शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नाराजांची रसद कुणाला ?

By श्याम बागुल | Updated: October 2, 2019 19:48 IST

नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छुकांच्या मुलाखती घेणा-या

ठळक मुद्दे पाच जणांना उमेदवारी देऊन १७० इच्छुकांच्या तोंडाला पाने पुसली युतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरी व नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले

श्याम बागुलविधानसभा निवडणुकीचे चित्र नामांकन दाखल करण्यापूर्वीच बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजप, सेनेत ज्या पद्धतीने इनकमिंग दररोज सुरू होते त्यावरून मतदार पुन्हा राज्यात युतीच्या उमेदवारांनाच कौल देणार व विरोधकांना विधानसभा मतदारसंघात उमेदवारदेखील मिळणार नाहीत अशा प्रकारे वातावरण निर्मिती पद्धतशीरपणे तयार करण्यात आले होते. या वातावरण निर्मितीत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आघाडीवर असले तरी, त्यांना विरोधकांकडून हातभार लावला जात होता हेदेखील तितकेच खरे होते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक एकतर्फी होते की काय असा प्रश्न मतदारांना पडत होता. आयारामांच्या संख्येने सत्ताधारी पक्षाला आलेली सूज पाहता अशा सर्वांची निवडणुकीत वर्णी लावण्याची मोठी कसरत दोन्ही पक्षांना करावी लागणार असे दिसत होते व त्यासाठी प्रसंगी युती तुटून दोन्ही पक्ष आमने-सामने लढतील व त्याचा फायदा विरोधकांना होईल, अशी अटकळ बांधली जात होती, परंतु तसे काही झाले नाही. सत्तेची चटक लागलेल्या दोन्ही पक्षांनी यंदा समजदारीची भूमिका घेत प्रसंगी आपल्या भावनांना मुरड घालत युती करण्याचा निर्णय घेतला व उमेदवारही जाहीर करून टाकले आहेत. त्यामुळे युती होणार का, नाही झाली तर काय चित्र असेल, कोणता पक्ष फुटेल अशा शेकडो प्रश्नांना उत्तरे मिळून गेली आहेत. युतीचे उमेदवार गुरुवारी, शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर झाल्याने आता ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या नाराजांचा मोठा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर उभा ठाकला आहे. नाशिक जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास उमेदवारांनी विरोधकांशी लढावे की स्वकीयांची बंडखोरी व नाराजीचा सामना करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छुकांच्या मुलाखती घेणा-या भाजपाने त्यातील फक्त पाच जणांना उमेदवारी देऊन १७० इच्छुकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ज्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यातील एखाद-दुसरा वगळता अन्य तुल्यबळ इच्छुक होते. त्यांचे आजवरचे पक्षातील योगदान, जनमाणसातील प्रतिमा पाहता, ते खरोखर विधानसभेचे उमेदवार होऊ शकत होते. परंतु पक्षाने या सा-या गोष्टींचा फार खोलवर विचार न करता, पाच जागांवर पाच उमेदवार जाहीर करून अन्य इच्छुकांना पुन्हा पक्षाच्या सतरंज्या उचलणे व झेंडा लावण्याचे काम सोपविल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण होणे साहजिकच आहे. अशा इच्छुकांनी आता बंडखोरीची भाषा सुरू केली आहे तर काहींनी तिकीट वाटपावर उघडपणे नाराजी बोलून दाखविली आहे. असाच प्रकार शिवसेनेतही सुरू झाला आहे. आजवर पक्षनिष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना अचानक पक्षाने अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात असून, त्यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरी व नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले असून, या नाराजांची रसद निवडणुकीत कोणाला पोषक ठरणार त्याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यात प्रामुख्याने सामाजिक, राजकीय व जातीय समीकरणांचा आधार घेतला जात आहे. पक्षाने अन्याय केल्याची ठायीठायी भावना निर्माण झालेल्या या नाराज व बंडखोरांची पक्षाकडून दखल घेतली जाऊन कदाचित त्यांची नाराजी काढण्याचा व मन वळविण्याचा प्रयत्नही केला जाईल. परंतु ‘बुंद से गई वो हौद से नही’ ज्यांनी निवडणूक तयारी करून समर्थक, हितचिंतकांच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्यांना आता सतरंज्या उचलण्याचेच काम पक्षाने ठेवल्याचे पाहून ते कितपत निवडणुकीत सक्रिय होतील, याविषयी साशंकता आहे. त्यामुळे बंडखोर, नाराजांचा फटका साहजिकच त्या त्या पक्षाच्या उमेदवारांना बसणार आहे, त्याचा लाभ उठविण्याचा पुरेपूर फायदा विरोधकांनी उचलला नव्हे तर नवलच !

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा