शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्त्रियांनी स्वत:ची शक्ती ओळखावी : दीपाली सय्यद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:27 IST

नारीशक्तीने नेहमीच आपले सामर्थ्य दाखविले असून, कोणत्याही प्रसंगातून आणि कष्टातून स्त्रीने स्वत:ला सिद्ध केले आहे. तिच्यात उपजतच कुटुंबाला सावरण्याची आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती असते.

नाशिक : नारीशक्तीने नेहमीच आपले सामर्थ्य दाखविले असून, कोणत्याही प्रसंगातून आणि कष्टातून स्त्रीने स्वत:ला सिद्ध केले आहे. तिच्यात उपजतच कुटुंबाला सावरण्याची आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती असते. स्त्रीने आपल्याती शक्ती ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केले.प. सा. नाट्यमंदिर येथे अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अस्तित्व पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी सय्यद बोलत होत्या. व्यासपीठावर सीताबाई मोहिते, रोहिणी वाघ, विमल पटेल, संगीता सोनवणे, सुनंदा पटवर्धन, विजया मानमोडे उपस्थित होत्या. यावेळी दीपाली सय्यद म्हणाल्या, प्रत्येक स्त्रीला आत्मसन्मान असतो. या आत्मसन्मानाचे रक्षण कुटुंब आणि समाजानेही करणे अपेक्षित आहे स्त्रीच्या कामाचे कौतुक झाले आणि तिला प्रोत्साहन मिळाले तर स्त्री कोणत्याही क्षेत्रात आपली प्रतिमा निर्माण करू शकते. तिला संधीची गरज आहे, असे म्हणाल्या. प्रास्ताविक फाउंडेशनच्या अध्यक्ष सुवर्णा कोठावदे यांनी केले, तर सूत्रसंचालन सोनाली म्हरसाळे यांनी केले.यांचा झाला सत्कारदीपाली सय्यद यांच्या हस्ते डॉ. मेघा ताडपत्रीकर (पुणे), सीताबाई मोहिते (जालना), आदिवासींसाठी लढा देणाऱ्या डॉ. प्रतिभा शिंदे (धुळे), प्रमिला कोकड (जव्हार), संपदा हिरे, रोहिणी वाघ, शरीरसौष्ठवपटू स्नेहल कोकणे, धावपटू नलिनी कड, कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या नलिनी कड ( मुंबई), सुनंदा पटवर्धन (जव्हार), सुवर्णा कटारिया (सोलापूर), विजया मानमोडे (पुणे), सपना पारख (नाशिक), मेघा ताडपत्रीकर (पुणे), वीरमाता सुषमा मांडवगणे, रोहिणी वाघ, स्नेहा पाटील (नाशिक), प्रीती आगाज, एकादशी लोंढे (सांगली), प्रिती चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिला