शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे मिशन महापालिका यंदा होईल का फत्ते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

मनसेच्या सत्ताकाळात खूप कामे झाली. राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाउंडेशन अशा अनेक कंपन्यांकडून निधी आणला आणि ...

मनसेच्या सत्ताकाळात खूप कामे झाली. राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाउंडेशन अशा अनेक कंपन्यांकडून निधी आणला आणि नाशिकचे कॉस्मेटिक चेंजदेखील केले. मात्र, आम्ही केलेले काम लोकापर्यंत पोहोचवू शकलो नाहीत असे राज ठाकरे यांनी मान्य केले. त्यामुळे नव्याने उभारी घेऊन मनसेने नाशिककरांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना राज ठाकरे नाशकात आले होते. त्यांनी त्यांच्या नाशकातील समर्थकांनादेखील साद घातली होती. मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकमध्ये झालेली आंदोलने तसेच मुलांच्या करिअरविषयक उपक्रमांमुळे मनसे घराघरांत पाेहोचली. प्रस्थापित पक्षांना नवा पर्याय सापडल्याने अगदी शाळकरी मुलांमध्येदेखील आकर्षण होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार निवडून आले. इतके घवघवीत यश मिळवल्यानंतर २०१२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे तब्बल चाळीस नगरसेवक निवडून आले. खरे तर बहुमताचा आकडा मनसेला गाठता आला नाही, मात्र सर्वाधिक नगरसेवक मनसेचे निवडून आल्याने या पक्षाला संधी मिळाली. भाजपने साथ दिली. या पक्षाचे १४ नगरसेवक मिळाल्याने बहुमताचा जादुई आकडा मनसेला गाठता आला आणि ॲड. यतीन वाघ हे मनसेचे पहिले महापौर बनले. त्यांची अडीच वर्षे संपत असतानाच बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती असल्याने यतीन वाघ यांच्या नंतरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने हात वर केले, मात्र त्यावेळी अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेला साथ दिली आणि अशोक मुर्तडक हे महापौर म्हणून निवडले गेले. देशात आणि पाठोपाठ राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे राजकीय हवापालट झाला आणि मनसेला गळती लागली. मनसेचे चाळीसवरून शेवटी आठ ते नऊ नगरसेवक शिल्लक राहिले. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले आणि चाळीसवरून अवघे पाच नगरसेवक निवडून आले.

इन्फो...

२००७ - १२

२०१२- ४०

२०१७- ५

इन्फो...

मनसेची एकला चलो रे भूमिका

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर आत्तापर्यंत एकला चलो रे भूमिका घेतली आहे. कोणत्याही निवडणुकीपूर्वी त्यांनी युती केलेली नाही. निवडणुकीनंतर मात्र कोणत्याही पक्षाशी युती करणे या पक्षाला गैर वाटलेले नाही. त्यामुळे हा पक्ष निवडणूकपूर्व कोणत्या पक्षाशी युती करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.