शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला आले आहात काहीतरी मदत करून जा

By admin | Updated: September 8, 2016 00:53 IST

निफाड : तालुक्यातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती; गुरूवारी नाशिक येथे देणार निवेदन

 निफाड : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत आज गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे शेतकरी नेते राजेंद्र डोखळे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाचा आशय असा, मागील वर्षी आम्ही पिक कर्जाची उचल केलेली होती. दि: ३१ मार्च पूर्वी आम्ही आमच्या कर्जाची व्याजासह परतफेड केलेली आहे. आम्ही नियमितपणे कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहोत. दि. ३१ मार्चला कर्ज परतफेड करून पीक कर्जाची मागणी केली असता , विविध कार्यकारी सेवा संस्थांमार्फत बँकेने , कर्ज मर्यादा कमला पत्रकाद्वारे (क.म.पत्रक) आम्हा शेतकऱ्यांना पीक कर्जाची मंजूरी दिलेली आहे. परंतु प्रत्यक्ष कर्ज उचल देनेस बँकेने नकार दिलेला आहे. कर्जासाठी रकमेची उपलब्धता नसल्याने कर्ज वाटप करू शकत नाही असे कारण बँकेने पुढे केले आहे. बँकेच्या कर्ज वाटपाच्या नियोजनाच्या अभावामुळे व शेतकऱ्यांना शासनाने कर्ज पुरवठा करण्यासाठी केलेल्या दुर्लक्षामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. द्राक्ष पिकासाठी आॅगस्ट, सप्टेम्बर महिना अत्यंत महत्वपूर्ण असून हंगामपूर्व तयारीसाठी कर्ज रकमेची नितांत आवश्यकता आहे. आपणास या निवेदनद्वारे विनंती करण्यात येते की, आम्ही मागणी केल्या प्रमाणे मंजूर क.म. पत्रकाप्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा विनाविलंब करण्यात यावा. आम्ही शेतकऱ्यांनी बँकेची कर्जफेड करण्यासाठी स्वभांडवल वापरलेले आहे. स्वत:जवळील रक्कम संपल्याने पीक उभारणीसाठी कर्ज रकमेची गरज आहे. विनाविलंब पीककर्ज न मिळाल्यास नैराश्यातुन आत्महत्येचा विचार शेतकरी अवलंबण्याची शक्यता आहे. पीक कर्ज न मिळाल्याने अशा काही घटना घडल्यास त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन व नाशिक जिल्हा मध्य.सह.बँक, हेच जबाबदार राहतील हे खेदाने सांगावेसे वाटते.गोदवारीला मोठ्या प्रमाणात पुर येऊन गेलेला आहे. अचानक आलेल्या पुरामुळे आमची गुरेढोरे, पीक वाहून उध्वस्त झालेली आहेत. त्याचीही माहिती घ्या व नाशिकला आलेच आहात तर काहीतरी मदत करुन जा. कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी नासिक जिल्हा मध्य. सह. बँकेच्या प्रधान कार्यालय, द्वारका सर्कल, नासिक शेजारील नासिक जिल्हा औद्योगिक सह. संघ येथे दुपारी २ वा उपस्थित रहावे असे आवाहन राजेंद्र डोखळे यांनी केले आहे. (वार्ताहर)