शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

श्रमदानातुन युवकांनी केली इतिहासकालीन बारवची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:28 IST

कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे.

ठळक मुद्देदिवस भर श्रमदानातुन या विहीरीचे रूपडे पालटवले.

कंधाणे : ता. बागलाण कंधाणेच्या युवकांनी श्रमदानातुन येथील वरदर वस्तीतील होळकर कालीन बारवची स्वच्छता केली. दहा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दिवस भर हया विहीरीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन या इतिहास कालीन बारवला नववैभव प्राप्त करून दिले आहे.बागलाण तालुक्यापासुन १३ किमी अंतरावर असलेल्या वरदर शिवारात राणी आहिल्याबाई होळकर कालीन बऱ्याच विहीरींची कामे झाली आहेत. जनतेला पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी या विहीरींची निर्मिती करण्यात आली होती.विहीरींचे बांधकाम दगडांमध्ये असून पाणी भरण्यासाठी या बारवमध्ये उतरण्याकरीता पायऱ्यांची सोय करण्यात आली होती, पण काळाच्या ओघात हया इतिहास कालीन वास्तुंकडे, विहीरींकडे शासनाबरोबरच जनतेचा ही कानाडोळा होत गेला. दुर्लक्षीत झालेल्या या विहींरीची बºयाच भागात मरणप्राय अवस्था झाली आहे.येथील वरदर शिवारातील विहीर देखील याला अपवाद नव्हती. संपूर्ण विहीर झाडाझुडपांनी व गवताने वेढली गेली होती. जवळ गेल्या नंतर सुध्दा येथे इतिहास कालीन विहीर असेल असे वाटत नव्हते. कंधाणेतील युवकांनी एकत्र येत या इतिहास कालीन विहीरीच्या पुर्नजीवन करण्याची संकल्पना मांडली, आणि सदर युवकांबरोबरच पालकांनी ही हातात कुºहाडी, कुदळ, पावडे, टोपली घेत तरूणांच्या खांदयाला खांदा लावुन दिवस भर श्रमदानातुन या विहीरीचे रूपडे पालटवले आहे.शेतीकामातुन वेळ मिळेल तेव्हा हया विहीरींचे काम हाती घेवुन हया ऐतिहासिक वारसाचे संगोपण करण्याचा संकल्प हया तरूणांनी केला आहे. श्रमदानात शांताराम बिरारी, हिरामन मांडवडे, समाधान बिरारी, संदीप बिरारी, जगन मांडवडे, गिरीश मांडवडे, निशांत बिरारी, नितिन सूर्यवंशी, हयांनी सहभाग घेतला.१) मित्रांनी एकत्र येत श्रमदानातुन या विहीरीची स्वच्छता केली आह.े बºयाच दिवसांपासुन पडीत असल्याने विहीर मातीने बुजली गेली आहे. शेतीकामातुन वेळ मिळेल तेव्हा आम्ही स्वच्छता करणार आहोत.संदीप बिरारी, कंधाणे.२) या भागात होळकर काळात जनतेच्या सेवेसाठी बºयाच विहींरीची निर्मिती करण्यात आल्याची नोंद आहे. पण काळाच्या ओघात दुर्लक्षीत या विहीरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक भागातील तरूणांनी श्रमदानातुन हा ठेवा जिंवत ठेवावा, असे वाटते.डॉ. अभिमन बिरारी, प्राध्यापक, इतिहास संशोधक, कंधाणे.