शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गत वर्षापासूनच महिलांची ‘अस्मिता’ थंड बस्त्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ‘अस्मिता प्लस’ योजनेला वर्षभरातच घरघर लागली असून, गत सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन्स मिळणे बंद झाले आहे.

धनंजय रीसोडकर।नाशिक : राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ‘अस्मिता प्लस’ योजनेला वर्षभरातच घरघर लागली असून, गत सहा महिन्यांपासून मोफत किंवा अत्यल्प दरातील सॅनिटरी नॅपकिन्स मिळणे बंद झाले आहे.नाशिक जिल्ह्यातून ३९ महिला बचतगटांनी त्यासाठी नोंदणी केलेली असून, त्यांना गत दिवाळीनंतर सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठाच झालेला नसल्याने मोठ्या कंपन्यांच्या दबावातून ही योजना गुंडाळली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त यंत्रणेलादेखील योजनेच्या अंमलबजावणीच्या खंडाबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे.गतवर्षी १६ लाखांवर महिला लाभार्थीतब्बल १५ लाख ९८ हजारपेक्षा जास्त महिला आणि जिल्हा परिषद शाळेतील ४७ हजारपेक्षा जास्त मुलींनी या शासकीय योजनेचा लाभ घेतला होता. २८ हजार पेक्षा जास्त महिला अस्मिता सॅनिटरी नॅपकिन विक्र ीचा व्यवसाय करीत असल्याची शासनाकडे नोंद होती. तसेच त्यांना सॅनिटरी नॅपकिन पोस्टाद्वारे घरपोच मिळणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अस्मिता अ‍ॅपद्वारे अस्मिता, अस्मिता प्लस व अस्मिता बजार या तिन्ही योजनांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.माफक दरात सॅनिटरी पॅडअस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यास प्रारंभ झाला होता. दोन आकारांची आठ नॅपकिन्सची पाकिटे ग्रामीण महिलांना अनुक्रमे २४ आणि २९ रु पयांना उपलब्ध करून देण्यात आली होती. वितरकांकडून सॅनिटरी नॅपकिनचे पाकिटे खरेदी करून बचत गटांमार्फत त्यांची परस्पर विक्र ी करण्यासही मंजुरी देण्यात आली होती.पाच रुपयातील सुविधाग्रामीण भागातील फक्त १७ टक्के महिला या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. उर्वरित महिलांना त्यांच्या किमती परवडत नसल्याने सॅनिटरी नॅपकिनच्या वापराअभावी विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच मुली आणि महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजना जाहीर करण्यात आली होती. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपयांमध्ये आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना राबविण्यात आली होती. तसेच मुलींना वर्षभरात १३ पाकिटे उपलब्ध करून देण्याचा निर्णयदेखील झाला होता.सात लाख मुलींना अस्मिता कार्डअस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १७ वयोगटांतील किशोरवयीन मुलींना त्यासाठी किशोरवयीन मुलींची आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करून त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुली बचत गटांकडून सॅनिटरी नॅपकिन खरेदी करतील. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण सात लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार नियोजन आखण्यात आले होते. अस्मिता कार्डधारक किशोरवयीन मुलींना पाच रु पयांप्रमाणे विक्र ी केलेल्या पॅकेटच्या संख्येच्या प्रमाणात प्रती पॅकेट १५.२० रु पयांप्रमाणे अनुदान शासन बचतगटांना देण्याचे निश्चित झाले होते.

टॅग्स :Womenमहिलाnmmcनवी मुंबई महापालिका