शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

‘देवराई’ला प्रतीक्षा तरुण हातांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:29 IST

नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लागवड झाली. तीन वर्षांत रोपांचीही चांगली वाढ झाली असून, किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिककरांना रोपांच्या संवर्धनाची काळजी घ्यावीच लागणार आहे. मार्चचा अखेरचा आठवडा सुरू असून, सूर्य तळपू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे.

नाशिक : नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लागवड झाली. तीन वर्षांत रोपांचीही चांगली वाढ झाली असून, किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिककरांना रोपांच्या संवर्धनाची काळजी घ्यावीच लागणार आहे. मार्चचा अखेरचा आठवडा सुरू असून, सूर्य तळपू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. देवराईला तरुण हातांची प्रतीक्षा कायम असून, दर रविवारी तरुणाईने देवराईकडे पाऊ ल वळवून हरित नाशिकसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न क रणे आवश्यक आहे. वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेने संयुक्तरीत्या ३४ महिन्यांपूर्वी वनमहोत्सव राबविला. या वनमहोत्सवाला नाशिककरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादामुळे दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होऊन एक हजार अतिरिक्त रोपे लावण्यात आली. नाशिककरांनी एकाच दिवशी ११ हजार रोपांची लागवड यशस्वीपणे करून दाखविल्याने हा ‘नाशिक पॅटर्न’ शासनाचा लक्षवेधी ठरला. ‘देवराई’निर्मितीचा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे धोरण वन मंत्रालयाने घेत ५० कोटी झाडे लागवडीचा संकल्प सोडला. आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे. वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण विभागाकडूनही आठवड्यातून एक दिवस तरी या ठिकाणी वनमजुरांना पाचारण करण्याची मागणी होत आहे.बोटावर मोजण्याइतक्या स्वयंसेवकांची धडपडबोटावर मोजण्याइतके स्वयंसेवक वीकेण्डला येथे चार ते पाच तास श्रमदान करून जगलेल्या रोपांना वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न क रत आहेत. महाविद्यालयीन तरुणांचे ग्रुप व विविध शाळा-महाविद्यालयांमधील राष्टÑीय सेवा योजना, हरित सेना, स्काउट-गाइड दलाचे विद्यार्थ्यांनी दर शनिवार, रविवारी देवराईला भेट देऊन श्रमदान के ल्यास येथील हजारो रोपांची अधिक वेगाने वाढ होण्यास मदत होईल. मार्च अंतिम टप्प्यात आला असून, पुढील दोन महिने प्रखर ऊन पडणार असून तपमानात वाढ होणार आहे. त्यामुळे आता रोपांना पाणी देण्याची गरज अधिक वाढली आहे; कारण सूर्य तळपू लागला असून, उन्हाची तीव्रता वाढत आहे.१०१ भारतीय प्रजातींची रोपेतीन वर्षांमध्ये येथे लावण्यात आलेल्या तब्बल १०१ भारतीय प्रजातींच्या रोपांची दर्जेदार वाढ होत आहे. बहुतांश रोपांचे लहान झाडांमध्ये रूपांतर झाले आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या रोपांमध्ये दुर्मीळ भारतीय प्रजातीच्या रोपांचा समावेश आहे. केवळ हरित वाळवंटाची निर्मिती होऊ वृक्ष लागवडीतून होऊ नये, हा यामागील मुख्य हेतू संस्थेने डोळ्यापुढे ठेवला आहे. नैसर्गिक जैवविविधतेला हातभार लावणाऱ्या पर्यावरणपूरक रोपांना या ठिकाणी स्थान देण्यात आले आहे.

टॅग्स :forestजंगल