शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

२२ दिवसांत जिल्ह्यात ४३ टक्के वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:04 IST

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे. त्यापैकी ६० टक्के लागवड वनविभागाने पूर्ण केली, तर एकूण सरासरी ४३ टक्के लागवड जिल्ह्यात यशस्वीपणे करण्यात आली आहे.पावसाने अचानकपणे दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील पश्चिम विभागाच्या हद्दीतील तालुक्यांमध्ये वृक्षलागवडीला खोळंबा निर्माण झाला आहे. पावसाच्या उघडीपीमुळे ग्रामपंचायतींनीदेखील वृक्षारोपण थांबविले असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना केवळ १५ टक्क्यांपर्यंत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट २२ दिवसांत गाठणे शक्य झाले.जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायतींसह अन्य सरकारी व निमसरकारी संस्था मिळून १ कोटी ९२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. त्यापैकी ८८ लाख १९ हजार ७३६ रोपांची लागवड पूर्ण करण्यास वनविभागासह अन्य यंत्रणांना यश आले आहे.सामाजिक वनीकरणाने ६० टक्के, वनविकास महामंडळाने ४५ टक्के, तर ग्रामपंचायतीने १५ आणि अन्य यंत्रणांपैकी आरटीओने ५०, गृहखात्याने ५४, महापालिकेने २४ टक्के इतकी वृक्षलागवड केली आहे. क्रीडा विभाग अन्य यंत्रणांमध्ये आघाडीवर असून, उद्दिष्टाच्या९७ टक्क्यांपर्यंत लागवड पूर्ण केली आहे. अशी माहिती, सहायक सरंक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली़अभियानावर आॅनलाइन नियंत्रण३३ क ोटी रोपे लागवडीची मोहीम आॅनलाइन नियंत्रित केली जात आहे. यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय ‘डेडिकेटेड सेल’ स्थापन करण्यात आला आहे. तसेच मोहीम अधिकाधिक पारदर्शीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हानिहाय लावलेली रोपे, खड्ड्यांची संख्या, तयार रोपांची संख्या आदी माहिती संकलित केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.वन मंत्रालयाने ५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षारोपणाचा टप्पा यावर्षी राबविला.येत्या सप्टेंबर महिन्यात राज्यभरात एकूण ३३ कोटी रोपांची लागवड करण्याचे ‘टार्गेट’ पूर्ण केलेजाणार आहे.४राज्यात वृक्षाच्छादनाचे क्षेत्र वाढवून पर्यावरणाचा समतोल व निसर्गसंवर्धनासाठी मंत्रालयाकडून हे अभियान राबविले जात आहे. रोपांच्या जगण्याचेप्रमाण येत्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मोजले जाणार आहे.पावसावरअभियानाचे यश४शहरासह जिल्ह्यात पर्जन्यमानाची स्थिती बिकट झाली असून, वृक्षारोपण अभियानाचे यश पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. कारण जिल्ह्यातील काही मोजकेच तालुक्यांत अद्याप चांगला पाऊस झाला आहे.४जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वनविभाग, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, ग्रामपंचायतींसह अन्य सरकारी व निमसरकारी संस्था मिळून १ कोटी ९२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक