शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळणे गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:44 IST

मालेगाव : आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे. या विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळाल्यास त्या हिमतीने समस्यांचा सामना करीत स्वताच्या कुटुंबाचा उद्धार करतील, असे प्रतिपादन दिप्ती राऊत यांनी केले.

मालेगाव : आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांकरिता शासनाने निश्चित धोरण आखले पाहिजे. या विधवांना सरकार व समाजाकडून पाठबळ मिळाल्यास त्या हिमतीने समस्यांचा सामना करीत स्वताच्या कुटुंबाचा उद्धार करतील, असे प्रतिपादन दिप्ती राऊत यांनी केले.येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. ‘कोरडी शेतं, ओले डोळे; व्यथा शेतकरी विधवांच्या’ या आपल्या व्याख्यानात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांतील आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवांना प्रत्यक्ष भेटून पाहिलेली विदारक वस्तुस्थिती श्रोत्यांसमोर मांडली.शेतकरी आत्महत्यांबद्दल मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत त्यामुळे समाजाची आणि सरकारची या प्रश्नांकडे पाहण्याची भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचे नमूद करून ती वास्तववादी व संवेदनशील असल्यास निश्चितच परिस्थितीत सकारात्मक बदल घडू शकतो, असे त्यांनी सांगितले.बहुसंख्य शेतकरी महिलांना नवऱ्याच्या आर्थिक व्यवहारांची अजिबात माहिती नसते. किती कर्ज आहे, कुणाकडून घेतले आहे, काय तारण ठेवले आहे, सातबारावर कुणाचे नांव आहे या बाबतीत त्या अनिभज्ञ असतात. कुटुंबांमध्ये परस्पर संवाद असला आणि महिलांना आर्थिक व्यवहाराची जाण असली तर अनेक शेतकरी आत्महत्या टळू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह होते. शाह यांनी समाजातील संवेदनशीलता कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून शेतकरी विधवांच्या समस्यांवर व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका विशद केले.

टॅग्स :Farmerशेतकरी