शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
2
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
3
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
4
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
5
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
6
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
7
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
8
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
9
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
10
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
11
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
12
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
13
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
14
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
15
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
16
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
17
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
18
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
19
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
20
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती

तुसाच्या काळ्या राखेमुळे वाढते प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:26 IST

नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.चारसूत्री भातलागवड पद्धतीच्या पहिल्या टप्प्यात तूस व पेंढा यातील सिलिकॉन व पालाश अन्नद्रव्याचा फेरवापर करतात. यात भाताच्या तुसाची काळसर रंगाची राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी गादी रोपवाफ्यात प्रत्येक चौरस मीटरला अर्धा ते एक किलो एका गुंठ्याला ७० ते १०० किलो या प्रमाणात ४ ते १० से.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर भाताचे बी शक्यतो ओळीत पेरून रोप तयार करावे, असे ते म्हणाले.तुसाच्या काळसर राखेत जवळ जवळ ३० ते ३५ टक्के सिलिकॉन असते. तुसाच्या राखेमुळे भाताच्या रोपांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. रोप निरोगी व कणखर होतात. खोडकिड व पानावरील करपा रोगास पीक प्रतिकार करू शकते. यामुळे भाताचे व पेंढ्यांचे उत्पादन वाढते. काळ्या राखेबरोबरच भाताचा न भिजलेला पेंढा नांगरणीच्या वेळी चिखलणी अगोदर हेक्टरी दोन टन या प्रमाणात शेतात पसरावा, नंतर भातखाचरात नांगरठीने गाडावा. त्यामुळे हेक्टरी सुमारे २० ते ३० किलो पालाश व ६० ते ११० किलो सिलिकॉन पुरवठा होऊ शकतो. पालाश हा अन्नघटक पिकात कीड व रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करते. अन्नद्रव्याच्या पुरवठ्या सोबतच सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, असे ते म्हणाले.---------------गिरिपुष्प वनस्पती बहुवार्षिकदुसºया टप्प्यात गिरिपुष्प या झाडाच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करणे. गिरिपुष्पाचा हेक्टरी २० ते ३० क्विंटल म्हणजे हेक्टरी तीन टन हिरवा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावा. त्यापासून हेक्टरी १२ ते १५ किलो नत्र पिकाला उपलब्ध होते. याबरोबरच गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब राहतात. जमीन सुपीक व टिकाऊ होते. गिरिपुष्प ही वनस्पती बहुवार्षिक आहे. दरवर्षी झाडे लावण्याची गरज नसते, असे माजी कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक