शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

...तू ये रे पावसा; नाशिकमध्ये एक लाख लोकांची तहान अद्यापही टँकरवर भागतेय!

By अझहर शेख | Updated: August 8, 2023 14:03 IST

पावसाचा हंगामाचा तीसरा महिना सुरू आहे, मात्र अजुनही एप्रिलपासून सुरू झालेले पाण्याचे टँकर जिल्ह्यात थांबलेले नाही.

नाशिक : पावसाचा हंगामाचा तीसरा महिना सुरू आहे, मात्र अजुनही एप्रिलपासून सुरू झालेले पाण्याचे टँकर जिल्ह्यात थांबलेले नाही. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी सर्वाधिक येवलामध्ये २९ गावे व १५ वाडीस्ती तर चांदवड, मालेगाव या दोन तालुक्यांत अनुक्रमे १६ व १० गावे व १४ वाडीवस्तींवर पाणीटंचाई कायम आहे. सात तालुक्यांतील ६७ गावांसह ३९ वाड्यांची तहान ५६टँकरद्वारे आजही जिल्हा प्रशासनाकडून भागविली जात आहे.

नाशिक जिल्हा हा तसा बागायती पीकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील पर्जन्यमानाचे प्रमाण फारसे अत्यल्प असे नाही; मात्र यावर्षी पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा हे तालुके सोडले तर अन्य तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला नाही. यामुळे अन्य तालुक्यांमधील शेतकरी व नागरिक हवालदिल आहे. सिन्नर, नांदगाव, चांदवड, येवला या तालुक्यांमध्ये अजुनही मुसळधार पाऊस झालेला नाही. या तालुक्यांमधील गावांमधील रस्त्यांवर चक्क ऑगस्टमध्येही पिण्याच्या पाण्याचे टँकर धावत आहेत. यावरून या भागातील पाणीटंचाईची झळ लक्षात येते.

मालेगावमध्ये सर्वाधिक एकुण ११विहिरींचे अधिग्रहण शासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण ३८विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी २५गावांसांठी तर १३ टँकरसाठी आहेत. ५६ टँकर १२३ फेऱ्या करत १ लाख ३१ हजार ५२९ नागरिकांची तहान भागवत आहेत.

जिल्ह्याला सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमधील लोकांचे डोळे आभाळाकडे लागले आहे.

हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यात पुढील आठवडाभर मध्यमत किंवा जोरदार पावसाचा इशारा दिलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र राहत आहे. तसेच सुर्यप्रकाशही पडू लागला आहे. यामुळे पावसाने पुर्णपणे विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.

तालुका--- टँकर - फेऱ्या

येवला----- १६- --४८मालेगाव---१३---१६

चांदवड---१०---३४बागलाण---३----११

देवळा----४-----२नांदगाव----८----९

सिन्नर----२-----३