शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

कवडीमोल दराने द्राक्षउत्पादक चिंंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:13 IST

सायखेडा : अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या द्राक्ष यंदा भरघोस उत्पन्न मिळवून देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची अखेर फोल ठरली असून स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे अवघी तीस ते पस्तीस रु पये किलो दराने विक्र ी होत आहे.

सायखेडा : अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झालेल्या द्राक्ष यंदा भरघोस उत्पन्न मिळवून देतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांची अखेर फोल ठरली असून स्थानिक बाजारपेठेत द्राक्षे अवघी तीस ते पस्तीस रु पये किलो दराने विक्र ी होत आहे. द्राक्षे पिकविण्यासाठी लाखो रु पये खर्च केले असले तरी आजच्या भावाने खर्च सुद्दा वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.निर्यातक्षम द्राक्ष सत्तर ते पंच्यात्तर रु पये किलो दराने खरेदी होत असली तरी व्यापारी या मालाची हार्वेस्टनीग करून एकरी अवघा तीस ते चाळीस क्विंटल घेऊन जात आहे आणि शिल्लक माल अवघ्या पंचवीस रु पये किलो दराने खरेदी केला जात असल्याने अवकाळी पावसात टिकवलेली द्राक्ष तोट्यात जात आहे . नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे असणारे नगदी पीक म्हणून द्राक्षे पिकाकडे पाहिले जाते. युरोपिय राष्टÑ आणि इतर देशांत नाशिकची द्राक्षे निर्यात होत असतात. चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, योग्य हवामान, पिंपळगाव, ओझर, दिंडोरी, उगाव याठिकाणी उपलब्ध असलेली त्रास ट्रान्सपोर्ट व्यवस्था, निर्यातक्षम द्राक्षसाठी कोल्ड स्टोरेज यामुळे द्राक्षे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. द्राक्ष बागायतदार शेतकरी मात्र मागील काही वर्षांपासून कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांनी त्रस्त झाले आहे. कधी उत्पादन चांगले निघते मात्र भाव मिळत नाही तर कधी भाव चांगले असले की विविध रोग आणि धुके पाऊस यामुळे भरघोस उत्पादन निघत नाही. कधी दोन्ही गोष्टी अनुकूल असल्यास व्यापारी माल घेऊन पलायन करतो अशा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Nashikनाशिक