शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

पाण्यासाठी एकवटला सारा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:38 PM

पेठ : शहरापासून साधारण पाच किमी अंतरावर तोंडवळ हे साधारण पाचशे लोकवस्तीच्या गावागावांत प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते रस्त्याच्या कडेला असलेल्या भव्य आणि खोल विहिरीचे. संरक्षण कठड्यासह बांधकाम केले असले तरी डोकावून पाहिल्यावर या विहिरीचे भयाण वास्तव दिसून येते.

ठळक मुद्देग्रामस्थांचे श्रमदान : तहानलेल्या तोंडवळकरांनी टॅँकरमुक्तीचा घेतला ध्यास

एस़आऱ शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : शहरापासून साधारण पाच किमी अंतरावर तोंडवळ हे साधारण पाचशे लोकवस्तीच्या गावागावांत प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते रस्त्याच्या कडेला असलेल्या भव्य आणि खोल विहिरीचे. संरक्षण कठड्यासह बांधकाम केले असले तरी डोकावून पाहिल्यावर या विहिरीचे भयाण वास्तव दिसून येते.विहिरीच्या तळाशी एक छोटासा खड्डा. त्यातून एकेक तांब्या पाणी सेंदण्यासाठी काठावर असलेल्या महिलांची सुरू असलेली कसरत. प्लॅस्टिक डबकी (पोहऱ्याच्या) साह्याने घोट घोट पाणी जमा करणाºया आदिवासी महिला रात्रंदिवस या विहिरीच्या काठावर तळ ठोकून असतात. ग्रामपंचायतीने ढोबळ या जुन्या विहिरीचे पुनर्भरण करून गावात छोट्याशा पाइपलाइनद्वारे गावातील विहिरीपर्यंत पाणी आणले; मात्र एप्रिलअखेर तीदेखील विहीर आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती पुन्हा सुरू झाली. शासनाच्या टँकरपुरवठा निकषात गाव बसत नसल्याने तोही मार्ग बंद झाला. अखेर ग्रामपंचायतीने खासगी टँकरने गावाला पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला; मात्र खर्चाचे बंधन असल्याने पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. सध्या लग्नसराई जोरात असल्याने घरी लग्न कार्य असल्यास विकत पाणी आणून लग्नकार्य पार पाडण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.पाण्यासाठी गावाचे सामूहिक प्रयत्नतोंडवळ गावच्या तीव्र पाणीटंचाईच्या बातम्या वर्तमानपत्रातून व समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याचे पाहून नाशिक जिल्ह्यात पाणीप्रश्नावर भरीव काम करणाºया सोशल नेटवर्किंग फोरमच्या टीमने तोंडवळ गावाला भेट देऊन पाहणी केली. वर्षानुवर्ष पाणीटंचाईच्या चटक्यांनी भाजून निघालेल्या तोंडवळ वासीयांना आशेचा किरण दिसला. झाडून सारा गाव एकत्र झाला. ग्रामस्थांचे श्रमदान, संस्थेची मदत व ग्रामपंचायतीचे सहकार्य अशा त्रिशंकू पद्धतीने तोंडवळ गावात कायमस्वरूपी जलप्रकल्प राबविण्यासाठी योजना आखण्यात आली. आणि बघता बघता गावातील पुरु षांसह बायाबापड्यांनी डोक्यावरचा हंडा खाली ठेवत कुदळ फावडे खांद्यावर घेतले. गावाच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत बघून गावकऱ्यांनी विहीर खोदण्यास सुरु वात केली आहे. सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने वीजपंप, पाइपलाइन व अन्य खर्च करण्यात येणार असून, ग्रामपंचायत पाण्याची टाकी बांधून देणार आहे. गत अनेक वर्षापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाºया तोंडवळवासीयांना या जलाभियानामुळे कायमची मुक्ती मिळणार असून, यासाठी गावातील प्रत्येकाने कंबर कसली आहे. तोंडवळ गावात ग्रामपंचायतीमार्फत टंचाई उपाययोजना म्हणून जुनी ढोबळ विहीर खोलीकरण करण्यात आली; पण यावर्षी उष्णतेची दाहकता जास्त असल्याने यातीलदेखील पाणी आठ दिवसांत संपले. यामुळे शेवटी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचा टॅँंकर सुरू करण्यात आला. सध्या खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गाव उंचावर वसलेले असल्याने उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते.- यशोदा चौधरी, सरपंच, तोंडवळ तोंडवळ गाव उंचावर वसलेले असल्याने उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात. यावर्षी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला; मात्र एप्रिल अखेर तेही पाणी बंद पडल्याने सध्या खासगी टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. सोशल नेटवर्किंग फोरमने तोंडवळ जलप्रकल्प हाती घेतला असून, कायमस्वरूपी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- प्रवीण सुरसे, ग्रामसेवक, तोंडवळ ग्रामस्थ म्हणतात....ग्रामपंचायत तोंडवळमार्फत प्रत्येक वर्षी टंचाईकाळात उपाययोजना केली जाते; परंतु येणाºया प्रत्येक वर्षी दुष्काळाच्या झळा वाढतच आहे, त्यामुळे आम्ही गावात सर्व ग्रामस्थ यांची बैठक घेऊन गावापासून २/३ किमी. अंतरावर श्रमदानातून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. सोशल नेटवर्किंग फोरम सामाजिक संस्था व ग्रामपंचायत तोंडवळ यांच्या संयुक्त विद्यमाने योजना घेण्याचा निर्णय घेण्यात आला व प्रत्यक्ष विहीर श्रमदानातून विहीर खोदण्याचे कामदेखील सुरू झाले.- त्र्यंबक प्रधान, तोंडवळ