शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:14 IST

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी ...

ठळक मुद्दे४३० कुटुंबांचे स्थलांतर महिनाअखेर ताबा जलसंपदा विभागाकडे

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.साडेतीनशे कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाºया धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी गावांतील जमीन संपादित करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले.परंतु आदिवासींनी जागा देण्यास केलेल्या विरोधामुळे सात ते आठ वर्षे काहीच हालचाल होऊ शकली नाही. अखेर जागा मालकांचे मन वळविण्यात यश आल्याने प्रत्येकी सुमारे आठ लाख रुपये प्रमाणे जमिनीचा मोबदला तसेच जमिनीवर असलेली पिके, घर, गोठ्यांचेही मूल्यांकन करून पैसे देण्यात आले व सुमारे पाचशे हेक्टर जागा धरणासाठी संपादित करण्यात आली. परंतु पुनर्वसनाच्या प्रश्नी काम धीम्या गतीने सुरू असल्याने जागा मालकांनी पूर्ण पुनवर्सन झाल्याशिवाय स्थलांतर होण्यास नकार दिला. पुनर्वसनासाठी धरणाच्या बाजूलाच भरवद, काळुस्ते शिवारात जमीन संपादित करून प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्लॉटचे वाटप करण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसनाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. दरम्यान, धरणाचे काम लांबणीवर पडत असल्याने प्रकल्पावर होणाºया खर्चातही दरवर्षी वाढ होत होती. ३० प्रकल्पग्रस्त चालू महिना अखेरीस स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे.प्रोत्साहन अनुदानजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरणग्रस्तांना घरांची बांधणी करण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिल्यामुळे ४६७ प्रकल्पग्रस्तांपैकी डिसेंबर अखेर ४३० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले आहे.नाशिकला पाणी मिळण्याविषयी साशंकतासाधारणत: २.६० टीएमसी पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या भाम धरणातील पाणी दारणा धरणातून नांदूरमधमेश्वरमार्गे नगर व मराठवाड्याला सोडण्यात येणार आहे. नाशिक शहराला या पाण्याचा लाभ होण्याविषयी साशंकता व्यक्त केली जात असली तरी, जनभावना लक्षात घेता जलसंपदा विभाग नाशिक जिल्ह्याला या धरणातून पाणी मिळेल असा दावा करीत असून, नेमके किती व कशा प्रकारे मिळेल हे स्पष्ट झालेले नाही.