शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

कार्यकर्ते अडगळीत!

By admin | Updated: November 16, 2016 23:08 IST

सेटलमेंट : नेत्यांच्या घरात उमेदवारीची ‘खिरापत’

गिरीश जोशी मनमाडथेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या बहुतांश उमेदवाऱ्या नेतेमंडळींच्या नातेवाईक व आप्तेष्टांना बहाल करण्यात आल्याने राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नेतेमंडळींच्या राजकीय ‘सेटलमेंट’मुळे सामान्य कार्यकर्ते ‘अवसानयानात’ निघाले असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे. त्याचीच परिणती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पालिका निवडणुकीकडे पाहीले जाते. या निवडणुकी साठी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपआपल्या नेत्यांकडे उमेदवारी साठी प्रयत्न केले होते. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोणाला तिकीट द्यायचे व कोणाला डावलायचे अशी पंचाईत नेते मंडळींची झाली. प्रमुख पक्षांमधे सुध्दा नेतेमंडळींचे विचारसरणी नुसार गट तट उपगट असल्याचे नविन नाही. त्यामुळे या गटाने सुचवलेले नाव त्या गटाला मान्य होइलच असे नाही. तर दुसऱ्या गटाने सुचवलेले नाव पहिला गट स्विकारेलच असे नाही. यातूनच शह काटशहाची समीकरणे मांडली जाउ लागली. या वर पर्याय म्हणून नेते मंडळींनी आपआपसामधे जागा वाटून घेतल्या. या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर सामान्य कार्यकर्ते मात्र अवाकच झाले. जाहीर झालेल्या उमेदवारांमधे नेते मंडळींच्या नातेवाइकांची व आप्तेष्टांची चलती असल्याचे स्पष्ट झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने व प्रामाणीकपणे काम करणाऱ्या कायकर्त्यांची उपेक्षा झाली आहे. पक्षाशी किंवा राजकारणाशी सुतराम संबंध नसलेल्या तसेच कुणालाही परिचित नसलेल्या काही नवख्या उमेदवारांमुळे तर रात्रंदिवस जिवाचे रान करणाऱ्या सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. नेत्यांसाठी व पक्षासाठी सामान्य कार्यकर्ते जीवाचे रान करत असतात. रात्रंदिवस त्यांच्या साठी राबतात. पडेल ते काम करतात. मात्र बहुतांशी राबनाऱ्या कार्यकर्त्याला पदासाठी अखेरपर्यंत झुलवत ठेवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढावी म्हणून दुसऱ्या गोटातून फोडलेल्या कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवली जाते. नेत्यांचे नातेवाईक, मुले, आप्तेष्ट तसेच चमचेगीरी करनारे उथळ कार्यकर्ते, दुसऱ्या गोटातून फुटून आलेले कार्यकर्ते यांचे पक्षासाठी कुठलेही योगदान नसले तरी त्यांना राजकीय लाभ मिळण्यासाठी उमेदवाऱ्या बहाल करण्याच्या प्रकारामुळे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नाराज झालेले इच्छूक व त्यांचे जवळचे कार्यकर्ते या पॅटर्नमधून आपली नाराजी शमउन घेत असतात. नेतेमंडळींच्या स्व-फायद्याच्या राजकीय ‘सेटलमेंट’मुळे सामान्य कार्यकर्ते अडगळीत पडले आहे. हे असेच सुरु राहीले तर नेत्यांच्या मागे ‘आगे बढो...च्या घोषणा देण्यासाठी कार्यकर्ते शोधन्याची वेळ येईल अशी चर्चा शहरात सुरु आहे.