शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादीची लगीनघाई कोणासाठी ? 

By श्याम बागुल | Updated: January 4, 2019 18:28 IST

नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक कॉँग्रेस व राष्टवादी एकत्र लढण्यावर दिल्ली मुक्कामी शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी, जागावाटप अद्याप झालेले नाही. गेल्या निवडणुकीत राष्टवादीकडून छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला नाशिक लोकसभेच्या जागेवर दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने यंदा या जागेवर कॉँगे्रसने दावा सांगितलेला असताना राष्टÑवादी कॉँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे.नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसला सोडण्यात आले होते. कॉँग्रेसने या दोन्ही मतदारसंघात राष्टवादीचा प्रचार केला असला तरी, मोदी लाटेपुढे दोन्ही जागांवर साफ पराभव राष्टवादीला पत्करावा लागला. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याने साहजिकच दोन्ही कॉँग्रेसकडून नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागांवर दावा सांगितला जात असला तरी, या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही कॉँग्रेसकडून सुरू झालेल्या तयारीत जागा ताब्यात ठेवण्याबाबत चर्चा केली जात आहे. कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्टतील पदाधिका-यांच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षासाठी सोडण्यात याव्यात असा दबाव स्थानिक पदाधिकाºयांनी टाकण्यास सुरुवात केली असून, त्यातही नाशिकची जागा राष्टवादीकडून छगन भुजबळच लढविणार असतील तरच ती सोडण्यात यावी अन्यथा कॉँग्रेसने ही जागा लढवावी, अशी भुजबळ यांना पेचात टाकणारी भूमिका घेतली आहे. तथापि, राष्टवादीकडून अद्याप नाशिकची जागा कोण लढविणार हे निश्चित झालेले नाही, मात्र भुजबळ यांच्या परिवारातच उमेदवारी जाण्याची शक्यता अधिक आहे, त्यातही छगन भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ हेच उमेदवार असतील असे राष्टÑवादीच्या एका गटाचे म्हणणे आहे व त्यासाठी विजयाचे गणिते मांडण्याची घाईदेखील केली जात आहे. राज्यातील जागा लढविण्यावर दोन्ही कॉँग्रेसमध्ये एकमत झाले, पण जागावाटप झालेले नाही. असे असताना समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक लोकसभा मतदारसंघात गट, गणनिहाय बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे ते पाहता, राष्टवादीची लगीनघाई कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे. मुळात जिल्हाध्यक्षांच्या अधिकारात एकमेकांकडून हस्तक्षेप होत असल्यावरून पक्षात नाराजी असताना त्यात निवडणुकीच्या घाईने भर पडली आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक