शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तुसाच्या काळ्या राखेमुळे वाढते प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:26 IST

नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.चारसूत्री भातलागवड पद्धतीच्या पहिल्या टप्प्यात तूस व पेंढा यातील सिलिकॉन व पालाश अन्नद्रव्याचा फेरवापर करतात. यात भाताच्या तुसाची काळसर रंगाची राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी गादी रोपवाफ्यात प्रत्येक चौरस मीटरला अर्धा ते एक किलो एका गुंठ्याला ७० ते १०० किलो या प्रमाणात ४ ते १० से.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर भाताचे बी शक्यतो ओळीत पेरून रोप तयार करावे, असे ते म्हणाले.तुसाच्या काळसर राखेत जवळ जवळ ३० ते ३५ टक्के सिलिकॉन असते. तुसाच्या राखेमुळे भाताच्या रोपांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. रोप निरोगी व कणखर होतात. खोडकिड व पानावरील करपा रोगास पीक प्रतिकार करू शकते. यामुळे भाताचे व पेंढ्यांचे उत्पादन वाढते. काळ्या राखेबरोबरच भाताचा न भिजलेला पेंढा नांगरणीच्या वेळी चिखलणी अगोदर हेक्टरी दोन टन या प्रमाणात शेतात पसरावा, नंतर भातखाचरात नांगरठीने गाडावा. त्यामुळे हेक्टरी सुमारे २० ते ३० किलो पालाश व ६० ते ११० किलो सिलिकॉन पुरवठा होऊ शकतो. पालाश हा अन्नघटक पिकात कीड व रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करते. अन्नद्रव्याच्या पुरवठ्या सोबतच सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, असे ते म्हणाले.---------------गिरिपुष्प वनस्पती बहुवार्षिकदुसºया टप्प्यात गिरिपुष्प या झाडाच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करणे. गिरिपुष्पाचा हेक्टरी २० ते ३० क्विंटल म्हणजे हेक्टरी तीन टन हिरवा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावा. त्यापासून हेक्टरी १२ ते १५ किलो नत्र पिकाला उपलब्ध होते. याबरोबरच गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब राहतात. जमीन सुपीक व टिकाऊ होते. गिरिपुष्प ही वनस्पती बहुवार्षिक आहे. दरवर्षी झाडे लावण्याची गरज नसते, असे माजी कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक