शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

खासगीकरण कशासाठी?

By किरण अग्रवाल | Updated: July 1, 2018 02:01 IST

कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेला कल्याणकारी कामे करावी लागत असल्याने त्यात नफा- तोट्याचा मेळ नसतोच. केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून नफेखोरी हाच उद्देश असता तर शासनालादेखील आपल्या डोक्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज वागवावे लागते. जनकल्याणासाठी ज्या योजना राबविल्या जातात, त्यात हा उद्देश नसतोच, मात्र सध्या नाशिक महापालिकेकडून महाकवी कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याची जी चर्चा सुरू आहे, ती बघता हा प्रपंच शहरातील सांस्कृतिक चळवळीला तारक की मारक याचा सारासार विचार होणेदेखील गरजेचे आहे.

ठळक मुद्देकोणतीही शहरे तेथील सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा परंपरांमुळेच परिचित होतात.कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याच्या हालचालीखर्च कलावंतांच्या खिशातून काढणे कितपत योग्य

कोणतीही शहरे तेथील केवळ भौतिक सुविधांमुळेच ओळखली जातात असे नाही तर तेथील सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा परंपरांमुळेच परिचित होतात. अशावेळी अशा बाबींचे संवर्धन करण्याची जबाबदारी शासकीय आणि संबंधित पालकसंस्था असलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांचीदेखील असते. साहजिकच जत्रा-यात्रांसारख्या उपक्रमापासून क्रीडामहोत्सवासह अन्य अनेक उपक्रमांत अशा स्थानिक पालक संस्थांचा सक्रिय सहभाग असतो आणि तो असलाच पाहिजे. नाशिक महापालिकेच्या वतीने यापूर्वी क्रीडामहोत्सव भरविण्यापासून विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना अनुदाने देण्यापर्यंत अनेक कामे केली आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे स्मारक साकारण्यातदेखील आर्थिक सहभाग महापालिकेने घेतला आणि आपल्या हिश्श्यासह संबंधित स्मारकाला कमी पडलेली वाढीव रक्कमदेखील शासन संमत करून संबंधित संस्थेला दिली आहे. एकीकडे अशाप्रकारच्या सक्रिय सहभागातून महापालिका सांस्कृतिक-सामाजिक चळवळींना प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे मात्र आता कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत तशी चर्चा करण्यात आली आहे. साहजिक शहरातील नाट्यकर्मींनी त्याला विरोधाची भूमिका घेतली असून, ती फारच वावगी आहे असे नाही.शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर हे एकमेव निमशासकीय संस्थेचे सुमारे हजार आसनक्षमतेचे वातानुकूलित सभागृह आहे. याठिकाणी केवळ व्यावसायिक कार्यक्रम होतात असे नाही तर ज्यासाठी ते बांधले त्यानुसार नाटके आणि अन्य कार्यक्रमदेखील होत असतात. खासगीकरण केल्यानंतर कालिदास महागणार हे निश्चित असल्यानेच हा विरोध होत आहे हे उघड आहे. कालिदास हे केवळ सभागृह किंवा मंगल कार्यालय नाही. सांस्कृतिक जडणघडणीचे ठिकाण आहे. याच ‘कालिदास’च्या व्यासपीठाने अनेक कलावंतदेखील घडविले आहे. अशावेळी कालिदास महाग करून ही चळवळ अडचणीत आणणे योग्य ठरणार नाही.स्मार्ट सिटीत कोणतीही योजना साकारताना त्याच्याशी संबंधित स्टेक होल्डरला महत्त्व आहे. त्यांना विश्वासात न घेता असे एकतर्फी  निर्णय घेणे योग्य नाही. ‘कालिदास’चे नूतनीकरण करताना त्यासाठी झालेला खर्च कलावंतांच्या खिशातून काढणे कितपत योग्य आहे. कलावंतांनीच कालिदासकडे पाठ फिरवली तर मग नूतनीकरण करून उपयोग काय?

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका