शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महिलांनी स्वच्छंदी जीवन जगावे : किशोर पाठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:02 IST

रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्त्वाकांक्षी स्वप्ने या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरून जातात. परंतु, अशा परिस्थितीतही स्वत:ची स्वप्ने उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन महिलांनी स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले.

नाशिक : रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्त्वाकांक्षी स्वप्ने या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरून जातात. परंतु, अशा परिस्थितीतही स्वत:ची स्वप्ने उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रवाही होऊन महिलांनी स्वच्छंदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांनी केले.शरणपूररोड परिसरातील ज्योतिकलश सभागृहात विविध क्षेत्रात कार्यरत ‘ठेवा संस्कृतीचा’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपतर्फे दुसºया वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील मजले चिचोलीच्या सरपंच गीतांजली आव्हाड यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात व रेखा केतकर यांना अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी ‘प्रतिभावंत पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सदानंद जोशी, अभिनेत्री पल्लवी पटवर्धन, गीतांजली आव्हाड उपस्थित होते.किशोर पाठक म्हणाले, आयुष्यात सुख आणि आनंद मिळवायचा असेल तर ते उपभोगायलाही शिकले पाहिजे, आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण अनमोल आहे, तो मनसोक्त जगता आला पाहिजे. टोचणाºया, बोचणाºया क्षणिक भावनिक गोष्टींचा लगेच विसर पडून वर्तमान क्षणातला आनंद उपभोगता आला पाहिजे, असे मत किशोर पाठक यांनी व्यक्त के ले. यावेळी गायत्री बळगे, वैशाली साठे, सायली सप्रे, त्रिवेणी गोमासे, मनाली गर्गे, वैशाली घोडके, वैशाली शुक्ल आदी ठेवा संस्कृतीचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक