शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

जिल्ह्यात वादळी वारा; वीज कोसळून आणखी तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:38 IST

जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक : जिल्ह्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने सलग तिसºया दिवशीही आपली हजेरी कायम ठेवली असून, मंगळवारी बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात अवकाळी पावसाने  आठ बळी घेतले, तर मोठ्या प्रमाणावर पशुधनाचीहीहानी झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचेही नुकसान झाले आहे.  मंगळवारी जिल्ह्णातील मालेगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह विजेचा कडकडाट करीत पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी गावाच्या उत्तरेला न्याहाराई माता मंदिराचे पुजारी संपत उदार (६५) या वृद्धाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, वणी भागांत दुपारी ३ वाजेनंतर जोरदार पाऊस सुरू झाला असून, शेतकºयांची धावपळ उडाली आहे, तर बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरात योेगेश बापू शिंदे (३२) हा तरुण मेंढ्या चारत असताना अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यात झाडाखाली आश्रय घेतलेल्या योगेश शिंदे याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योेगेश हा साक्री तालुक्यातील आयाने येथील रहिवासी आहे. या दुर्घटनेनंतर त्याला तातडीने त्याच्या गावी नेण्यात आले. कळवण तालुक्यातील मौजे बिजोरे येथील शेतकरी विलास बबन वाघ यांच्या म्हशीच्या अंगावर दुपारी ३ वाजता वीज पडल्याने दगावली आहे. देवळा तालुक्यातील वाजगाव येथे अंगावर वीज पडून हौसाबाई कुंवर (७१) ही वृद्धा जागीच ठार झाली तर तिच्या शेजारीच बांधलेली शेळी देखील दगावली आहे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्णातील हवामानात कमालीचा बदल झाला असून, उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मंगळवारी सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली. मालेगाव येथे सोमवारी रात्री वादळी वाºयामुळे झाड कोसळून विकास अग्रवाल यांचा मृत्यू झालेला असताना मंगळवारी सकाळी ८ वाजता अवकाळी पावसाने शहरवासीयांना झोडपून काढले. रविवारी दिंडोरी तालुक्यात तीन व चांदवड तालुक्यात एक अशा चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाला असून, त्यापाठोपाठ पुन्हा वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.अवकाळी पावसाने सटाणा, मालेगाव, सिन्नर, नाशिक व निफाड तालुक्यांमधील ६८ गावे बाधित झाले असून, सुमारे २१ घरांची पडझड होऊन नऊ जनावरे दगावली.

टॅग्स :agricultureशेतीDeathमृत्यू