शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

अस्वस्थतेचे हुंदके अन् असंतोषाचे वारे !

By संजय पाठक | Updated: April 29, 2020 23:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : हमे यहॉँ क्यू रखा गया है... हमने क्या गुनाह किया है... हमे छोडते क्यू नही... असे असंख्य प्रश्न निवारा केंद्रात महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील स्थलांतरित करीत आहेत. आज उद्या निर्णय होईल आणि या अटकेतून सुटका होईल, अशी त्यांची असलेली अस्वस्थता आता संयम सोडण्याच्या मार्गावर आहे. येत्या ३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या सत्रात त्याचा फैसला न झाल्यास मग मात्र यंत्रणेला त्यांची आव्हान देणारी भाषा अडचणीची ठरू शकण्याची शक्यता आहे.

नाशिक : हमे यहॉँ क्यू रखा गया है... हमने क्या गुनाह किया है... हमे छोडते क्यू नही... असे असंख्य प्रश्न निवारा केंद्रात महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील स्थलांतरित करीत आहेत. आज उद्या निर्णय होईल आणि या अटकेतून सुटका होईल, अशी त्यांची असलेली अस्वस्थता आता संयम सोडण्याच्या मार्गावर आहे. येत्या ३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या सत्रात त्याचा फैसला न झाल्यास मग मात्र यंत्रणेला त्यांची आव्हान देणारी भाषा अडचणीची ठरू शकण्याची शक्यता आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिन्यात देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदीची घोषणा करण्यात आली आणि देशभरात आलेल्या स्थलांतरित मजुरांचे हाल झाले. हे लोंढे जमेल त्या साधनाने गावाकडे जात असताना देशाच्या, राज्याच्या आणि जिल्हा इतकेच नव्हे तर शहरांच्या सीमा सील झाल्या. राज्यातील आणि परराज्यातील शेकडो मजूर अडवून त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रात थांबविण्यात आले. त्यांना क्वॉरंटाइन करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असली तरी आता चौदा दिवसांचा सोडा अनेकांचा दुप्पट दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण झाला. परंतु बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. रोज वेळच्या वेळी भोजन मिळत असले तरी त्यापलीकडे काहीच काम नाही. सतत कुटुंबातील सदस्यांच्या आठवणी आणि घराच्या ओढीने सारेच अगतिक झाले आहेत.मुळात त्यांना थांबवून ठेवल्यानंतर त्यांना निवारा केंद्रात थोपविण्याचे कारण योग्य पध्दतीने समजावण्याची कोणतीची यंत्रणा नाही. त्यातच भाषेचा अडसर आणि अन्य अनेक गोष्टी अडचणीच्या असूनही ते राहत असताना सारेच जण मेटाकुटीस आले आहेत.नाशिक शहरातील महापालिकेच्या निवारा केंद्रात १५ निवारा केंद्रांत सुमारे आठशे नागरिक असून तीनशे तर परप्रांतीय आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात दोन हजार नागरिक आहेत. देशभरात लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत असेल म्हणून साऱ्यांनी तग धरला. परंतु नंतर ३ मेपर्यंत लॉकडाउनचा दुसरा टप्पा कळाल्यानंतर अनेक केंद्रांमध्ये शासकीय, मनपा कर्मचाºयांशी वाद घातल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाउनचा दुसरा टप्पा वाढल्यानंतर २० एप्रिल रोजी राज्याराज्यांची स्थिती बघून निर्णय शिथिलता देण्याबाबत निर्णय घ्यायचे केंद्र सरकारने सूतोवाच केल्याने या अडकलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु त्यानंतर स्थलांतरित मजुरांचा काहीच निर्णय झाला नसल्याने पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे.----जे काही होईल, ते गावीच होऊ द्या!निवारा केंद्रातून बाहेर पडल्यास अनेक अडचणी आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे कर्मचारी सांगत असले तरी परप्रांतीय नागरिक मात्र अत्यंत टोकाला पोहोचले असून, आम्हाला आमच्या कुटुंबीयांसमवेत असताना काही झाले तरी चालेल परंतु आता आम्हाला आता बाहेर पडू द्या, अशीच त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता सर्वांचे ३ मेपर्यंतच्या लॉकडाउनकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक