शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

तुसाच्या काळ्या राखेमुळे वाढते प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:26 IST

नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.चारसूत्री भातलागवड पद्धतीच्या पहिल्या टप्प्यात तूस व पेंढा यातील सिलिकॉन व पालाश अन्नद्रव्याचा फेरवापर करतात. यात भाताच्या तुसाची काळसर रंगाची राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी गादी रोपवाफ्यात प्रत्येक चौरस मीटरला अर्धा ते एक किलो एका गुंठ्याला ७० ते १०० किलो या प्रमाणात ४ ते १० से.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर भाताचे बी शक्यतो ओळीत पेरून रोप तयार करावे, असे ते म्हणाले.तुसाच्या काळसर राखेत जवळ जवळ ३० ते ३५ टक्के सिलिकॉन असते. तुसाच्या राखेमुळे भाताच्या रोपांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. रोप निरोगी व कणखर होतात. खोडकिड व पानावरील करपा रोगास पीक प्रतिकार करू शकते. यामुळे भाताचे व पेंढ्यांचे उत्पादन वाढते. काळ्या राखेबरोबरच भाताचा न भिजलेला पेंढा नांगरणीच्या वेळी चिखलणी अगोदर हेक्टरी दोन टन या प्रमाणात शेतात पसरावा, नंतर भातखाचरात नांगरठीने गाडावा. त्यामुळे हेक्टरी सुमारे २० ते ३० किलो पालाश व ६० ते ११० किलो सिलिकॉन पुरवठा होऊ शकतो. पालाश हा अन्नघटक पिकात कीड व रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करते. अन्नद्रव्याच्या पुरवठ्या सोबतच सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, असे ते म्हणाले.---------------गिरिपुष्प वनस्पती बहुवार्षिकदुसºया टप्प्यात गिरिपुष्प या झाडाच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करणे. गिरिपुष्पाचा हेक्टरी २० ते ३० क्विंटल म्हणजे हेक्टरी तीन टन हिरवा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावा. त्यापासून हेक्टरी १२ ते १५ किलो नत्र पिकाला उपलब्ध होते. याबरोबरच गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब राहतात. जमीन सुपीक व टिकाऊ होते. गिरिपुष्प ही वनस्पती बहुवार्षिक आहे. दरवर्षी झाडे लावण्याची गरज नसते, असे माजी कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक