शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांनी तयार केले ५० हजार मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:50 IST

नाशिक जिल्ह्यात २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन करण्यात आले असून, सर्व प्रकारचे उद्योग, धंदे, व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत गरीब व हातमजुरी करणा-या नागरिकांचे हाल होत असले तरी, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत

ठळक मुद्देजि.प.चा पुढाकार : लॉकडाउनमध्ये रोजगार निर्मिती प्रत्येकाला मास्क वापरण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात येऊन उद्योगधंदे, रोजगार निर्मिती बंद झालेली असताना नाशिक जिल्हा परिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या मास्कचा तुटवडा भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना प्रोत्साहित केले आहे. गेल्या आठ दिवसांत महिला बचत गटांनी ५० हजार मास्कची निर्मिती करण्याबरोबरच घरच्या घरी रोजगार निर्मितीला हातभार लावला आहे.

नाशिक जिल्ह्यात २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन करण्यात आले असून, सर्व प्रकारचे उद्योग, धंदे, व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत गरीब व हातमजुरी करणा-या नागरिकांचे हाल होत असले तरी, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थाही बाधित झाली आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांना विविध उपाययोजना सुचविण्यात येत असताना त्यात प्रत्येकाला मास्क वापरण्याची सूचना करण्यात आलेली आहे. परंतु रुग्णालये, औषधी दुकानांमध्ये मास्कचा तुटवडा भासत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामीण भागातील महिला बचत गटांनाच त्यासाठ प्रोत्साहित केले आहे. मास्कची निर्मिती करून ती प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींना वितरीत करून नागरिकांमध्ये मास्कची उपयोगीता व बचत गटांना रोजगाराची सोय त्यामुळे निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांत ३२ गटांच्या माध्यमातून सुमारे ५० हजारांहून अधिक कापडी मास्क तयार करण्यात आले असून, त्यातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची गरज भागविली जात आहे. मास्कला असलेली मागणी पाहता गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बचत गटांशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या आहेत.चौकट===आशा, अंगणवाडी सेविकांकडून जनजागृतीकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच ग्रामीण भागात जनजागृतीसाठी आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले जात असून, त्यात प्रामुख्याने हात स्वच्छ धुणे, गर्दीपासून दूर राहणे आदी बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतींनीदेखील याकामी पुढाकार घेतला असून, आठवडे बाजाराऐवजी दररोज गावातील एका व्यक्तीला भाजीपाला विक्रीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी

 

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद