शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे मिशन महापालिका यंदा होईल का फत्ते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

मनसेच्या सत्ताकाळात खूप कामे झाली. राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाउंडेशन अशा अनेक कंपन्यांकडून निधी आणला आणि ...

मनसेच्या सत्ताकाळात खूप कामे झाली. राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाउंडेशन अशा अनेक कंपन्यांकडून निधी आणला आणि नाशिकचे कॉस्मेटिक चेंजदेखील केले. मात्र, आम्ही केलेले काम लोकापर्यंत पोहोचवू शकलो नाहीत असे राज ठाकरे यांनी मान्य केले. त्यामुळे नव्याने उभारी घेऊन मनसेने नाशिककरांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे.

शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना राज ठाकरे नाशकात आले होते. त्यांनी त्यांच्या नाशकातील समर्थकांनादेखील साद घातली होती. मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकमध्ये झालेली आंदोलने तसेच मुलांच्या करिअरविषयक उपक्रमांमुळे मनसे घराघरांत पाेहोचली. प्रस्थापित पक्षांना नवा पर्याय सापडल्याने अगदी शाळकरी मुलांमध्येदेखील आकर्षण होते. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार निवडून आले. इतके घवघवीत यश मिळवल्यानंतर २०१२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे तब्बल चाळीस नगरसेवक निवडून आले. खरे तर बहुमताचा आकडा मनसेला गाठता आला नाही, मात्र सर्वाधिक नगरसेवक मनसेचे निवडून आल्याने या पक्षाला संधी मिळाली. भाजपने साथ दिली. या पक्षाचे १४ नगरसेवक मिळाल्याने बहुमताचा जादुई आकडा मनसेला गाठता आला आणि ॲड. यतीन वाघ हे मनसेचे पहिले महापौर बनले. त्यांची अडीच वर्षे संपत असतानाच बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती असल्याने यतीन वाघ यांच्या नंतरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने हात वर केले, मात्र त्यावेळी अपक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेला साथ दिली आणि अशोक मुर्तडक हे महापौर म्हणून निवडले गेले. देशात आणि पाठोपाठ राज्यात भाजपची सत्ता आली. त्यामुळे राजकीय हवापालट झाला आणि मनसेला गळती लागली. मनसेचे चाळीसवरून शेवटी आठ ते नऊ नगरसेवक शिल्लक राहिले. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे पानिपत झाले आणि चाळीसवरून अवघे पाच नगरसेवक निवडून आले.

इन्फो...

२००७ - १२

२०१२- ४०

२०१७- ५

इन्फो...

मनसेची एकला चलो रे भूमिका

राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर आत्तापर्यंत एकला चलो रे भूमिका घेतली आहे. कोणत्याही निवडणुकीपूर्वी त्यांनी युती केलेली नाही. निवडणुकीनंतर मात्र कोणत्याही पक्षाशी युती करणे या पक्षाला गैर वाटलेले नाही. त्यामुळे हा पक्ष निवडणूकपूर्व कोणत्या पक्षाशी युती करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.