शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जिल्ह्यात वादळी वारा; वीज कोसळून आणखी तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:38 IST

जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक : जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात अवकाळी पावसाने  आठ बळी घेतले, तर मोठ्या प्रमाणावर पशुधनाचीहीहानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचेही नुकसान झाले आहे.  मंगळवारी जिल्ह्णातील मालेगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह विजेचा कडकडाट करीत पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी गावाच्या उत्तरेला न्याहाराई माता मंदिराचे पुजारी संपत उदार (६५) या वृद्धाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, वणी भागांत दुपारी ३ वाजेनंतर जोरदार पाऊस सुरू झाला असून, शेतकºयांची धावपळ उडाली आहे, तर बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरात योेगेश बापू शिंदे (३२) हा तरुण मेंढ्या चारत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यात झाडाखाली आश्रय घेतलेल्या योगेश शिंदे याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योेगेश हा साक्री तालुक्यातील आयाने येथील रहिवासी आहे. या दुर्घटनेनंतर त्याला तातडीने त्याच्या गावी नेण्यात आले. कळवण तालुक्यातील मौजे बिजोरे येथील शेतकरी विलास बबन वाघ यांच्या म्हशीच्या अंगावर दुपारी ३ वाजता वीज पडल्याने दगावली आहे. देवळा तालुक्यातील वाजगाव येथे अंगावर वीज पडून हौसाबाई कुंवर (७१) ही वृद्धा जागीच ठार झाली तर तिच्या शेजारीच बांधलेली शेळी देखील दगावली आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्णातील हवामानात कमालीचा बदल झाला असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली. मालेगाव येथे सोमवारी रात्री वादळी वाºयामुळे झाड कोसळून विकास अग्रवाल यांचा मृत्यू झालेला असताना मंगळवारी सकाळी ८ वाजता अवकाळी पावसाने शहरवासीयांना झोडपून काढले. रविवारी दिंडोरी तालुक्यात तीन व चांदवड तालुक्यात एक अशा चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाला असून, त्यापाठोपाठ पुन्हा वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.अवकाळी पावसाने सटाणा, मालेगाव, सिन्नर, नाशिक व निफाड तालुक्यांमधील ६८ गावे बाधित झाले असून, सुमारे २१ घरांची पडझड होऊन नऊ जनावरे दगावली.

टॅग्स :agricultureशेतीDeathमृत्यू