शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: April 6, 2016 23:13 IST

महिलांचे आरोग्य धोक्यात

रत्नागिरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला आवर्जून खरेदी केली जाते. हिंदू धर्मियांच्या नववर्षाला प्रारंभ होत असल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज होत आहे. मात्र, सध्या मासेमारीवर असलेली बंदी, सराफांचा बंद, आर्थिक संकटात सापडलेला आंबा व्यवसाय यामुळे बाजारपेठेतील उलाढाल थांबली आहे. त्याचा परिणाम पाडव्याच्या खरेदीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यावर्षी पाडवा शुक्रवारी असल्याने, शिवाय दुसरा शनिवार व रविवार मिळून नोकरदार मंडळींना कार्यालयीन कामकाजात सलग तीन दिवस जोडून सुटी आली आहे. पाडव्याला सोने, चांदीचे अलंकार खरेदी केले जातात. मात्र, सराफी व्यवसाय बंद असल्याने नवीन खरेदी महिनाभर थांबली आहे. पाडव्याला वस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, तयार घरे, जमिनींची खरेदी केली जाते, किंबहुना आधी खरेदी केलेल्या वस्तू पाडव्याच्या दिवशी घरी आणल्या जातात. परंतु मासेमारी व त्यावर अवलंबून असलेले अन्य व्यवसाय बंद आहेत. शिवाय आंब्याच्या उत्पादनात घट शिवाय दरातील कमालीची घसरण यामुळे स्थानिक बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण ठरवणारे महत्त्वाचे व्यवसाय बंद झाल्याने त्याचा परिणाम खरेदीवर होणार आहे.फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भेटवस्तूची सुविधा विक्रेत्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने, गृहसंकूल प्रकल्प व्यावसायिकांनीही आकर्षक भेट योजना जाहीर केल्या आहेत. सेकंड होमसाठी गुंतवणूक मात्र कर्मचारीवर्गातून सुरू असली तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. शिवाय लोकेशन व दर्जा पाहून खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.बाजारात कडूनिंबाचा पाला, झेंडूची फुले, बत्ताशांच्या माळा, वस्त्र, बांबू विक्रीसाठी आले आहेत. शिवाय तयार गुढ्यादेखील विक्रीस उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)दर्जाकडे लक्ष : कर्मचाऱ्यांची गुंतवणूकस्थानिक बाजारपेठेतील आर्थिक मंदी, शिवाय जागतिक मंदीची झळ कमी - अधिक प्रमाणात सर्वांनाच बसत आहे. दरवेळच्या विक्रीप्रमाणे यावर्षी विक्री नसली तरी कामाचा दर्जा व सुविधा याकडे ग्राहकांचा कटाक्ष आहे. त्यामुळे सध्या आमच्याकडे ग्राहकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी आहे. बुकिंग सुरू आहे. पझेशन सोहळा एकाच दिवशी आयोजित केला जातो.राजेश शेट्ये, बिल्डर, रत्नागिरी.मासेमारी पूर्णत: बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसायही बंद आहेत. स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. आंबा व्यवसाय गेली काही वर्षे संकटात आला आहे. रिअल इस्टेट गुुंतवणुकीस त्याची झळ बसत आहे. लोकेशन पाहून खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासकीय कर्मचारीवर्ग आवश्यकतेनुसार बुकिंग करीत आहे.- प्रकाश साळवी, बिल्डर, रत्नागिरी