विवेक घळसासी : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीपंचवटी : आजच्या तरुणपिढीने एकत्र येऊन नवीन राष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.नवीन आडगाव नाक्यावरील स्वामीनारायणनगर येथील सावरकर स्मारकात युवक मित्रमंडळातर्फे घळसासी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी घळसासी बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीकांत बेणी होते. यावेळी बोलताना घळसासी पुढे म्हणाले की, नवीन राष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी राष्ट्र, हिंदुत्व आणि तंत्रज्ञान या गोष्टींशी निगडित राहावे. प्रयत्नवादी राहिले तर यश आपलेच आहे. स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता स्त्रियांना समान दर्जा दिला पाहिजे. आजच्या पंतप्रधानांनी राष्ट्र, हिंदुत्व व तंत्रज्ञान या विषयावर निगडित राहून परिवर्तन घडविले, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनपटावर माहिती दिली. यावेळी उपमहापौर सतीश कुलकर्णी, लक्ष्मण सावजी, विजय साने, बाळासाहेब सानप, सभापती शालिनी पवार, ज्योती गांगुर्डे, पुष्पा शर्मा आदि उपस्थित होते. प्रास्ताविक सोमनाथ बोडके यांनी, तर आभार श्याम पिंपरकर यांनी मानले.
युवकांनी नवीन राष्ट्र घडवावे
By admin | Updated: May 29, 2014 00:54 IST