शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

अस्वस्थतेचे हुंदके अन् असंतोषाचे वारे !

By संजय पाठक | Updated: April 29, 2020 23:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : हमे यहॉँ क्यू रखा गया है... हमने क्या गुनाह किया है... हमे छोडते क्यू नही... असे असंख्य प्रश्न निवारा केंद्रात महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील स्थलांतरित करीत आहेत. आज उद्या निर्णय होईल आणि या अटकेतून सुटका होईल, अशी त्यांची असलेली अस्वस्थता आता संयम सोडण्याच्या मार्गावर आहे. येत्या ३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या सत्रात त्याचा फैसला न झाल्यास मग मात्र यंत्रणेला त्यांची आव्हान देणारी भाषा अडचणीची ठरू शकण्याची शक्यता आहे.

नाशिक : हमे यहॉँ क्यू रखा गया है... हमने क्या गुनाह किया है... हमे छोडते क्यू नही... असे असंख्य प्रश्न निवारा केंद्रात महिनाभरापासून लॉकडाउनमध्ये अडकलेले जिल्ह्यातील स्थलांतरित करीत आहेत. आज उद्या निर्णय होईल आणि या अटकेतून सुटका होईल, अशी त्यांची असलेली अस्वस्थता आता संयम सोडण्याच्या मार्गावर आहे. येत्या ३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या सत्रात त्याचा फैसला न झाल्यास मग मात्र यंत्रणेला त्यांची आव्हान देणारी भाषा अडचणीची ठरू शकण्याची शक्यता आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिन्यात देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदीची घोषणा करण्यात आली आणि देशभरात आलेल्या स्थलांतरित मजुरांचे हाल झाले. हे लोंढे जमेल त्या साधनाने गावाकडे जात असताना देशाच्या, राज्याच्या आणि जिल्हा इतकेच नव्हे तर शहरांच्या सीमा सील झाल्या. राज्यातील आणि परराज्यातील शेकडो मजूर अडवून त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रात थांबविण्यात आले. त्यांना क्वॉरंटाइन करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असली तरी आता चौदा दिवसांचा सोडा अनेकांचा दुप्पट दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण झाला. परंतु बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. रोज वेळच्या वेळी भोजन मिळत असले तरी त्यापलीकडे काहीच काम नाही. सतत कुटुंबातील सदस्यांच्या आठवणी आणि घराच्या ओढीने सारेच अगतिक झाले आहेत.मुळात त्यांना थांबवून ठेवल्यानंतर त्यांना निवारा केंद्रात थोपविण्याचे कारण योग्य पध्दतीने समजावण्याची कोणतीची यंत्रणा नाही. त्यातच भाषेचा अडसर आणि अन्य अनेक गोष्टी अडचणीच्या असूनही ते राहत असताना सारेच जण मेटाकुटीस आले आहेत.नाशिक शहरातील महापालिकेच्या निवारा केंद्रात १५ निवारा केंद्रांत सुमारे आठशे नागरिक असून तीनशे तर परप्रांतीय आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात दोन हजार नागरिक आहेत. देशभरात लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत असेल म्हणून साऱ्यांनी तग धरला. परंतु नंतर ३ मेपर्यंत लॉकडाउनचा दुसरा टप्पा कळाल्यानंतर अनेक केंद्रांमध्ये शासकीय, मनपा कर्मचाºयांशी वाद घातल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉकडाउनचा दुसरा टप्पा वाढल्यानंतर २० एप्रिल रोजी राज्याराज्यांची स्थिती बघून निर्णय शिथिलता देण्याबाबत निर्णय घ्यायचे केंद्र सरकारने सूतोवाच केल्याने या अडकलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु त्यानंतर स्थलांतरित मजुरांचा काहीच निर्णय झाला नसल्याने पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे.----जे काही होईल, ते गावीच होऊ द्या!निवारा केंद्रातून बाहेर पडल्यास अनेक अडचणी आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे कर्मचारी सांगत असले तरी परप्रांतीय नागरिक मात्र अत्यंत टोकाला पोहोचले असून, आम्हाला आमच्या कुटुंबीयांसमवेत असताना काही झाले तरी चालेल परंतु आता आम्हाला आता बाहेर पडू द्या, अशीच त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता सर्वांचे ३ मेपर्यंतच्या लॉकडाउनकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक