शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

दोन महिन्यांतच धरण भरले: नाशिककर निर्धास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 19:49 IST

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी यंदा गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी देण्याची गरज भासणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने नाशिककर निर्धास्तगंगापूर धरणात ४६८२ दलघफू म्हणजे ८३ टक्के इतका पाणीसाठामागील वर्षी याच कालावधीत ७९ टक्के पाणीसाठा होता

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातील पाणीसाठा पावसाळ्यातील दोन महिन्यांतच ८३ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सुमारे ३० ते ३५ टीएमसी पाणी वाहून गेल्याने यंदा गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी देण्याची गरज भासणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने मुबलक पाणीसाठ्यामुळे नाशिककर निर्धास्त झाले आहेत.

गंगापूर धरणातील पाणीसाठ्यावर नाशिककरांचा वर्षभराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. दोन वर्षांपूर्वी, मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीमुळे गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्याने नाशिककरांनी पाणीकपातीच्या माध्यमातून टंचाईची धग अनुभवली होती. त्याचे तीव्र पडसादही उमटले होते. त्यानंतर, मागील वर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होऊन धरणात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली होती परंतु, पुन्हा जायकवाडीसाठी पाणी जाण्याची चिंता होती. परंतु, तशी वेळ जलसंपदा विभागावर आली नाही. यंदा, फेब्रुवारीतच हवामान खात्याने सरासरी इतक्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने नाशिककर सुखावले होते. जून आणि जुलै या दोन महिन्यांत वरुणराजाने नाशिक शहरावर कृपावृष्टी केली. आर्द्रा आणि पुनर्वसू तसेच पुष्य नक्षत्रातील पावसाने भरभरून हजेरी लावली. पावसाच्या संततधारेमुळे जुलैच्या मध्यातच गंगापूर धरणातून विसर्ग करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली आणि लोकप्रतिनिधींनाही जलपूजनाची लवकर संधी लाभली. जुलै महिन्यात अधिक काळ गोदावरी दुथडी भरून वाहण्याची अनुभूती नाशिककरांनी घेतली. दि. ५ आॅगस्ट अखेर गंगापूर धरणात ४६८२ दलघफू म्हणजे ८३ टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत ७९ टक्के पाणीसाठा होता.