शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

सरपंचांनी आपली ताकद ओळखावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:47 IST

नाशिक : सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्व सरपंचांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपल्यातील ताकद ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य जयंत पाटील यांनी बोलताना केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : न्याय्यहक्कांसाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन

नाशिक : सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यासाठी सर्व सरपंचांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपल्यातील ताकद ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य जयंत पाटील यांनी बोलताना केले.लोकमत सरपंच अवॉर्ड वितरण कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी सरपंचांना त्यांच्या हक्कांचीजाणीव करून देताना सांगितले, लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम सरपंच करीत असतो. सरपंच होणे सोपे; परंतु गाव चालविणे अवघड असते. सरपंचाला गावाचा गाडा हाकताना गावकऱ्यांचा विश्वास संपादन करावा लागतो.सरपंचांची उपेक्षाचगावकीचे-भावकीचे राजकारण सांभाळून सरपंचाला गावाची प्रगती करायची असते; परंतु ग्रामविकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सरपंचांचा अपेक्षित असा सन्मान झालेला नाही. त्याच्या प्रश्नांबाबत लोकसभा-विधानसभेत कधी आवाज उठविला जात नाही. सरपंचांच्या न्याय्यहक्कांसाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ असणे जरुरीचे आहे. त्यांनाही प्रतिनिधित्व असले पाहिजे. बळ देणारा उपक्रमआपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर गावाचा विकास शक्य आहे. गावांमध्ये स्रीभू्रणहत्या, बालविवाह यांसारख्या कुप्रथांनाही पायबंद घालण्याचे आवाहन पाटील यांनी केले. पुरस्कार मिळतात; परंतु एखाद्या क्षेत्रात चांगले काम केले असेल आणि अन्य बाबींबाबत उणिवा असतील तर त्यासाठी लोकमतने कॅटेगरी करून सुरू केलेला हा पुरस्काराचा उपक्रम बळ देणारा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.सर्व नवीन निकषांचे प्रयोग सरपंचांवरच का केले जातात?लोकशाहीच्या प्रयोगशाळेतील पांढरा उंदीर म्हणजे सरपंच होय. सारे प्रयोग अगोदर त्याच्यावरच केले जातात. सारे नियम-कायदे त्याच्यासाठीच बनविले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिंलांसाठी आरक्षण द्यायचे; परंतु, किती महिला विधानसभा, लोकसभेवर आहेत. तीन अपत्याचा प्रयोगही सरपंचांवरच केला गेला. आमदार-खासदारांना मग कितीही अपत्ये असू द्या, त्यांना सारी मुभा. शिक्षणाबाबतही तीच गत. सरपंच दहावी पासच असावा. विरोध शिक्षणाला नाही; पण शिक्षणाची अट सरपंचांनाच का? नियम सर्वांना सारखेच असावेत, असेही पाटील म्हणाले.