शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

माठ तयार करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 17:56 IST

संक्र ांती सणानंतर उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. तशी माठातील गार पाणी पिऊन तहान कशी भागेल याची चाहूल सर्वांनाच लागलेली असते.त्यासाठी येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील कुंभार योगेश रसाळ यांनी आतापासूनच हस्तकलेद्वारे मातीचे माठ तयार करण्यास सुरु वात केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सुरू होणारी कुंभार बांधवांची कामे यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरला सुरू झाली आहेत. उन्हाळ्यात हंडा वा पंचपात्रीमधील पाण्याने तहान भागणे शक्य नसते. त्यामुळे मातीपासून बनविलेल्या माठातील पाणी कसे आणि कोठे मिळेल याचा शोध नागरिक घेत असतात. यंदा पाऊस समाधानकारक झाला नसल्याने उन्हाची अधिक जाणवणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन योगेश रसाळ यांनी माठ बनविण्यास यंदा लवकर सुरुवात केली आहे. गावात पारंपरिक पद्धतीनुसार मातीची भांडी बनवली जातात. बाजारात कच्चा मालाचे दर सातत्याने वाढत असल्याने कुंभार बांधवांना मातीपासून भांडी तयार करणे अवघड झाले आहे. व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे.पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय सुरू ठेवायचा म्हणून नफ्या-तोट्याचा विचार न करता मोठ्या प्रमाणात खर्च करूनही तो वसूल होतो की नाही याची कोणतीच शाश्वती नसल्याने दिवसेंदिवस कुंभार व्यवसाय धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यंदाची दुष्काळाची दाहकता लक्षात घेता भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी पुढच्या काही दिवसात पाणी मिळेल की नाही याचीही शाश्वती नसतानाही माठ बनविण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू झाली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक