शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

राष्टवादीची लगीनघाई कोणासाठी ? 

By श्याम बागुल | Updated: January 4, 2019 18:28 IST

नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक कॉँग्रेस व राष्टवादी एकत्र लढण्यावर दिल्ली मुक्कामी शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी, जागावाटप अद्याप झालेले नाही. गेल्या निवडणुकीत राष्टवादीकडून छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला नाशिक लोकसभेच्या जागेवर दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने यंदा या जागेवर कॉँगे्रसने दावा सांगितलेला असताना राष्टÑवादी कॉँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे.नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसला सोडण्यात आले होते. कॉँग्रेसने या दोन्ही मतदारसंघात राष्टवादीचा प्रचार केला असला तरी, मोदी लाटेपुढे दोन्ही जागांवर साफ पराभव राष्टवादीला पत्करावा लागला. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याने साहजिकच दोन्ही कॉँग्रेसकडून नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागांवर दावा सांगितला जात असला तरी, या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही कॉँग्रेसकडून सुरू झालेल्या तयारीत जागा ताब्यात ठेवण्याबाबत चर्चा केली जात आहे. कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्टतील पदाधिका-यांच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षासाठी सोडण्यात याव्यात असा दबाव स्थानिक पदाधिकाºयांनी टाकण्यास सुरुवात केली असून, त्यातही नाशिकची जागा राष्टवादीकडून छगन भुजबळच लढविणार असतील तरच ती सोडण्यात यावी अन्यथा कॉँग्रेसने ही जागा लढवावी, अशी भुजबळ यांना पेचात टाकणारी भूमिका घेतली आहे. तथापि, राष्टवादीकडून अद्याप नाशिकची जागा कोण लढविणार हे निश्चित झालेले नाही, मात्र भुजबळ यांच्या परिवारातच उमेदवारी जाण्याची शक्यता अधिक आहे, त्यातही छगन भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ हेच उमेदवार असतील असे राष्टÑवादीच्या एका गटाचे म्हणणे आहे व त्यासाठी विजयाचे गणिते मांडण्याची घाईदेखील केली जात आहे. राज्यातील जागा लढविण्यावर दोन्ही कॉँग्रेसमध्ये एकमत झाले, पण जागावाटप झालेले नाही. असे असताना समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक लोकसभा मतदारसंघात गट, गणनिहाय बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे ते पाहता, राष्टवादीची लगीनघाई कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे. मुळात जिल्हाध्यक्षांच्या अधिकारात एकमेकांकडून हस्तक्षेप होत असल्यावरून पक्षात नाराजी असताना त्यात निवडणुकीच्या घाईने भर पडली आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक