शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

निधीअभावी रखडले पुलाचे काम

By admin | Updated: November 16, 2015 21:56 IST

घोटी : धरणाच्या बांधावरून करावा लागतोय जीवघेणा प्रवास

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तब्बल चौदा गावांना घोटीशी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम पावसाळा नव्हे तर दिवाळी उलटून गेल्यानंतरही अपूर्णच राहिल्याने या चौदा गावांतील नागरिकांना या कठडे नसलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, या पुलाचा उर्वरित निधी इतरत्र वळविल्याने हे काम अपूर्ण राहिले असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली, तर शासनाने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.याबाबत वृत्त असे की, घोटीपासून जवळच असलेल्या दारणा नदीवरील जुना पूल सातत्याने पाण्याखाली जात असल्याने शासनाने या ठिकाणी नवीन पूल मंजूर केला होता. यानुसार या पुलाचे काम गेल्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले होते. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश शासनाच्या वतीने संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते. हे काम करताना संबंधित ठेकेदाराने जुना पूल नष्ट करीत वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता केला होता; मात्र पहिल्याच पुराच्या पाण्यात हा पर्यायी मार्ग वाहून गेल्याने या भागातील चौदा गावांचा घोटीशी संपर्कतुटला होता.या प्रकारानंतर खासदार हेमंत गोडसे आणि आमदार निर्मला गावित यांनी या पुलाच्या कामाची पाहणी करीत पुलाचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यासह ठेकेदाराला केल्या होत्या. मात्र लोकप्रतिनिधींच्या सूचना पायदळी तुडवीत हे काम संथगतीने करण्यात आले होते.सदरच्या अपुऱ्या कामामुळे या भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)