शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या सरकारच्या कर्जमाफीतील चारशे कोटी कोठे गेले ?

By श्याम बागुल | Updated: December 26, 2019 18:46 IST

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना बहाल करून त्यांचे बळकटीकरण केले.

ठळक मुद्देछगन भुजबळ : जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन कर्जमाफीच्या रकमेला वाटा फुटता कामा नये,

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असून, प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल व जवळपास दीड हजार कोटी रुपये शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा होणार आहेत. सरकार शेतक-यांना कमी पडू देणार नाही, परंतु गेल्या सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या रकमेतून जिल्ह्यातील शेतक-यांच्या वाट्यासाठी आलेले चारशे कोटी कुठे गेले, असा सवाल करून ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी, सध्याच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या रकमेला वाटा फुटता कामा नये, त्याचबरोबर पैसे शेतक-याच्या खात्यातच जमा होतील याची काळजी लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना बहाल करून त्यांचे बळकटीकरण केले. त्यातून आज अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांनी आदर्श काम करून सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचा विस्तार पाहता, नवीन इमारतीची ७० वर्षांनंतर गरज निर्माण होणे व नवीन इमारत उभी राहणे काळाची गरज असून, त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. शिवभोजन योजनेची माहितीही भुजबळ यांनी दिली. नाशिक महापालिका हद्दीतही शिवभोजन योजना सुरू केली जाईल. ही योजना सध्या प्रायोगिक पातळीवर राबविण्यात येत असून, ती राबविताना येणा-या अडचणी समजावून घेतल्या जातील व त्यानंतर त्यात आवश्यक बदल करण्यात येईल. मात्र योजना चांगल्या प्रकारे राबवायची असेल तर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार संजय राऊत यांनी, महाविकास आघाडीचे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, त्यात शेतकरी, सामान्य व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सत्तेवर सरकार कोणाचे आहे यापेक्षा त्या सरकारच्या कामांकडे पाहून त्याचे मूल्यमापन केले जावे, असे मत व्यक्त केले. नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी येतील त्याची हमी त्यांनी दिली. माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी, आपल्या अडीच वर्षांच्या राज्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची कामे केल्याचे सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने आता आणखी चांगली कामे करून सामान्य व्यक्तीला सावरण्याचे काम करण्यात येणार असल्याचे भुसे म्हणाले. यावेळी प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी तर अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Politicsराजकारणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदChagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊत