शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडले पुलाचे काम

By admin | Updated: November 16, 2015 21:56 IST

घोटी : धरणाच्या बांधावरून करावा लागतोय जीवघेणा प्रवास

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तब्बल चौदा गावांना घोटीशी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम पावसाळा नव्हे तर दिवाळी उलटून गेल्यानंतरही अपूर्णच राहिल्याने या चौदा गावांतील नागरिकांना या कठडे नसलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, या पुलाचा उर्वरित निधी इतरत्र वळविल्याने हे काम अपूर्ण राहिले असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली, तर शासनाने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.याबाबत वृत्त असे की, घोटीपासून जवळच असलेल्या दारणा नदीवरील जुना पूल सातत्याने पाण्याखाली जात असल्याने शासनाने या ठिकाणी नवीन पूल मंजूर केला होता. यानुसार या पुलाचे काम गेल्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले होते. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश शासनाच्या वतीने संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते. हे काम करताना संबंधित ठेकेदाराने जुना पूल नष्ट करीत वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता केला होता; मात्र पहिल्याच पुराच्या पाण्यात हा पर्यायी मार्ग वाहून गेल्याने या भागातील चौदा गावांचा घोटीशी संपर्कतुटला होता.या प्रकारानंतर खासदार हेमंत गोडसे आणि आमदार निर्मला गावित यांनी या पुलाच्या कामाची पाहणी करीत पुलाचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यासह ठेकेदाराला केल्या होत्या. मात्र लोकप्रतिनिधींच्या सूचना पायदळी तुडवीत हे काम संथगतीने करण्यात आले होते.सदरच्या अपुऱ्या कामामुळे या भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)