शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

युवकांनी केला गावाचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:28 IST

मविप्र समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, सीएमसी विद्यालय, कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी विद्यालय यांचा संयुक्त राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मातोरी : मविप्र समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, सीएमसी विद्यालय, कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी विद्यालय यांचा संयुक्त राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मातोरी व दरी गावातील परिसराची निवड करण्यात आली होती. त्यानुसार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गावाचे पूर्ण रूपडे या विद्यार्थ्यांनी बदलवून दाखवले. प्राथमिक आरोग्य रुग्णालय परिसरात आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते.या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण साफसफाई केली. गावातील गल्लीबोळात स्वच्छ करत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याविषयी माहिती दिली. दरी गावात ही केलेली साफसफाई प्रशंसनीय ठरली. ग्रामदैवत दरी आई माता परिसर येथे मागील पावसात दरड कोसळल्याने पायरी वर मोठ्या प्रमाणात पाडलेली दगडे दोन दिवस काम करत भाविकांचा मार्ग मोकळा केला. यामुळे भाविकांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास याविषयी गावातील मंदिरात मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांनी विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी उदय चौधरी, सुनील वारुंगसे, युवराज चौधरी, एस. पी. कमानकर, व्ही. एस. क्षीरसागर, आर. एस. सोनवणे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.श्रमदानराष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गावात मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उच्च माध्यमिक विद्यालयातील युवक युवतींनी श्रमदानातून मातोरी व दरी गावाचा कायापालट केला. तसेच पाणी व्यवस्थापनाचे नियोजन केल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, तर विद्यार्थिनींनी बेटी बचाव याबाबत चौक चौकांत पथ नाट्याद्वारे जनजागृती करत गावातून फेरी काढली. या मोहिमेमुळे गावातील महिला व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालेली आहे.जनजागृती फेरीदरी, मातोरी गावाच्या परिसरात विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाव’ याबाबत चौक चौकांत पथ नात्याद्वारे जनजागृती केली. याविषयी महिलांनी या कार्यक्र मात सहभागी होत गावातून फेरी काढली, कामाची माहिती मविप्र नीलिमा पवार यांनी स्वत: पाहणी केली. यावेळी वन विभागाने लागवड केलेल्या पंधरा हजार वृक्षांची मशागत वाफे करणे आदी कामे करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक