शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
3
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
4
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
5
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
6
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
7
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
8
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
9
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
10
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
11
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
12
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
13
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
15
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
16
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
17
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
18
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
19
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
20
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांनी आपली ताकद ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:47 IST

नाशिक : सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्व सरपंचांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपल्यातील ताकद ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य जयंत पाटील यांनी बोलताना केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : न्याय्यहक्कांसाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन

नाशिक : सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्व सरपंचांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपल्यातील ताकद ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य जयंत पाटील यांनी बोलताना केले.लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी सरपंचांना त्यांच्या हक्कांचीजाणीव करून देताना सांगितले, लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सरपंच करीत असतो. सरपंच होणे सोपे; परंतु गाव चालविणे अवघड असते. सरपंचाला गावाचा गाडा हाकताना गावकऱ्यांचा विश्वास संपादन करावा लागतो.सरपंचांची उपेक्षाचगावकीचे-भावकीचे राजकारण सांभाळून सरपंचाला गावाची प्रगती करायची असते; परंतु ग्रामविकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सरपंचांचा अपेक्षित असा सन्मान झालेला नाही. त्याच्या प्रश्नांबाबत लोकसभा-विधानसभेत कधी आवाज उठविला जात नाही. सरपंचांच्या न्याय्यहक्कांसाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यांनाही प्रतिनिधित्व असले पाहिजे. बळ देणारा उपक्रमआपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर गावाचा विकास शक्य आहे. गावांमध्ये स्रीभू्रणहत्या, बालविवाह यांसारख्या कुप्रथांनाही पायबंद घालण्याचे आवाहन पाटील यांनी केले. पुरस्कार मिळतात; परंतु एखाद्या क्षेत्रात चांगले काम केले असेल आणि अन्य बाबींबाबत उणिवा असतील तर त्यासाठी लोकमतने कॅटेगरी करून सुरू केलेला हा पुरस्काराचा उपक्रम बळ देणारा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.सर्व नवीन निकषांचे प्रयोग सरपंचांवरच का केले जातात?लोकशाहीच्या प्रयोगशाळेतील पांढरा उंदीर म्हणजे सरपंच होय. सारे प्रयोग अगोदर त्याच्यावरच केले जातात. सारे नियम-कायदे त्याच्यासाठीच बनविले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिंलांसाठी आरक्षण द्यायचे; परंतु, किती महिला विधानसभा, लोकसभेवर आहेत. तीन अपत्याचा प्रयोगही सरपंचांवरच केला गेला. आमदार-खासदारांना मग कितीही अपत्ये असू द्या, त्यांना सारी मुभा. शिक्षणाबाबतही तीच गत. सरपंच दहावी पासच असावा. विरोध शिक्षणाला नाही; पण शिक्षणाची अट सरपंचांनाच का? नियम सर्वांना सारखेच असावेत, असेही पाटील म्हणाले.