शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गत वर्षापासूनच महिलांची ‘अस्मिता’ थंड बस्त्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ‘अस्मिता प्लस’ योजनेला वर्षभरातच घरघर लागली असून, गत सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन्स मिळणे बंद झाले आहे.

धनंजय रीसोडकर।नाशिक : राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ‘अस्मिता प्लस’ योजनेला वर्षभरातच घरघर लागली असून, गत सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन्स मिळणे बंद झाले आहे.नाशिक जिल्ह्यातून ३९ महिला बचतगटांनी त्यासाठी नोंदणी केलेली असून, त्यांना गत दिवाळीनंतर सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठाच झालेला नसल्याने मोठ्या कंपन्यांच्या दबावातून ही योजना गुंडाळली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त यंत्रणेलादेखील योजनेच्या अंमलबजावणीच्या खंडाबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे.गतवर्षी १६ लाखांवर महिला लाभार्थीतब्बल १५ लाख ९८ हजारपेक्षा जास्त महिला आणि जिल्हा परिषद शाळेतील ४७ हजारपेक्षा जास्त मुलींनी या शासकीय योजनेचा लाभ घेतला होता. २८ हजार पेक्षा जास्त महिला अस्मिता सॅनिटरी नॅपकिन विक्र ीचा व्यवसाय करीत असल्याची शासनाकडे नोंद होती. तसेच त्यांना सॅनिटरी नॅपकिन पोस्टाद्वारे घरपोच मिळणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अस्मिता अ‍ॅपद्वारे अस्मिता, अस्मिता प्लस व अस्मिता बजार या तिन्ही योजनांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.माफक दरात सॅनिटरी पॅडअस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यास प्रारंभ झाला होता. दोन आकारांची आठ नॅपकिन्सची पाकिटे ग्रामीण महिलांना अनुक्रमे २४ आणि २९ रु पयांना उपलब्ध करून देण्यात आली होती. वितरकांकडून सॅनिटरी नॅपकिनचे पाकिटे खरेदी करून बचत गटांमार्फत त्यांची परस्पर विक्र ी करण्यासही मंजुरी देण्यात आली होती.पाच रुपयातील सुविधाग्रामीण भागातील फक्त १७ टक्के महिला या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. उर्वरित महिलांना त्यांच्या किमती परवडत नसल्याने सॅनिटरी नॅपकिनच्या वापराअभावी विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच मुली आणि महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजना जाहीर करण्यात आली होती. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांमध्ये आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना राबविण्यात आली होती. तसेच मुलींना वर्षभरात १३ पाकिटे उपलब्ध करून देण्याचा निर्णयदेखील झाला होता.सात लाख मुलींना अस्मिता कार्डअस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १७ वयोगटांतील किशोरवयीन मुलींना त्यासाठी किशोरवयीन मुलींची आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करून त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुली बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकिन खरेदी करतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण सात लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार नियोजन आखण्यात आले होते. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पाच रु पयांप्रमाणे विक्र ी केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट १५.२० रु पयांप्रमाणे अनुदान शासन बचतगटांना देण्याचे निश्चित झाले होते.

टॅग्स :Womenमहिलाnmmcनवी मुंबई महापालिका