शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
2
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
3
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
4
पाकिस्तानचे दहशतवाद्यांना संरक्षण, हा घ्या पुरावा; भारताने आंतरराष्ट्रीय माध्यमांना दाखवला तो फोटो
5
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
6
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
7
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
8
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
9
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
10
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
11
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
12
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
13
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
14
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
15
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
16
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
17
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
19
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
20
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष

मनसेचे मिशन महापालिका यंदा होईल का फत्ते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

मनसेच्या सत्ताकाळात खूप कामे झाली. राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाउंडेशन अशा अनेक कंपन्यांकडून निधी आणला आणि ...

मनसेच्या सत्ताकाळात खूप कामे झाली. राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाउंडेशन अशा अनेक कंपन्यांकडून निधी आणला आणि नाशिकचे कॉस्मेटिक चेंजदेखील केले. मात्र, आम्ही केलेले काम लोकापर्यंत पोहोचवू शकलो नाहीत असे राज ठाकरे यांनी मान्य केले. त्यामुळे नव्याने उभारी घेऊन मनसेने नाशिककरांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना राज ठाकरे नाशकात आले होते. त्यांनी त्यांच्या नाशकातील समर्थकांनादेखील साद घातली होती. मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकमध्ये झालेली आंदोलने तसेच मुलांच्या करिअरविषयक उपक्रमांमुळे मनसे घराघरांत पाेहोचली. प्रस्थापित पक्षांना नवा पर्याय सापडल्याने अगदी शाळकरी मुलांमध्येदेखील आकर्षण होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार निवडून आले. इतके घवघवीत यश मिळवल्यानंतर २०१२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे तब्बल चाळीस नगरसेवक निवडून आले. खरे तर बहुमताचा आकडा मनसेला गाठता आला नाही, मात्र सर्वाधिक नगरसेवक मनसेचे निवडून आल्याने या पक्षाला संधी मिळाली. भाजपने साथ दिली. या पक्षाचे १४ नगरसेवक मिळाल्याने बहुमताचा जादुई आकडा मनसेला गाठता आला आणि ॲड. यतीन वाघ हे मनसेचे पहिले महापौर बनले. त्यांची अडीच वर्षे संपत असतानाच बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती असल्याने यतीन वाघ यांच्या नंतरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने हात वर केले, मात्र त्यावेळी अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेला साथ दिली आणि अशोक मुर्तडक हे महापौर म्हणून निवडले गेले. देशात आणि पाठोपाठ राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे राजकीय हवापालट झाला आणि मनसेला गळती लागली. मनसेचे चाळीसवरून शेवटी आठ ते नऊ नगरसेवक शिल्लक राहिले. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले आणि चाळीसवरून अवघे पाच नगरसेवक निवडून आले.

इन्फो...

२००७ - १२

२०१२- ४०

२०१७- ५

इन्फो...

मनसेची एकला चलो रे भूमिका

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर आत्तापर्यंत एकला चलो रे भूमिका घेतली आहे. कोणत्याही निवडणुकीपूर्वी त्यांनी युती केलेली नाही. निवडणुकीनंतर मात्र कोणत्याही पक्षाशी युती करणे या पक्षाला गैर वाटलेले नाही. त्यामुळे हा पक्ष निवडणूकपूर्व कोणत्या पक्षाशी युती करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.