शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

श्रमदानातुन युवकांनी केली इतिहासकालीन बारवची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:28 IST

कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे.

ठळक मुद्देदिवस भर श्रमदानातुन या विहीरीचे रूपडे पालटवले.

कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे.बागलाण तालुक्यापासुन १३ किमी अंतरावर असलेल्या वरदर शिवारात राणी आहिल्याबाई होळकर कालीन बऱ्याच विहीरींची कामे झाली आहेत. जनतेला पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी या विहीरींची निर्मिती करण्यात आली होती.विहीरींचे बांधकाम दगडांमध्ये असून पाणी भरण्यासाठी या बारवमध्ये उतरण्याकरीता पायऱ्यांची सोय करण्यात आली होती, पण काळाच्या ओघात हया इतिहास कालीन वास्तुंकडे, विहीरींकडे शासनाबरोबरच जनतेचा ही कानाडोळा होत गेला. दुर्लक्षीत झालेल्या या विहींरीची बºयाच भागात मरणप्राय अवस्था झाली आहे.येथील वरदर शिवारातील विहीर देखील याला अपवाद नव्हती. संपूर्ण विहीर झाडाझुडपांनी व गवताने वेढली गेली होती. जवळ गेल्या नंतर सुध्दा येथे इतिहास कालीन विहीर असेल असे वाटत नव्हते. कंधाणेतील युवकांनी एकत्र येत या इतिहास कालीन विहीरीच्या पुर्नजीवन करण्याची संकल्पना मांडली, आणि सदर युवकांबरोबरच पालकांनी ही हातात कुºहाडी, कुदळ, पावडे, टोपली घेत तरूणांच्या खांदयाला खांदा लावुन दिवस भर श्रमदानातुन या विहीरीचे रूपडे पालटवले आहे.शेतीकामातुन वेळ मिळेल तेव्हा हया विहीरींचे काम हाती घेवुन हया ऐतिहासिक वारसाचे संगोपण करण्याचा संकल्प हया तरूणांनी केला आहे. श्रमदानात शांताराम बिरारी, हिरामन मांडवडे, समाधान बिरारी, संदीप बिरारी, जगन मांडवडे, गिरीश मांडवडे, निशांत बिरारी, नितिन सूर्यवंशी, हयांनी सहभाग घेतला.१) मित्रांनी एकत्र येत श्रमदानातुन या विहीरीची स्वच्छता केली आह.े बºयाच दिवसांपासुन पडीत असल्याने विहीर मातीने बुजली गेली आहे. शेतीकामातुन वेळ मिळेल तेव्हा आम्ही स्वच्छता करणार आहोत.संदीप बिरारी, कंधाणे.२) या भागात होळकर काळात जनतेच्या सेवेसाठी बºयाच विहींरीची निर्मिती करण्यात आल्याची नोंद आहे. पण काळाच्या ओघात दुर्लक्षीत या विहीरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक भागातील तरूणांनी श्रमदानातुन हा ठेवा जिंवत ठेवावा, असे वाटते.डॉ. अभिमन बिरारी, प्राध्यापक, इतिहास संशोधक, कंधाणे.