शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

राष्टवादीची लगीनघाई कोणासाठी ? 

By श्याम बागुल | Updated: January 4, 2019 18:28 IST

नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक कॉँग्रेस व राष्टवादी एकत्र लढण्यावर दिल्ली मुक्कामी शिक्कामोर्तब करण्यात आले असले तरी, जागावाटप अद्याप झालेले नाही. गेल्या निवडणुकीत राष्टवादीकडून छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराला नाशिक लोकसभेच्या जागेवर दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने यंदा या जागेवर कॉँगे्रसने दावा सांगितलेला असताना राष्टÑवादी कॉँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना बांधणीच्या रूपाने चालविलेला प्रचार नेमका कोणासाठी? असा प्रश्न पडू लागला आहे.नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाबरोबरच, धुळे मतदारसंघात मोडणाऱ्या मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ राष्टवादी कॉँग्रेसला सोडण्यात आले होते. कॉँग्रेसने या दोन्ही मतदारसंघात राष्टवादीचा प्रचार केला असला तरी, मोदी लाटेपुढे दोन्ही जागांवर साफ पराभव राष्टवादीला पत्करावा लागला. आता पुन्हा लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याने साहजिकच दोन्ही कॉँग्रेसकडून नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागांवर दावा सांगितला जात असला तरी, या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही कॉँग्रेसकडून सुरू झालेल्या तयारीत जागा ताब्यात ठेवण्याबाबत चर्चा केली जात आहे. कॉँग्रेसच्या उत्तर महाराष्टतील पदाधिका-यांच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा पक्षासाठी सोडण्यात याव्यात असा दबाव स्थानिक पदाधिकाºयांनी टाकण्यास सुरुवात केली असून, त्यातही नाशिकची जागा राष्टवादीकडून छगन भुजबळच लढविणार असतील तरच ती सोडण्यात यावी अन्यथा कॉँग्रेसने ही जागा लढवावी, अशी भुजबळ यांना पेचात टाकणारी भूमिका घेतली आहे. तथापि, राष्टवादीकडून अद्याप नाशिकची जागा कोण लढविणार हे निश्चित झालेले नाही, मात्र भुजबळ यांच्या परिवारातच उमेदवारी जाण्याची शक्यता अधिक आहे, त्यातही छगन भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ हेच उमेदवार असतील असे राष्टÑवादीच्या एका गटाचे म्हणणे आहे व त्यासाठी विजयाचे गणिते मांडण्याची घाईदेखील केली जात आहे. राज्यातील जागा लढविण्यावर दोन्ही कॉँग्रेसमध्ये एकमत झाले, पण जागावाटप झालेले नाही. असे असताना समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने नाशिक लोकसभा मतदारसंघात गट, गणनिहाय बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे ते पाहता, राष्टवादीची लगीनघाई कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे. मुळात जिल्हाध्यक्षांच्या अधिकारात एकमेकांकडून हस्तक्षेप होत असल्यावरून पक्षात नाराजी असताना त्यात निवडणुकीच्या घाईने भर पडली आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक