शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

राष्ट्रवादीत कोण नाराज ?

By किरण अग्रवाल | Updated: September 23, 2018 01:40 IST

अगोदर कार्यकर्ता बनून नंतर नेतेपदावर जाण्याचे दिवस संपलेत, आता राजकारणात आल्या आल्या सर्वांना पदे हवी असतात; थांबायला कुणी तयार नसतो. दुसरे म्हणजे, आपली उपयोगीता संपली हे जाणून न घेता अनेकजणांचा पदांवर बनून राहण्याचा किंवा निवृत्ती काळातही ते मिळविण्याचा सोस कायम असतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित झाल्यावर नाराजीची भावना पुढे आली ती त्यातूनच.

ठळक मुद्देराजकारणात आल्या आल्या सर्वांना पदे हवी ‘कालच्या आलेल्यांना’ थेट प्रदेशस्तरावर कसे घेतले गेले,जयंत पाटील यांनी ‘जयवंत’ होण्याची अपेक्षा न धरलेलीच बरी !

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी झाली, तेव्हा त्यात घेतल्या गेलेल्या नाशिकच्या नावांबाबतही नाराजीची चर्चा झडून गेली होतीच. ‘कालच्या आलेल्यांना’ थेट प्रदेशस्तरावर कसे घेतले गेले, हा त्या नाराजीमागील प्रश्न होता. आता जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष व प्रवक्ते नेमले गेल्यावर संधी डावलले गेलेले नाराज झाले आहेत म्हणे. वस्तुत: जिल्ह्याचे संघटनात्मकदृष्ट्या विभाजन करून लोकसभा मतदारसंघनिहाय दोन जिल्हाध्यक्ष व त्यांना सहकार्याला कार्याध्यक्ष असा ‘फॉर्म्युला’ यंदा वापरला गेला. त्यामुळे एकापेक्षा अधिकांना संधी मिळून गेली. यातून आजवरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचे पंख कापल्याचा अर्थ काढला जाणे स्वाभाविक असले तरी, पक्षाने सामाजिक समतोल साधण्याची चतुराई यात दाखविली. शिवाय, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा सल्ला त्यासाठी घेतला गेला. असे असताना नाराजी व्यक्त केली जात असेल तर काय गावोगावी व गल्लोगल्ली जिल्हाध्यक्ष नेमायचेत का, असाच प्रश्न उपस्थित व्हावा. बरे, तसे करायचे झाल्यास त्यासाठीही सक्षम माणसे हवीत. आहेत का ती तेवढी? प्रदेश सहकोषाध्यक्ष व सहकार सेलचे राज्याचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांना खाली उतरवत जिल्हा प्रवक्तेपदी व प्रदेश प्रवक्ते व राज्य उपाध्यक्ष असलेल्या डॉ. भारती पवार यांनाच जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून अतिरिक्त जबाबदा-या देण्यात आल्याचे पाहता अशी जर ‘वानवा’ असेल तर मग नाराज होणारी मंडळी कोण व काय क्षमतेची याचा विचारच न केलेला बरा. दुर्दैव असे की, नवोदितांनी गुडघ्याला बाशिंग बांधून असणे एकवेळ ठीक; पण सर्वकाही भूषवून व मिळवून झालेले जुनेही आपली ‘जीर्णता’ न सोडता पदांमध्ये मन अडकवून ठेवणार असतील तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘जयवंत’ होण्याची अपेक्षा न धरलेलीच बरी !

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस