शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

मालेगावी उड्डाण पुलाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:08 IST

मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणे गरजेचे होते; मात्र आता नववर्षातच मालेगावकरांसाठी उड्डाण पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. राजकीय कुरघोडी व उड्डाण पुलाच्या वाढीव कामाच्या खोडीमुळे काम संथगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देआगामी वर्षात पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा मालेगावकरांकडून केली जात आहे.

मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येणे गरजेचे होते; मात्र आता नववर्षातच मालेगावकरांसाठी उड्डाण पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. राजकीय कुरघोडी व उड्डाण पुलाच्या वाढीव कामाच्या खोडीमुळे काम संथगतीने सुरू आहे.

उड्डाण पुलाच्या वाढीव कामाला शासनाने मान्यता द्यावी यासाठी प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. शासनाच्या लालफितीत प्रस्ताव अडकल्याने मालेगावकरांना उड्डाणपुलाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. शहराच्या पूर्व भागातील उपकार सिनेमागृह ते सखावत हॉटेलपर्यंत उड्डाणपुलाचे काम सध्या रखडत रखडत सुरू आहे. आत्तापर्यंत केवळ ६० टक्के काम झाले आहे. राज्य शासनाने या कामासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये मंजूर केले आहेत. २५ सप्टेंबर २०१७ रोजी उड्डाण पुलाचा कार्यारंभ आदेश देऊन ठेकेदाराला दोन वर्षांची मुदत देण्यात आली होती. २४ सप्टेंबर २०१९ रोजी पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने महापालिकेने पुन्हा ठेकेदाराला ६ महिन्यांची म्हणजे मार्च २०२० पर्यंतची मुदतवाढ दिली होती; मात्र सध्या मुदतवाढीची मर्यादा संपून ९ महिने उलटले आहेत. तरी देखील काम झाले नाही. लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने लक्ष घालून आगामी वर्षात पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षा मालेगावकरांकडून केली जात आहे.शहराच्या वैभवात भर टाकणारा मोठा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून रखडला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. तसेच नवीन बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या बसला मोकळा रस्ता उपलब्ध होणार आहे; मात्र रखडलेल्या या प्रकल्पामुळे मालेगावकरांच्या पदरी निराशा पडत आहे. वाहतूक कोंडीच्या व धुळीच्या समस्यांना नागरिक वैतागले आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवTrafficवाहतूक कोंडी