशिक समतोलही राखण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. नांदगाव, बागलाण, मालेगाव या तालुक्यांमध्ये बदलून जाण्यास कर्मचारी अनुत्सुक असतात तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, दिंडोरी, नाशिक या तालुक्यांमध्ये बदली करून जाण्यास कर्मचाºयांचा ओढा अधिक आहे. त्यातच आॅफलाइन बदल्या असल्यामुळे पदाधिकारी, सदस्यांकडून त्यांच्या मर्जीतील कर्मचाºयांच्या बदल्यांसाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशावेळी बदल्या करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. अर्थात अशा बदल्या करण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यानंतरच बदल्यांचे धोरण ठरणार आहे.मंजूरपदांपैकी ४५ टक्के पदे रिक्तजिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी व पेसा क्षेत्रातील असून, सात तालुके बिगर आदिवासी आहेत. पेसा क्षेत्रात कर्मचाºयांची रिक्तपदे राहू नयेत, असे राज्यपालांचे आदेश आहेत. हे आदेश पाहता अगोदरच जिल्हा परिषदेतील एकूण मंजूर पदांपैकी ४५ टक्के पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा भार मात्र बिगर आदिवासी तालुक्यांवरच असून, आता बदल्या करण्याची वेळ आल्यास याच तालुक्यांतून पुन्हा बदल्या केल्या जातील.

टॅग्स :Transferबदलीzpजिल्हा परिषद