शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नाराजांची रसद कुणाला ?

By श्याम बागुल | Updated: October 2, 2019 19:48 IST

नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छुकांच्या मुलाखती घेणा-या

ठळक मुद्दे पाच जणांना उमेदवारी देऊन १७० इच्छुकांच्या तोंडाला पाने पुसली युतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरी व नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले

श्याम बागुलविधानसभा निवडणुकीचे चित्र नामांकन दाखल करण्यापूर्वीच बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजप, सेनेत ज्या पद्धतीने इनकमिंग दररोज सुरू होते त्यावरून मतदार पुन्हा राज्यात युतीच्या उमेदवारांनाच कौल देणार व विरोधकांना विधानसभा मतदारसंघात उमेदवारदेखील मिळणार नाहीत अशा प्रकारे वातावरण निर्मिती पद्धतशीरपणे तयार करण्यात आले होते. या वातावरण निर्मितीत दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आघाडीवर असले तरी, त्यांना विरोधकांकडून हातभार लावला जात होता हेदेखील तितकेच खरे होते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक एकतर्फी होते की काय असा प्रश्न मतदारांना पडत होता. आयारामांच्या संख्येने सत्ताधारी पक्षाला आलेली सूज पाहता अशा सर्वांची निवडणुकीत वर्णी लावण्याची मोठी कसरत दोन्ही पक्षांना करावी लागणार असे दिसत होते व त्यासाठी प्रसंगी युती तुटून दोन्ही पक्ष आमने-सामने लढतील व त्याचा फायदा विरोधकांना होईल, अशी अटकळ बांधली जात होती, परंतु तसे काही झाले नाही. सत्तेची चटक लागलेल्या दोन्ही पक्षांनी यंदा समजदारीची भूमिका घेत प्रसंगी आपल्या भावनांना मुरड घालत युती करण्याचा निर्णय घेतला व उमेदवारही जाहीर करून टाकले आहेत. त्यामुळे युती होणार का, नाही झाली तर काय चित्र असेल, कोणता पक्ष फुटेल अशा शेकडो प्रश्नांना उत्तरे मिळून गेली आहेत. युतीचे उमेदवार गुरुवारी, शुक्रवारी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर झाल्याने आता ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या नाराजांचा मोठा प्रश्न दोन्ही पक्षांसमोर उभा ठाकला आहे. नाशिक जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास उमेदवारांनी विरोधकांशी लढावे की स्वकीयांची बंडखोरी व नाराजीचा सामना करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छुकांच्या मुलाखती घेणा-या भाजपाने त्यातील फक्त पाच जणांना उमेदवारी देऊन १७० इच्छुकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ज्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यातील एखाद-दुसरा वगळता अन्य तुल्यबळ इच्छुक होते. त्यांचे आजवरचे पक्षातील योगदान, जनमाणसातील प्रतिमा पाहता, ते खरोखर विधानसभेचे उमेदवार होऊ शकत होते. परंतु पक्षाने या सा-या गोष्टींचा फार खोलवर विचार न करता, पाच जागांवर पाच उमेदवार जाहीर करून अन्य इच्छुकांना पुन्हा पक्षाच्या सतरंज्या उचलणे व झेंडा लावण्याचे काम सोपविल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण होणे साहजिकच आहे. अशा इच्छुकांनी आता बंडखोरीची भाषा सुरू केली आहे तर काहींनी तिकीट वाटपावर उघडपणे नाराजी बोलून दाखविली आहे. असाच प्रकार शिवसेनेतही सुरू झाला आहे. आजवर पक्षनिष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना अचानक पक्षाने अन्याय केल्याची भावना व्यक्त केली जात असून, त्यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरी व नाराजीचे मोठे आव्हान उभे राहिले असून, या नाराजांची रसद निवडणुकीत कोणाला पोषक ठरणार त्याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यात प्रामुख्याने सामाजिक, राजकीय व जातीय समीकरणांचा आधार घेतला जात आहे. पक्षाने अन्याय केल्याची ठायीठायी भावना निर्माण झालेल्या या नाराज व बंडखोरांची पक्षाकडून दखल घेतली जाऊन कदाचित त्यांची नाराजी काढण्याचा व मन वळविण्याचा प्रयत्नही केला जाईल. परंतु ‘बुंद से गई वो हौद से नही’ ज्यांनी निवडणूक तयारी करून समर्थक, हितचिंतकांच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्यांना आता सतरंज्या उचलण्याचेच काम पक्षाने ठेवल्याचे पाहून ते कितपत निवडणुकीत सक्रिय होतील, याविषयी साशंकता आहे. त्यामुळे बंडखोर, नाराजांचा फटका साहजिकच त्या त्या पक्षाच्या उमेदवारांना बसणार आहे, त्याचा लाभ उठविण्याचा पुरेपूर फायदा विरोधकांनी उचलला नव्हे तर नवलच !

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा