शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

मालेगावी उड्डाण पुलाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:08 IST

मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणे गरजेचे होते; मात्र आता नववर्षातच मालेगावकरांसाठी उड्डाण पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. राजकीय कुरघोडी व उड्डाण पुलाच्या वाढीव कामाच्या खोडीमुळे काम संथगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देआगामी वर्षात पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा मालेगावकरांकडून केली जात आहे.

मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणे गरजेचे होते; मात्र आता नववर्षातच मालेगावकरांसाठी उड्डाण पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. राजकीय कुरघोडी व उड्डाण पुलाच्या वाढीव कामाच्या खोडीमुळे काम संथगतीने सुरू आहे.

उड्डाण पुलाच्या वाढीव कामाला शासनाने मान्यता द्यावी यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. शासनाच्या लालफितीत प्रस्ताव अडकल्याने मालेगावकरांना उड्डाणपुलाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहराच्या पूर्व भागातील उपकार सिनेमागृह ते सखावत हॉटेलपर्यंत उड्डाणपुलाचे काम सध्या रखडत रखडत सुरू आहे. आत्तापर्यंत केवळ ६० टक्के काम झाले आहे. राज्य शासनाने या कामासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये मंजूर केले आहेत. २५ सप्टेंबर २०१७ रोजी उड्डाण पुलाचा कार्यारंभ आदेश देऊन ठेकेदाराला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. २४ सप्टेंबर २०१९ रोजी पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने महापालिकेने पुन्हा ठेकेदाराला ६ महिन्यांची म्हणजे मार्च २०२० पर्यंतची मुदतवाढ दिली होती; मात्र सध्या मुदतवाढीची मर्यादा संपून ९ महिने उलटले आहेत. तरी देखील काम झाले नाही. लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने लक्ष घालून आगामी वर्षात पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा मालेगावकरांकडून केली जात आहे.शहराच्या वैभवात भर टाकणारा मोठा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून रखडला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. तसेच नवीन बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या बसला मोकळा रस्ता उपलब्ध होणार आहे; मात्र रखडलेल्या या प्रकल्पामुळे मालेगावकरांच्या पदरी निराशा पडत आहे. वाहतूक कोंडीच्या व धुळीच्या समस्यांना नागरिक वैतागले आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवTrafficवाहतूक कोंडी