शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

तुसाच्या काळ्या राखेमुळे वाढते प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:26 IST

नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : शेतीच्या उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादकता वाढविल्याशिवाय आजची शेती किफायतशीर होणार नाही. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल, अशी साधी कमी भांडवलाची आणि आर्थिक उत्पन्न देणारी सुधारित चारसूत्री भात शेतीपद्धतीची गरज असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.चारसूत्री भातलागवड पद्धतीच्या पहिल्या टप्प्यात तूस व पेंढा यातील सिलिकॉन व पालाश अन्नद्रव्याचा फेरवापर करतात. यात भाताच्या तुसाची काळसर रंगाची राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी गादी रोपवाफ्यात प्रत्येक चौरस मीटरला अर्धा ते एक किलो एका गुंठ्याला ७० ते १०० किलो या प्रमाणात ४ ते १० से.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर भाताचे बी शक्यतो ओळीत पेरून रोप तयार करावे, असे ते म्हणाले.तुसाच्या काळसर राखेत जवळ जवळ ३० ते ३५ टक्के सिलिकॉन असते. तुसाच्या राखेमुळे भाताच्या रोपांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. रोप निरोगी व कणखर होतात. खोडकिड व पानावरील करपा रोगास पीक प्रतिकार करू शकते. यामुळे भाताचे व पेंढ्यांचे उत्पादन वाढते. काळ्या राखेबरोबरच भाताचा न भिजलेला पेंढा नांगरणीच्या वेळी चिखलणी अगोदर हेक्टरी दोन टन या प्रमाणात शेतात पसरावा, नंतर भातखाचरात नांगरठीने गाडावा. त्यामुळे हेक्टरी सुमारे २० ते ३० किलो पालाश व ६० ते ११० किलो सिलिकॉन पुरवठा होऊ शकतो. पालाश हा अन्नघटक पिकात कीड व रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करते. अन्नद्रव्याच्या पुरवठ्या सोबतच सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते, असे ते म्हणाले.---------------गिरिपुष्प वनस्पती बहुवार्षिकदुसºया टप्प्यात गिरिपुष्प या झाडाच्या हिरव्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करणे. गिरिपुष्पाचा हेक्टरी २० ते ३० क्विंटल म्हणजे हेक्टरी तीन टन हिरवा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावा. त्यापासून हेक्टरी १२ ते १५ किलो नत्र पिकाला उपलब्ध होते. याबरोबरच गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब राहतात. जमीन सुपीक व टिकाऊ होते. गिरिपुष्प ही वनस्पती बहुवार्षिक आहे. दरवर्षी झाडे लावण्याची गरज नसते, असे माजी कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक