शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

गेल्या सरकारच्या कर्जमाफीतील चारशे कोटी कोठे गेले ?

By श्याम बागुल | Updated: December 26, 2019 18:46 IST

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना बहाल करून त्यांचे बळकटीकरण केले.

ठळक मुद्देछगन भुजबळ : जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन कर्जमाफीच्या रकमेला वाटा फुटता कामा नये,

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असून, प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल व जवळपास दीड हजार कोटी रुपये शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा होणार आहेत. सरकार शेतक-यांना कमी पडू देणार नाही, परंतु गेल्या सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या रकमेतून जिल्ह्यातील शेतक-यांच्या वाट्यासाठी आलेले चारशे कोटी कुठे गेले, असा सवाल करून ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी, सध्याच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या रकमेला वाटा फुटता कामा नये, त्याचबरोबर पैसे शेतक-याच्या खात्यातच जमा होतील याची काळजी लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना बहाल करून त्यांचे बळकटीकरण केले. त्यातून आज अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांनी आदर्श काम करून सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचा विस्तार पाहता, नवीन इमारतीची ७० वर्षांनंतर गरज निर्माण होणे व नवीन इमारत उभी राहणे काळाची गरज असून, त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. शिवभोजन योजनेची माहितीही भुजबळ यांनी दिली. नाशिक महापालिका हद्दीतही शिवभोजन योजना सुरू केली जाईल. ही योजना सध्या प्रायोगिक पातळीवर राबविण्यात येत असून, ती राबविताना येणा-या अडचणी समजावून घेतल्या जातील व त्यानंतर त्यात आवश्यक बदल करण्यात येईल. मात्र योजना चांगल्या प्रकारे राबवायची असेल तर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार संजय राऊत यांनी, महाविकास आघाडीचे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, त्यात शेतकरी, सामान्य व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सत्तेवर सरकार कोणाचे आहे यापेक्षा त्या सरकारच्या कामांकडे पाहून त्याचे मूल्यमापन केले जावे, असे मत व्यक्त केले. नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी येतील त्याची हमी त्यांनी दिली. माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी, आपल्या अडीच वर्षांच्या राज्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची कामे केल्याचे सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने आता आणखी चांगली कामे करून सामान्य व्यक्तीला सावरण्याचे काम करण्यात येणार असल्याचे भुसे म्हणाले. यावेळी प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी तर अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Politicsराजकारणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदChagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊत