शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

निष्ठावंतांना डावलून "उपऱ्यां"साठी पायघड्यांचा प्रघात यंदा तरी मोडेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 00:09 IST

विधानसभा पोटनिवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या तयारीसाठी दंडबैठका सुरू झाल्या आहेत. शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. सत्तेचा लाभ सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला तर विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी त्यांचे बळ उपयोगात येते, हे नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळे स्वबळाचे दावे फोल असले तरी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी ते केले जात आहे. या नव्या वातावरणात ह्यउपऱ्यांह्णसाठी पायघड्या पसरण्याऐवजी ह्यनिष्ठावंतांह्णना राजकीय पक्ष न्याय देतात का, हे बघणे उत्सुकतेचे राहील.

ठळक मुद्देसर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची चिन्हे; निवडणुकीनंतर एकत्र येण्याची शक्यता

मिलिंद कुलकर्णी

कोरोनाचा कहर संपत आला असताना राजकीय नेते, मंत्र्यांचे दौरे वाढू लागले आहेत. निवडणुकांचा माहोल सुरू झाला, याचा अंदाज त्यावरून सर्वसामान्य जनतेने बांधला आहे. कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका पुढील वर्षी घेण्याचे नियोजन दिसतेय. प्रशासक नियुक्ती, मुदतवाढ हे उपाय सामान्य कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करतात, हे राजकीय नेत्यांना पुरेसे ठाऊक आहे. त्यामुळे आता निवडणुका न लांबवता सत्तेचे विकेंद्रीकरण करून कार्यकर्त्यांना सत्तेचे लाभ मिळावे, यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.महाविकास आघाडीचे सूत्रधार शरद पवार यांनी पुढील सर्व निवडणुका आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न असेल असे म्हटले असले तरी प्रत्यक्षात तसे होणार नाही. प्रत्येक पक्षाचे प्रभावक्षेत्र आहे. त्या ठिकाणी वाटेहिस्से करायला कोणी तयार होणार नाही. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील आणि सत्ता स्थापनेसाठी आघाडीचा प्रयोग करतील, असे एकंदरीत चित्र आहे. आघाडी केल्यास कार्यकर्त्यांना न्याय देताना नेत्यांना अडचणी येतील, हे त्यामागील प्रमुख कारण आहे.नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिकांमध्ये त्यांचा स्वबळाचा नारा राहील. जिल्हा बँकेसह सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने ते कोणालाही वाटेकरी करणार नाहीत.कॉंग्रेसची अवस्था बिकटशिवसेनेने नाशिकसोबत ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत केले असले, तरी त्यांचा प्रतिस्पर्धी भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षदेखील आहे. त्यामुळे आघाडी सरकारमधील घटक पक्षाशी जुळवून घेताना सेनेची तारांबळ उडत आहे. संपर्क नेते संजय राऊत यांनी भुजबळ - कांदे वादात घेतलेली सावध भूमिका त्याचेच निदर्शक आहे. राष्ट्रवादीला दुखवायचे नाही, मात्र कार्यकर्त्यांना रोखायचे नाही, असे धोरण सेना नेत्यांनी स्वीकारलेले दिसते. नाशिक व मालेगाव या दोन्ही महापालिका निवडणुकीत सेनेची कसोटी लागणार आहे. नाशकात भुजबळ यांच्याशी जुळवून घ्यायचे म्हटले तर सेनेच्या मातब्बर नगरसेवकांना तडजोडी कराव्या लागतील. काही जागा सोडून द्याव्या लागतील. ते अवघड दिसते. मालेगावात राष्ट्रवादीने नियोजनबद्ध पावले उचलली असून, कॉंग्रेसच्या माजी आमदाराला गळाला लावले आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांना सेनेचा प्रभाव दाखविण्याची ही संधी आहे.कॉंग्रेस अस्तित्वाचा प्रश्नकॉंग्रेससाठी या निवडणुका अस्तित्वाचा प्रश्न बनल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत सगळ्या स्थानिक नेत्यांना बोलावून पाच तास चर्चा केली. नेत्यांची भूमिका ऐकून घेतली. प्रदेश कार्यकारिणीवरील नियुक्ती आणि जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलावरुन सुरु झालेली सुंदोपसुंदी याची पार्श्वभूमी या बैठकीमागे होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी त्र्यंबकेश्वर येथे तालुकानिहाय आढावा बैठका घेतल्या. सत्ताधारी पक्ष असल्याने बैठकांना गर्दी होती. ती पाहून थोरात यांनी मार्मिक प्रश्न विचारला, मतदानात ही गर्दी का रुपांतरित होत नाही. कॉंग्रेसला हाच प्रश्न या निवडणुकीतही भेडसावणार आहे.भाजपचे "एकला चलो रे"राज्य सरकार पडत नाही आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विकासकामे केली तरी त्याचा प्रभाव पडतो की नाही, याविषयी भाजप नेते संभ्रमात आहेत. मनसेशी युतीची चर्चा असली तरी नाशिक महापालिकेत ते अवघड दिसते. त्यामुळे भाजपची ह्यएकला चलो रेह्ण ही भूमिका राहील. तिरंगी लढतीचा फायदा मिळवायची भाजपला आशा आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा