शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:41 IST

पिंपळगाव बसवंत :नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही. शिवाय स्थानिक ग्रामपंचायतीने देखील अशा वस्तीची जबाबदारी झटकून टाकली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील आदिवासी महिलांवर जीवघेणी कसरत करत पाणी आणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देउदासीनता : कारामाई नदीच्या पाण्यात जीवमुठीत घेऊन मार्गक्रमण

पिंपळगाव बसवंत :नाशिक जिल्ह्याची वाटचाल स्मार्ट सिटी कडे सुरू आहे ही गोष्ट आनंदाची आहे पण स्वतंत्र काळापासून निफाड तालुक्यात असलेल्या नांदुर्डी गावाच्या परिसरातील आदिवासी वस्त्यांकडे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेने ढुकुन देखील बघितलेले नाही. शिवाय स्थानिक ग्रामपंचायतीने देखील अशा वस्तीची जबाबदारी झटकून टाकली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील आदिवासी महिलांवर जीवघेणी कसरत करत पाणी आणण्याची वेळ आली आहे.गावाच्या स्मशानभूमी जवळील व राणवड कारखान्यालगत डाव्या कालव्या जवळ असलेल्या दोन आदिवासी वस्त्या या वस्तीत पाणी, घरकुल, शौचालय, लाईट, रस्त्यांविना उपेक्षा आजही सुरु असल्याचे भयाण वास्तव पहावयास मिळत आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नांदुर्डी व उगाव खेड या दोन्ही गावाच्या मधोमध असलेली कारामाईनदी ओलांडून उगावखेड येथील शेतकरी निफाडे यांच्या विहिरीतून पाणी आणावे लागते पण नदीचा ओस वाढला तर पाण्यासाठी जीव पाण्यातच वाहून जाईल ही भीतीही न बाळगता या महिलांची नदीतून ही कसरत शासनाने वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे. सहाशे ते सातशे आदिवासी लोक वस्ती असलेल्या नांदर्डी गावातील सूर्यवंशी नगर व राघोजी भांगरे नगर अशा दोन आदिवासी वस्तीत चारशे ते पाचशे नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड , रेशन कार्ड देखील आहे मात्र परिसरात कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर येतात व निवडणूका झाल्यावर फिरकून पण पाहत नाही.परिणामी त्या वस्तीतील बांधवाना कुठल्याही सोयी व सुविधा नसल्याने आत्ता पर्यंत लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासनाचीच खैरात वाटली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.आदिवासी समाजाच्या बोटावर मोजता येतील एवढ्या गरजा आहे पण कोणत्याही नेत्याने किंवा शासनाने त्या सोडवण्याचा प्रत्यन केला नाही. वारंवार पत्रव्यवहार व हंडा मोर्चा करून देखील गेंड्याच्या कातढ्याच शासन दखल घेत नाही. नेते, पुढारी जेवढे जबाबदार आहे तेवढे सरकारी यंत्रणाही आहे. या उपेक्षित लोकांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत.- वंदना कुडमते, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा, आदिवासी शक्ती सेनाजोराचा पाऊस असल्याने नदीला पूर आला होता. त्यामुळे चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणी नव्हते. घराच्या बाहेर हंड्यात साचलेले पावसाचे पाणीच दोन दिवस प्यायला लागले. त्यामुळे काही जण आजारीही पडले पण नाईलाज होता आज पूर ओसरला तेव्हा नदीच्या पलीकडे असलेल्या उगाव खेडे या गावातून पाणी आणले.- सरला कोकाटे, नांदुर्डी

फोटो :नांदुर्डी गावातील आदिवासी महिलांची पाण्यासाठी वाहत्या नदीतून सुरू असलेली भटकंती. (26पिंपळगाव1)

 

टॅग्स :Rainपाऊसwater pollutionजल प्रदूषण