शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

नाशकात आप ठप्प, माकपा गप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:46 IST

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सारे गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : बदलत्या समीकरणांमुळे ‘झाडू’न सारे गायब

नाशिक : सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सारे गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपबरोबरच माकपाकडूनही केवळ दिंडोरीचीच चर्चा घडविली जात असून, नाशिकबाबत पक्षनेत्यांनी तूर्त गप्प राहणेच पसंत केले आहे.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सन २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल या माजी सनदी अधिकाऱ्याने आम आदमी पार्टीची स्थापना करत दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल २८ जागा पटकावल्या होत्या. पूर्ण बहुमत नसल्याने आपने अन्य पक्षांच्या मदतीने दिल्लीत सरकार स्थापन केले परंतु, ते अल्पजीवी ठरले. आपने दिल्लीत मारलेल्या मुसंडीमुळे देशभरात त्याची चर्चा सुरू झाली होती. त्याच बळावर आपने सन २०१४ च्या निवडणुकीत मोठी हवा निर्माण केली होती. त्यातूनच नाशिक लोकसभा मतदारसंघात जलसंपदा खात्यातून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेले आणि जलसंपदा खात्यातील सिंचन घोटाळ्याबाबत आरोपांची राळ उठविणारे विजय पांढरे यांना निवडणुकीचे वेध लागले होते. अपेक्षेप्रमाणे विजय पांढरे यांनी नाशिक मतदारसंघात उमेदवारी केलीही परंतु, ९६७२ म्हणजे १.०३ टक्केच मते त्यांच्या पदरात पडू शकली होती. पांढरे यांचा आप सहाव्या क्रमांकावर फेकला गेला होता. गेल्या पाच वर्षांत राज्यात आपचा प्रभाव हळूहळू ओसरत गेला. आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आणि अन्य पक्षात उमेदवारीबाबत चर्चा रंगली असताना आप मात्र पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. आपकडून उमेदवारीबाबत कुणाच्याही नावाची चर्चा होताना दिसून येत नाही. त्यामुळे यंदा आपकडून अन्य पक्षालाच ‘पहले आप’ म्हणत पुढे चाल देण्याची शक्यता बळावली आहे.माकपाची संदिग्ध भूमिकाआपप्रमाणेच नाशिक मतदारसंघात माकपातही शांतता आहे. माकपाने केवळ दिंडोरीच्या जागेबाबत आग्रही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी उमेदवारी केली होती. त्यांना १७ हजार १५४ मते मिळविता आली होती. यंदा, नाशिकच्या उमेदवारीबाबत अवाक्षरही काढले जात नसल्याने माकपाच्याही भूमिकेबाबत संदिग्धता आहे. आपने नाशिकप्रमाणेच दिंडोरीतूनही प्रा. ज्ञानेश्वर माळी यांना उमेदवारी दिली होती; परंतु माळी यांना ४०६७ मतांपर्यंत मजल मारता आलेली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)AAPआप