शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

२२ दिवसांत जिल्ह्यात ४३ टक्के वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:04 IST

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे. त्यापैकी ६० टक्के लागवड वनविभागाने पूर्ण केली, तर एकूण सरासरी ४३ टक्के लागवड जिल्ह्यात यशस्वीपणे करण्यात आली आहे.पावसाने अचानकपणे दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पश्चिम विभागाच्या हद्दीतील तालुक्यांमध्ये वृक्षलागवडीला खोळंबा निर्माण झाला आहे. पावसाच्या उघडीपीमुळे ग्रामपंचायतींनीदेखील वृक्षारोपण थांबविले असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना केवळ १५ टक्क्यांपर्यंत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट २२ दिवसांत गाठणे शक्य झाले.जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायतींसह अन्य सरकारी व निमसरकारी संस्था मिळून १ कोटी ९२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. त्यापैकी ८८ लाख १९ हजार ७३६ रोपांची लागवड पूर्ण करण्यास वनविभागासह अन्य यंत्रणांना यश आले आहे.सामाजिक वनीकरणाने ६० टक्के, वनविकास महामंडळाने ४५ टक्के, तर ग्रामपंचायतीने १५ आणि अन्य यंत्रणांपैकी आरटीओने ५०, गृहखात्याने ५४, महापालिकेने २४ टक्के इतकी वृक्षलागवड केली आहे. क्रीडा विभाग अन्य यंत्रणांमध्ये आघाडीवर असून, उद्दिष्टाच्या९७ टक्क्यांपर्यंत लागवड पूर्ण केली आहे. अशी माहिती, सहायक सरंक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली़अभियानावर आॅनलाइन नियंत्रण३३ क ोटी रोपे लागवडीची मोहीम आॅनलाइन नियंत्रित केली जात आहे. यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय ‘डेडिकेटेड सेल’ स्थापन करण्यात आला आहे. तसेच मोहीम अधिकाधिक पारदर्शीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हानिहाय लावलेली रोपे, खड्ड्यांची संख्या, तयार रोपांची संख्या आदी माहिती संकलित केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.वन मंत्रालयाने ५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षारोपणाचा टप्पा यावर्षी राबविला.येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यभरात एकूण ३३ कोटी रोपांची लागवड करण्याचे ‘टार्गेट’ पूर्ण केलेजाणार आहे.४राज्यात वृक्षाच्छादनाचे क्षेत्र वाढवून पर्यावरणाचा समतोल व निसर्गसंवर्धनासाठी मंत्रालयाकडून हे अभियान राबविले जात आहे. रोपांच्या जगण्याचेप्रमाण येत्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मोजले जाणार आहे.पावसावरअभियानाचे यश४शहरासह जिल्ह्यात पर्जन्यमानाची स्थिती बिकट झाली असून, वृक्षारोपण अभियानाचे यश पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. कारण जिल्ह्यातील काही मोजकेच तालुक्यांत अद्याप चांगला पाऊस झाला आहे.४जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायतींसह अन्य सरकारी व निमसरकारी संस्था मिळून १ कोटी ९२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक