शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

यंदाही यंत्राने भात लागवडीसाठी कृषी विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते; मात्र त्यासाठी शेतकरी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने पाहिजे तितके उत्पादन ...

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते; मात्र त्यासाठी शेतकरी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याने पाहिजे तितके उत्पादन मिळत नाही. भात लागवडीसाठी पूरक हवामान,पाऊस व जमीन असूनही भाताच्या उत्पादनात वाढ होत नसल्याने कृषी विभागाने भात लागवडीसाठी विविध प्रयोग राबविण्याचे ठरविले असून, त्याची सुरुवात गेल्या वर्षापासून करण्यात आली आहे. हाताने भात लागवड करण्यापेक्षा यंत्राच्या सहाय्याने लागवड केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. त्यासाठी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यंत्राच्या सहाय्याने भात लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी पारंपरिक भात व यंत्राच्या साह्याने भात लागवड यात नेमका कसा फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती दिली. यंत्राच्या साह्याने भात लागवड दोन ते तीन मजुरांकरवी एका दिवसात चार ते पाच एकरावर लागवड करता येते. ही लागवड ठराविक अंतरावर ओळीने करता येते. पारंपरिक लागवडीसाठी एकरी सहा ते सात हजारपर्यंत खर्च येतो, तर यंत्राच्या साह्याने तीन हजारात लागवड होते. यामुळे पैशाची बचत तसेच उत्पन्नात ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊन वेळेची बचत होते, असे सांगितले. कृषी पर्यवेक्षक संजय पाटील यांनी घरगुती भात बियाणावर तीन टक्के मिठाची, बुरशीनाशकाची व जैविक खतांची बीजप्रक्रिया कशी करतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले, तसेच जे बियाणे बाजारातून खरेदी केले जाते त्यावर जैविक खतांच्या बीज प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. हरसूल मंडळ कृषी अधिकारी अनिल गावित यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये कशाप्रकारे भाग घेता येईल याविषयी सविस्तर माहिती दिली. भाताची चटई नर्सरी कशी तयार करावी याविषयी महिंद्रा कंपनीचे डीलर भुसारे व मच्छिंद्र चुंबळे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी अरुण राऊत, प्रमोद ढोकचवळे यांनीही मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांसह आंबोलीचे सरपंच लचके, अरुण मेढे, ज्ञानेश्वर मेढे, नवनाथ बोडके, शरद बोडके, गोकुळ मेढे, संदीप मेढे, बळीराम मेढे उपस्थित होते.

(फोटो०१ भात)