शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषद संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:42 IST

शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.

ठळक मुद्देशीतल सांगळे : उपाययोजना करण्याचे दिले आदेश

नाशिक : शासनाने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक गावाला पाणी पुरविण्याची जबाबदारी आपली असून, पाणीटंचाईबाबत संवेदनशील राहून उपाययोजना करण्याचे तसेच चारा टंचाईचा अहवाल तत्काळ तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले.पाणीटंचाईबाबत मंगळवारी येवला येथे पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रांताधिकारी दराडे, तहसीलदार वारोळे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी शीतल सांगळे यांनी पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी करून याबाबतचे सर्व गावांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. सुरुवातीला तालुक्यातील पाणीटंचाईबाबत चर्चा करण्यात आली. डॉ. गिते यांनी विंधन विहिरींचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे तसेच याकामी हलगर्जीपणा केल्यास ग्रामसेवकास जबाबदार धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ३८ गाव पाणीपुरवठा योजना, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, चाराटंचाई आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या २१ टँकर सुरू असून, त्याद्वारे ३६ गाव व २६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आणखीही टँकर लागणार असतील तर त्याचे प्रस्ताव तयार ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.अंदरसूल येथील पाणीपुरवठा योजनेबाबत मार्गदर्शन करताना डॉ.गिते यांनी या योजनेच्या पाइपलाइनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.बैठकीस पंचायत समिती सभापती नम्रता जगताप, उपसभापती रूपचंद भागवत, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, पंचायत समिती सदस्य कांतीलाल साळवे, भूजल विकास यंत्रणेचे बेडवाल, संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे यांच्यासह ग्रामसेवक, तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई