शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

जिल्हा परिषदेचे  अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:19 IST

गाव पाणीदार करण्याच्या ईर्ष्येला पेटलेल्या ग्रामस्थांच्या हातात हात देऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचायांनी श्रमदान करत सिन्नर तालुक्यातील वडझिरे परिसरातील भूजल पातळीत ५० लाख लिटर पाणीसाठ्याची व्यवस्था होईल एवढे काम एका दिवसात करून ग्रामस्थांनी घेतलेल्या तुफानाच्या उडीला साद देण्याचे कौतुकास्पद काम केल्याची चर्चा नायगाव खोºयात होत आहे.

नायगाव : गाव पाणीदार करण्याच्या ईर्ष्येला पेटलेल्या ग्रामस्थांच्या हातात हात देऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचायांनी श्रमदान करत सिन्नर तालुक्यातील वडझिरे परिसरातील भूजल पातळीत ५० लाख लिटर पाणीसाठ्याची व्यवस्था होईल एवढे काम एका दिवसात करून ग्रामस्थांनी घेतलेल्या तुफानाच्या उडीला साद देण्याचे कौतुकास्पद काम केल्याची चर्चा नायगाव खोºयात होत आहे.  शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषेदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्यासह सर्व खातेप्रमुख व आरोग्य, शिक्षण, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सर्व चारशे कर्मचाºयांनी वडझिरे येथे सकाळी ६ वाजता श्रमदानास सुरुवात केली. एका दिवसात ५० सीसीटी निर्माण केल्या आहे. या खोदलेल्या कामामुळे वडझिरे परिसरातील भूजल पातळीत तब्बल ५ लाख लिटर पाण्याचा साठा होणार असल्याचे जलमित्र जयराम गिते यांनी सांगितले. गाव करील ते राव काय करील.. अशा आशयाची म्हण सुपरिचित आहे. या म्हणीप्रमाणे पाचविला पुजलेला दुष्काळ हद्दपार करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावाने गट-तट बाजूला सारून पानी फाउण्डेशनच्या सुराला श्रमाची साद घालत गाव पाणीदार करण्याची शपथ घेऊन लेकराबाळांसह एकत्र येत आमीर खानच्या तुफानात उडी घेतली आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या पानी फाउण्डेशनच्या वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून वडझिरेकरांच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी गावातील सर्वच गट-तट बाजूला सारून पाण्याच्या तुफानात उडी घेतली आहे. तीन वर्षापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव आदर्श करण्याला पानी फाउण्डेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांचे एकीचे बळ मिळाल्याने गाव आता खºया अर्थाने पाणीदार होण्याच्या नजीक पोहचल्याची चर्चा परिसरात होत आहे. ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने या योजनेत सहभागी होऊन प्रत्यक्षात शिवार फेरी करून कामाची रूपरेषा ठरवत कामाचा शुभारंभ केला. ग्रामस्थांनी परिसरात दगडी बंधारे, शोषखड्डे, पाच हजार रोपवाटिका निर्माण करत स्पर्धेत गावाला १७ गुण मिळवून दिले आहे. त्यामुळे जैन संघटनेतर्फे जेसीबी व पोकलेन आदी यंत्रणा उपल्बध करून दिले आहे.  ग्रामपंचायत, सीएसआर व अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावात अनेक आदर्शवत कामे झाली आहेत. ग्रामविकास समितीने काही वर्षांपासून सुरू केलेल्या पाणी आडवा, पाणी जिरवा या कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर शासनाच्या जलयुक्त शिवारचे कामही मोठ्या प्रमाणात झाले आहे. आणि आता होत असलेल्या पानी फाउण्डेशनच्या कामामुळे वडझिरे गाव खºया अर्थाने पाणीदार होण्याच्या समीप पोहचले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद