शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पाळे खुर्द येथील अष्टभुजा देवीच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ

By admin | Updated: January 21, 2016 22:10 IST

पाळे खुर्द येथील अष्टभुजा देवीच्या यात्रेस शनिवारपासून प्रारंभ

पाळे खुर्द : येथील जागृत देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या श्री अष्टभुजादेवीचा यात्रोत्सव शनिवारपासून (दि.२३) सुरू होणार असल्याची माहिती यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन पाटील व रावसाहेब पाटील, जिभाऊ पाटील उपस्थित होते.शनिवारी सकाळी ७ वाजता मंदिराचे पुजारी ज्योतिर्भास्कर सुनील पाठक यांच्या हस्ते कलश पूजन, ध्वजारोहणानंतर दिवसभर भजन, कीर्तन, महाआरती, होमहवन आदि कार्यक्रम होतील. दुपारी २ वाजता श्री अष्टभुजादेवीच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. रात्री ९ वाजता मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा होईल. दुसऱ्या दिवशी दि. २४ रोजी कुस्त्यांची दंगल तर दि.२५ रोजी यात्रेची सांगता व भंडारा होईल. ग्रामपंचायतीकडून यात्रोत्सवादरम्यान पथदीप व पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार आहे.येथील श्री अष्टभुजा देवीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याची आख्यायिका आहे. सुरतेच्या लुटीनंतर परतीच्या मार्गाने जाताना गिरणा नदीच्या पात्रातून मार्ग काढत महाराज पाताळेश्वर म्हणजे आताचे पाळे खुर्द येथे आले. महाराजांना घनदाट जंगलात आज ज्या ठिकाणी अष्टभुजा देवीचे मंदिर तेथे एक पर्णकुटी दिसली. त्या दिशेने महाराज गेले तेव्हा तेथे एक आदिवासी जोडपे गिरणा नदीच्या तिरावर राहत असल्याचे दिसले. महाराजांनी आदिवासी महिलेला आपली ओळख सांगितली. ती आदिवासी महिला आश्चर्यचकीत झाली व महाराजांना विनंती केली की, आजचा मुक्काम हा आपण सर्वांनी माझ्या पर्णकुटीवर करावा. महाराजांनी विनंती स्वीकारून मुक्काम केला. महाराजांनी आपल्याबरोबर आणलेला शिधा त्या महिलेला दिला. महिलेने महाराजांना पळसवृक्षाच्या पानावर गोलाकार पद्धतीने भात, कढी व त्यावर कढीपत्ता असलेली फांदी शिजवून ठेवलेली होती व बाजूला चटणी होती. त्यावर महाराजांनी महिलेला विचारले हे काय भोजन आहे. त्यावर महिला उत्तरली कढीची पाळ गोलाकार पद्धतीने भात भिजवून मग सेवन करावयाची त्यावर महाराजांना गनिमीकावा संकल्पना सुचली असेच आपण शत्रूच्या किल्ल्याला गोलाकार वेढा मारला तर आपल्या किल्ला सहज जिंकता येईल या कल्पनेने कढीची पाळ. पाळ हा शब्द स्मरणात राहिल्याने मौजे पाताळेश्वर गावाचे नामकरण महाराजांनी पाळे खुर्द केले. दुसऱ्या दिवशी गिरणात स्नान करून पाळे खुर्द येथील आदिवासी जोडप्याच्या पर्णकुटी शेजारी दगडाची एक चिरा उभी केली. आदिवासी जोडप्याला उपस्थितीत आठही दिशा फिरल्यानंतर महाराजांना राजधानी रायगडकडे जाण्याची दिशा मिळाली व त्यांनी श्री अष्टभुजा देवीची स्थापना करुन पौष पौर्णिमेस देवीचा यात्रोत्सव सुरू करण्याची प्रार्थना केली व तसेच येथील जनतेला पीक, धनधान्य येऊ दे व गुण्यागोविंदाने यात्रोत्सव पाळे खुर्द जनतेला साजरा करू दे, अशी प्रार्थना केली व तेव्हापासून हा यात्रोत्सव साजरा केला जातो. (वार्ताहर)