शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:14 IST

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी ...

ठळक मुद्दे४३० कुटुंबांचे स्थलांतर महिनाअखेर ताबा जलसंपदा विभागाकडे

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी गावांतील जमीन संपादित करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले.परंतु आदिवासींनी जागा देण्यास केलेल्या विरोधामुळे सात ते आठ वर्षे काहीच हालचाल होऊ शकली नाही. अखेर जागा मालकांचे मन वळविण्यात यश आल्याने प्रत्येकी सुमारे आठ लाख रुपये प्रमाणे जमिनीचा मोबदला तसेच जमिनीवर असलेली पिके, घर, गोठ्यांचेही मूल्यांकन करून पैसे देण्यात आले व सुमारे पाचशे हेक्टर जागा धरणासाठी संपादित करण्यात आली. परंतु पुनर्वसनाच्या प्रश्नी काम धीम्या गतीने सुरू असल्याने जागा मालकांनी पूर्ण पुनवर्सन झाल्याशिवाय स्थलांतर होण्यास नकार दिला. पुनर्वसनासाठी धरणाच्या बाजूलाच भरवद, काळुस्ते शिवारात जमीन संपादित करून प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्लॉटचे वाटप करण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसनाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. दरम्यान, धरणाचे काम लांबणीवर पडत असल्याने प्रकल्पावर होणाºया खर्चातही दरवर्षी वाढ होत होती. ३० प्रकल्पग्रस्त चालू महिना अखेरीस स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे.प्रोत्साहन अनुदानजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरणग्रस्तांना घरांची बांधणी करण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिल्यामुळे ४६७ प्रकल्पग्रस्तांपैकी डिसेंबर अखेर ४३० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले आहे.नाशिकला पाणी मिळण्याविषयी साशंकतासाधारणत: २.६० टीएमसी पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या भाम धरणातील पाणी दारणा धरणातून नांदूरमधमेश्वरमार्गे नगर व मराठवाड्याला सोडण्यात येणार आहे. नाशिक शहराला या पाण्याचा लाभ होण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात असली तरी, जनभावना लक्षात घेता जलसंपदा विभाग नाशिक जिल्ह्याला या धरणातून पाणी मिळेल असा दावा करीत असून, नेमके किती व कशा प्रकारे मिळेल हे स्पष्ट झालेले नाही.