शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दिंड्यांविना यंदा त्र्यंबकच्या वाटा सुन्यासुन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 16:31 IST

देवगांव : दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवार (दि.७) पासून सुरू होत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकच्या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे. यात्रा रद्द करतानाच संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात संचारबंदी लागू केल्याने यावर्षी दिंड्यांची संख्या घटली आहे. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दिंड्या त्र्यंबककडे मार्गस्थ होत असल्या तरी त्यांनाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देरस्त्यांवर शुकशुकाट : यात्रा रद्द झाल्याने परंपरेत खंड

देवगांव : दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवार (दि.७) पासून सुरू होत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकच्या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे. यात्रा रद्द करतानाच संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात संचारबंदी लागू केल्याने यावर्षी दिंड्यांची संख्या घटली आहे. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दिंड्या त्र्यंबककडे मार्गस्थ होत असल्या तरी त्यांनाही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.यात्रेसाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पायी दिंड्यांसह वारकरी, भक्तजण ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करीत त्र्यंबककडे मार्गक्रमण करतात. यात्रेच्या तीन-चार दिवस अगोदरच त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या दिंड्यांमुळे वातावरण भावभक्तिमय होऊन जाते. टाळ-मृदुंगाच्या गजराने व माऊलीच्या भजनाने येथील रस्ते दुमदुमून जातात. तसेच रस्त्यांवरील गावामध्ये दिंड्या मुक्कामास थांबून तेथील वातावरण भक्तिमय करतात. यात स्थानिक नागरिकही सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा करतात. मात्र, यंदा कोरोनामुळे पंढरपूरसह आळंदीच्याही यात्रा रद्द झाल्या आहेत.दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवारपासून सुरू होत आहे. पण त्र्यंबकनगरीच्या वाटा मात्र यंदा सुन्याच आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी ओसरत असला तरी खुल्या यात्रेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. प्रशासनाकडून वेळोवेळी गर्दी टाळण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ मंदिर परिसरात तीन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी अनेक दिंड्या यंदा रद्द करण्यात आल्या असल्याचे वारकरी सांगत आहेत. मात्र, वारीची परंपरा अखंडित राहावी म्हणून दिंडीतील काही मोजकेच वारकरी देवगांवमार्गे त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत.वारकरी मंडळींचा प्रतिसादयात्रेच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी वारकरी दर्शन घेऊन मुक्कामास न राहता लगेचच परततांना दिसत आहेत. रस्त्याने जाताना वारकऱ्यांसाठी स्थानिक होतकरू सांप्रदायिक नागरिक फळे व जेवणाची व्यवस्था करत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे जाणाऱ्या दिंड्या आज तुरळक वारकऱ्यांनी दिसत आहेत. दिंडीत फार तर पाच सहाच वारकरी दिसतात. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या तीन-चार दिवसांपूर्वी दिंडी सोहळ्याची गर्दी खूप असते. यंदा मात्र, दिंडी सोहळे तुलनेत कमी आहेत.- इंदूबाई रोकडे, वारकरी, देवगांव

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर