शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

अवघ्या दीड तासात शहर जलमय

By admin | Updated: June 15, 2017 01:03 IST

कोसळधार : रस्त्यावर साचले तळे, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; तळमजले पाण्यात, बुधवार बाजारावर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह बुधवारी (दि.१४) झालेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांची त्रेधातिरपिट उडविली. शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते, तर व्यापारी संकुलांसह रहिवासी सोसायट्यांचे तळमजले पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे हाल झाले. शहरासह उपनगरीय भागातील पावसाळी भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्याने शहरातील संपूर्ण रस्तेपाण्याखाली गेले होते.संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढगांचा गडगडाट सुरू झाला, याबरोबरच वाराही सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच पावसाने जोर धरला. मुसळधार पावसाला शहर व परिसरात सुरुवात झाल्याने अर्ध्या तासातच सर्व भागातील रस्ते जलमय झाले होते. तसेच इमारतींचे तळमजले पाण्याने तुडुंब भरल्याने व्यावसायिकांसह नागरिकांची धावपळ झाली. बुधवारचा आठवडे बाजार असल्यामुळे गोदाकाठावरील विक्रेत्यांबरोबरच नागरिकांचे मोठे हाल झाले. विक्रेत्यांचे धान्य, भाजीपाला पाण्यात वाहून गेला, तसेच काही विक्रेत्यांचे पैशांचे गल्लेही वाहून गेले. तसेच गोदाकाठाभोवती असलेल्या दुचाकीदेखील पाण्यात वाहून गेल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. धान्यविक्रेत्यांचे धान्याची पोती वाहून गेली. पावसाचा जोर जरी जास्त असला तरी गोदाकाठावरील भुयारी गटारीचे चेंबर तुडुंब भरून वाहत होते. गटारी व नाल्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने बाजारात दुर्गंधीयुक्त पाण्याचे पाट वाहू लागल्याने नागरिकांनी महापालिकेच्या गलथान कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील गंगापूररोड भागातही केटीएचएम कॉलेजसमोर एका बाजूला तळे साचल्याने रस्ता बंद करण्यात आला. आयटीआय पुलाजवळ रस्त्यावरील पाण्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळच्या वेळी शासकीय आस्थापना आणि खासगी कार्यालयांची सुटी झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल याची कल्पना नसल्याने तयारी नसलेल्या नागरिकांना विविध व्यापारी संकुले आणि अन्य कार्यालयाचा आसरा घ्यावा लागला. अनेकांच्या दुचाकी तळ्यांमध्ये अडकल्याने त्यांना त्या बाहेर काढणे मुश्कील झाले होते. मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.पालिकेचे मुख्यालय असलेल्या शरणपूररोडवरील राजीव गांधी भवनसमोर सुमारे अर्धा फूट इतके पाणी साचले होते. यामुळे सुयोजित ट्रेड संकुलातील तळमजले पाण्यात बुडाल्याने तळमजल्यावरील दुकानदारांचे हाल झाले. पालिकेच्या दारात पाण्याचा तलाव साचून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या भागात नागरिकांनी चेंबर खुले करून दिल्याने काही प्रमाणात पाणी प्रवाही करण्यात आल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.