शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट रोडचे काम, वर्षभर थांब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 01:01 IST

नाशिककरांच्या दृष्टीने त्रासदायक ठरलेला त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यानच्या स्मार्ट रोडचे काम मंद गतीने सुरूच असून, दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे खोदकाम सुरू झाले; परंतु पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही.

नाशिक : नाशिककरांच्या दृष्टीने त्रासदायक ठरलेला त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यानच्या स्मार्ट रोडचे काम मंद गतीने सुरूच असून, दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे खोदकाम सुरू झाले; परंतु पहिला टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. इतका विलंब करूनही ठेकेदाराला आत्ताशी मार्च महिन्यात नोटीस बजाविण्यात आली असून, त्यामुळे काम कधी होणार हा प्रश्न कायम आहे.स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या १.१ किलोमीटर रस्त्याची स्मार्ट रोडसाठी निवड केली. त्यानंतर वर्ष झाले तर अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या बाजूचे काम पूर्ण झालेले नाही. या मार्गावरील शाळा आणि दुकानदार तसेच रहिवाशांचे प्रचंड हाल होत असून, कोणत्याही नियोजनाशिवाय रस्त्याचे काम करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.स्मार्ट रोडचे पथदर्शी काम संथगतीने सुरू असल्याने अनेकदा टिका झाली; परंतु ठेकेदार तारीख ते तारीख अशी मुदत देत असून, कंपनी तसेच महापालिकेने सपशेल शरणागती पत्करल्याची टिका होत आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात पुढे न गेलेले काम विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यामुळे काहीसे पुढ सरकले असले तरी जानेवारीपासून त्यांनाही ठेकेदार केवळ एकेक तारखा सातत्याने देत आहे.मेहेर ते सीबीएसपर्यंत मार्ग सुरू होण्यास गमे यांनी डेडलाइननंतर तब्बल दीड महिन्यानी हा टप्पा खुला करण्यात आला आहे. त्याचेही काम अर्धवट असताना आता ऐन निवडणुकीच्या धावपळीत त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या बाजूचे काम सुरू करण्यात आले असून, डांबरी रस्ता खोदण्यास प्रारंंभ झाला आहे. एक बाजूचा रस्ता खुला नाही तोच दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत.स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने यासंदर्भात बुधवारी (दि. २७) पत्रक प्रसिद्धीला दिले असून, त्यात पुन्हा अडचणींचा पाढा वाचला आहे. त्यानंतर ठेकेदाराला मार्च महिन्यात नोटीस बजावल्याचे नमूद केले आहे; परंतु रस्ता केव्हा पूर्ण करणार या विषयावर मात्र कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. वारंवार कामाला विलंब होऊनही मनपाकडून संबंधित ठेकेदाराला आता कुठे नोटीस बजावली आहे. असे असले तरी अजूनही कामाच्या पूर्णत्वाची शाश्वती देण्यात आलेली नाही.तीच ती कारणे..स्मार्ट सिटी कंपनीने मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यान कामे रेंगाळण्यामागे कंपनीने नवरात्र, गणेशोत्सव आणि दिवाळीचे कारण दिले असले तरी मुळातच ते आकस्मिक नव्हते. त्यामुळे तरीही प्रशासनाने नियोजन नव्हते याबद्दल आश्यर्च व्यक्त करण्यात येत आहे.पहिल्या टप्प्यात त्र्यंबक नाका ते सीबीएस आणि मेहेर सिग्नल असा टप्पा असणार आहे. सध्या एका लेनमधून वाहतूक सुरू असून, मेहेर सिग्नल ते सीबीएस हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, असे कंपनीने रस्ता खुला केल्यानंतर आता सुमारे पंधरा दिवसाने अधिकृतरीत्या कळविले आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका