शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:51 IST

खर्डे : देवळा तालुक्यातील अतिदुर्गम वार्शी गावाला धरण उशाशी असतांना देखील हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने संतप्त आदिवासी महिलांनी सरपंच बळीराम वाघ यांच्या नेतृत्वाखाली देवळा पंचायत समतिीवर मोर्चा काढला.

खर्डे : देवळा तालुक्यातील अतिदुर्गम वार्शी गावाला धरण उशाशी असतांना देखील हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने संतप्त आदिवासी महिलांनी सरपंच बळीराम वाघ यांच्या नेतृत्वाखाली देवळा पंचायत समतिीवर मोर्चा काढला. यावेळी गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आल. तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा वार्शी गावातील पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाल्याने गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे . धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था वार्शी गावातील नागरिकांची झाल्याने सरपंच बळीराम वाघ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी महिलांनी देवळा पंचायत समितीवर मोर्चा काढला . वार्शी व हनुमंतपाडा ग्रुप ग्रामपंचायत असून , हनुमंतपाड्याला बोअरवेल्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे . गेल्या काही वर्षभरापूर्वी वार्शी गावात राष्ट्रीय पेयजल योजनेंतुन स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे .मात्र ही योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली नाही . गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर असतांना देखील गावाला सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नगरिकांमध्ये या योजने विषयी संभ्रम निर्माण झाला आहे . या गंभीर समस्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला . याची दखल घेऊन गावाला सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा , अशी मागणी गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ,याप्रसंगी जाईबाई पवार , प्रतिभा पवार ,संगीता पवार ,बिबाबाई पवार ,अरु णा पवार ,गोतमाबाई पवार ,सुमन पवार , सविता वाघ ,मनीषा मोरे ,काळूबाई माळी ,सुमनबाई वाघ , बायजाबाई माळी ,मंदा मोरे , सरु बाई पवार ,मंगल वाघ ,वर्षा वाघ आदिंसह महिला उपस्थित होत्या .

टॅग्स :Nashikनाशिक