शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नाशकात आप ठप्प, माकपा गप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:46 IST

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सारे गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : बदलत्या समीकरणांमुळे ‘झाडू’न सारे गायब

नाशिक : सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सारे गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपबरोबरच माकपाकडूनही केवळ दिंडोरीचीच चर्चा घडविली जात असून, नाशिकबाबत पक्षनेत्यांनी तूर्त गप्प राहणेच पसंत केले आहे.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सन २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल या माजी सनदी अधिकाऱ्याने आम आदमी पार्टीची स्थापना करत दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल २८ जागा पटकावल्या होत्या. पूर्ण बहुमत नसल्याने आपने अन्य पक्षांच्या मदतीने दिल्लीत सरकार स्थापन केले परंतु, ते अल्पजीवी ठरले. आपने दिल्लीत मारलेल्या मुसंडीमुळे देशभरात त्याची चर्चा सुरू झाली होती. त्याच बळावर आपने सन २०१४ च्या निवडणुकीत मोठी हवा निर्माण केली होती. त्यातूनच नाशिक लोकसभा मतदारसंघात जलसंपदा खात्यातून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेले आणि जलसंपदा खात्यातील सिंचन घोटाळ्याबाबत आरोपांची राळ उठविणारे विजय पांढरे यांना निवडणुकीचे वेध लागले होते. अपेक्षेप्रमाणे विजय पांढरे यांनी नाशिक मतदारसंघात उमेदवारी केलीही परंतु, ९६७२ म्हणजे १.०३ टक्केच मते त्यांच्या पदरात पडू शकली होती. पांढरे यांचा आप सहाव्या क्रमांकावर फेकला गेला होता. गेल्या पाच वर्षांत राज्यात आपचा प्रभाव हळूहळू ओसरत गेला. आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आणि अन्य पक्षात उमेदवारीबाबत चर्चा रंगली असताना आप मात्र पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. आपकडून उमेदवारीबाबत कुणाच्याही नावाची चर्चा होताना दिसून येत नाही. त्यामुळे यंदा आपकडून अन्य पक्षालाच ‘पहले आप’ म्हणत पुढे चाल देण्याची शक्यता बळावली आहे.माकपाची संदिग्ध भूमिकाआपप्रमाणेच नाशिक मतदारसंघात माकपातही शांतता आहे. माकपाने केवळ दिंडोरीच्या जागेबाबत आग्रही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी उमेदवारी केली होती. त्यांना १७ हजार १५४ मते मिळविता आली होती. यंदा, नाशिकच्या उमेदवारीबाबत अवाक्षरही काढले जात नसल्याने माकपाच्याही भूमिकेबाबत संदिग्धता आहे. आपने नाशिकप्रमाणेच दिंडोरीतूनही प्रा. ज्ञानेश्वर माळी यांना उमेदवारी दिली होती; परंतु माळी यांना ४०६७ मतांपर्यंत मजल मारता आलेली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)AAPआप