शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

भगुरच्या सावरकर उद्यानाचे काम कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 15:08 IST

मंध्यतरी नगरपालिकेने नवीन आराखडा तयार केला. परंतु नियोजन नसल्याने त्याचे नुतनीकरण वेळेत पुर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगुर नगरपालिकेच्या निवडणूका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणूक निकालानंतर हा मुद्दा पुन्हा विस्मरणात जातो.

ठळक मुद्देअवकळा : भिकारी, दारूड्यांनी मांडले ठाण

भगुर : शहरातील एकमेव दारणाकाठचे निसर्गरम्य स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे शासकीय निधीतून सध्या अतिशय धिम्या गतीने काम सुरू असून, कामाची गती पाहता, ते कधी पुर्ण होणार याची शाश्वती दिली जात नाही. परिणामी शासकीय पातळीवरील या कासवगतीचा लाभ परिसरातील भिकारी व दारूड्यांनी उचलला असून, त्यांनी स्मारकावर ठाण मांडले आहे.

सावरकर जन्मभुमी व दारणा नदीचा नैसर्गिक किनाऱ्यांच्या सौंदर्याचा समन्वय साधून भगुरचे तत्कालीन नगराध्यक्ष पा.भा.करंजकर यांनी कोट्यवधी रुपये खर्चुन भगुर नगर पालिकेच्या वतीने एकमेव सुंदर आकर्षक निसर्गरम्य उद्यान साकारले होते. त्यामुळे भगूरला भेट देण्यासाठी हमखास पर्यटक येत तसेच याठिकाणी अनेकांचे शाहीथाटात शुभ विवाह देखील पार पडत होते. या उद्यानामुळे सावरकरभुमीची शान वाढली होती. मात्र चार ते पाच वर्षात राजकारण बदलले भगुर नगर पालिकेचे या उद्यानाकडे दुर्लक्ष झाले आणि उद्यानाला अवकला आली. उद्यानातील खेळणी, साहित्य गायब झाले. विविध सौंदर्ययुक्त झाडे नष्ट झाली. अलीशान हिरवळीची जागा गाजरगवताने घेतली. उद्यानाचे जंगलात रूपांतर झाले. त्यामुळे दारुड्यांना नवीन अड्डाच तयार झाला. या जागेचा सावरकर जन्मस्थान स्मारकात रुपांतर झाले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवून उद्यानाला नव्याने बनविण्याची मागणी केली. त्यामुळे मंध्यतरी नगरपालिकेने नवीन आराखडा तयार केला. परंतु नियोजन नसल्याने त्याचे नुतनीकरण वेळेत पुर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगुर नगरपालिकेच्या निवडणूका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणूक निकालानंतर हा मुद्दा पुन्हा विस्मरणात जातो.गेल्या एक वर्षापासून उद्यानाच्या नुतनीकरणाचे काम भगुर नगर पालिकेकडून सुरू करण्यात आले असून, परंतु काम अतिशय धिम्या गतीने केले जात आहे. ठेकेदाराच्या चौकीदाराने याठिकाणी झोपडे बांधून देखभाल ठेवली असली तरी, याठिकाणी दररोज संध्याकाळी दारू पिण्यासाठी अनेक तरुण येवून बसतात तर परिसरातील भिकारी येथे जेवण तयार करून वास्तव्य करतात. घाणीचे साम्राज्य वाढले असून, काम केव्हा पुर्ण होईल याची शाश्वती नाही.यासंदर्भात भगुर पालिका प्रशासन मुख्यलिपिक रमेश राठोड म्हणाले, सावरकर उद्यानाचे काम ऋतुजा कन्ट्रक्शन कंपनीकडे दिले असून, ते लवकरच पुर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. भगुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अँड विशाल बलकवडे यांनी, भगुरची सत्ताधारी शिवसेना गेल्या २० वर्षापासुन सावरकर उद्यानावर राजकारण करत आहे, परंतु गावात अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरली असून, उद्यानाचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे यासाठी आंदोलन करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला. माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख म्हणाले, उद्यानाच्या कामासाठी २ कोटी ६० लाखाची मंजुरी मिळाली आहे. एक वर्षात काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. प्रभागातील शिवसेना नगरसेविका कविता कैलास यादव म्हणाल्या, सावरकर उद्यानाचे बांधकाम टप्पा पुर्ण होऊन घाटाचे आर. सी. सी. कंपाऊंडचे काम सुरू आहे. लवकरच विविध कारंजे व शुशोभिकरणाचे काम पुर्ण होईल.( फोटो ०२ भगुर, एक, दोन- भगुर सावरकर उद्यान दुरावस्था आणि भिकारी स्थान)छायाचित्रे:- विलास भालेराव भगुर

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक