शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मालेगाव हॉटस्पॉट बनेपर्यंतच्या ढिलाईस जबाबदार कोण ?

By किरण अग्रवाल | Updated: April 19, 2020 00:51 IST

कोरोनाबाधितांची व मृत्युमुखी पडलेल्यांचीही मालेगावमधील दिवसागणिक वाढती संख्या ही केवळ जिल्हावासीयांसाठीच नव्हे, राज्यासाठीही चिंंताजनकच बाब ठरली आहे. संक्रमणाचे संकेत देणारी ही अवस्था ओढवेपर्यंत संबंधित स्थानिक यंत्रणा काय करीत होती, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जाणे गैर ठरू नये.

ठळक मुद्दे अजूनही वेळ गेलेली नाही, स्वत:च्याही जिवाची काळजी नसणाऱ्यांशी सक्तीने निपटणे गरजेचेचक्क एका दिवसात एक डझनपेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्हमहापालिका यंत्रणेने जी काळजी घ्यावयास हवी होती ती घेतली न गेल्याचे समोर

सारांश।

कोरोनाच्या धास्तीने सारेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुदैवाने नाशिक जिल्ह्यात प्रारंभापासूनच प्रशासनाने काळजी घेतल्याने मालेगाव वगळता उर्वरित जिल्ह्यात व नाशिक महानगरात यासंबंधीची स्थिती भयावह होऊ शकली नाही. अतिशय मर्यादित स्वरूपात हे संकट थोपविले गेले. जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळलेला पहिला रुग्ण उपचाराअंती ठणठणीत बरा होऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी देऊन घरीदेखील पाठविण्यात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला यश आले, पण एकीकडे हे होत असताना मालेगावमध्ये मात्र नेमकी या उलट स्थिती ओढवली आहे. त्यामुळे तेथे यंत्रणा का ढिल्या पडल्या असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरले आहे.

जिल्ह्यात जिथे कोरोनाबाधित म्हणून एकाही संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हटल्यावर यंत्रणेच्या व नागरिकांच्याही पोटात धस्स होते, तिथे मालेगावमध्ये एकापाठोपाठ एक असे एका दिवसात पाच ते सात व आता तर चक्क एका दिवसात एक डझनपेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व त्यातून चौघांचे मृत्यूही घडून आल्याने संपूर्ण यंत्रणा व जिल्हावासीय धास्तावले आहेत. जिल्ह्याच्या इतर भागातील बाधित रुग्णांची प्रकृती सुधारून त्यांना घरी पाठविण्यात आले असताना मालेगावमध्ये मात्र त्यांचा मृत्यू ओढवत आहे ही यातील अधिक दुर्दैवी बाब, शिवाय नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे ज्यांचे मृत्यू झाले आहेत ते सर्वच मालेगावमधील आहेत, त्यामुळे मालेगावचे याबाबतीत हॉटस्पॉट बनणे संपूर्ण जिल्हावासीयांना काळजीत टाकणारे आहे. ही काळजी जशी स्थानिक मालेगाववासीयांच्या आरोग्यास आहे, तशीच त्याचा जिल्हावासीयांच्या होणा-या चलनवलनावरील परिणामास घेऊनदेखील आहे. कारण मालेगावही सुस्थितीत किंवा मर्यादित संकट स्थितीत राहिले असते तर जिल्ह्यातील लॉकडाउन शिथिल होऊ शकले असते, परंतु मालेगाव हॉटस्पॉट ठरल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे गणित बिघडून गेले आहे.

जी यंत्रणा नाशिक महानगरात किंवा उर्वरित जिल्ह्यात कोरोनाला थोपविण्यात यशस्वी ठरली, ती मालेगावमध्ये अयशस्वी का ठरली हा यातील खरा प्रश्न आहे. कोरोनाची लक्षणे दिसून येऊ लागली होती तेव्हाच सर्वत्र खबरदारीचे उपाय योजले जात असताना मालेगावमध्ये त्याचा मागमूसही नव्हता अशी एकूण स्थिती आता समोर येते आहे. यात जिल्हा प्रशासन, पोलीस यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असताना महापालिका यंत्रणेने जी काळजी घ्यावयास हवी होती ती घेतली न गेल्याचे आता समोर येत आहे. शासनाने तातडीने आपत्कालीन अधिका-याची विशेष नेमणूक केली, शिवाय तेथील अपर जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने बदलीही करण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी महापालिका आयुक्तांना तंबीही दिली हे सर्व ठीकच झाले, ते उपचाराचे भाग ठरतात; परंतु यादरम्यान बाधितांची संख्या ज्या झपाट्याने वाढून गेली व मोहल्ल्या मोहल्ल्यात कोरोनाचा विषाणू पोहोचला त्यामुळे आता तेथे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे, तेव्हा प्राथमिक अवस्थेतच ढिलाई दर्शविणाºयाची जबाबदारी कशी व कुणावर निश्चित करणार?

दुर्दैव असे की, प्राथमिक अवस्थेत कोरोनाला रोखण्याची वेळ असताना स्थानिक यंत्रणा तर सुस्त होतीच, मालेगावमधील लोकप्रतिनिधीही एकमेकांना आडवे जाण्यात व्यस्त होते. परिणामी अधिकतर हातावर पोट असणा-यांचे प्रमाण मोठे असलेल्या मालेगावमधील सर्वांच्याच चिंंतेत भर पडून गेली आहे. जिवाची धास्ती तर आहेच, परंतु उद्याच्या भविष्याची चिंंता त्याहूनही अधिक गहिरी आहे. जात-पात, धर्म-पंथ आदी भेद बाजूस ठेवून याचा विचार करता मालेगावमधील या संकटाने सा-यांनाच अस्वस्थ करून ठेवले आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ नसली तर संकट कसे भीषण बनू शकते याचे उत्तम उदाहरण मालेगावने सादर केले आहे, तेव्हा आता तरी याबाबतीत जागृत होत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सवयी व व्यवहार, वर्तनात बदल होणार नसेल तर प्रशासनाने अशा नाठाळांशी सक्तीने निपटणे गरजेचे आहे, कारण हा प्रश्न फक्त त्यांच्या स्वत:च्या जीविताशी संबंधित नसून, समस्त शहरवासीयांशी संबंधित आहे. त्यामुळे कोणाचीही मनमानी खपवून घेता कामा नये एवढेच या निमित्ताने...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक