शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गेल्या सरकारच्या कर्जमाफीतील चारशे कोटी कोठे गेले ?

By श्याम बागुल | Updated: December 26, 2019 18:46 IST

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना बहाल करून त्यांचे बळकटीकरण केले.

ठळक मुद्देछगन भुजबळ : जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन कर्जमाफीच्या रकमेला वाटा फुटता कामा नये,

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असून, प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल व जवळपास दीड हजार कोटी रुपये शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा होणार आहेत. सरकार शेतक-यांना कमी पडू देणार नाही, परंतु गेल्या सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या रकमेतून जिल्ह्यातील शेतक-यांच्या वाट्यासाठी आलेले चारशे कोटी कुठे गेले, असा सवाल करून ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी, सध्याच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या रकमेला वाटा फुटता कामा नये, त्याचबरोबर पैसे शेतक-याच्या खात्यातच जमा होतील याची काळजी लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मंत्रालयातील एकवटली जाणारी मंत्र्यांची व सनदी अधिकाºयांचे अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला तर सुधाकरराव नाईक यांनी मंत्रिपातळीवर असलेल्या सुमारे शंभरहून अधिक अधिकार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांना बहाल करून त्यांचे बळकटीकरण केले. त्यातून आज अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांनी आदर्श काम करून सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचा विस्तार पाहता, नवीन इमारतीची ७० वर्षांनंतर गरज निर्माण होणे व नवीन इमारत उभी राहणे काळाची गरज असून, त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. शिवभोजन योजनेची माहितीही भुजबळ यांनी दिली. नाशिक महापालिका हद्दीतही शिवभोजन योजना सुरू केली जाईल. ही योजना सध्या प्रायोगिक पातळीवर राबविण्यात येत असून, ती राबविताना येणा-या अडचणी समजावून घेतल्या जातील व त्यानंतर त्यात आवश्यक बदल करण्यात येईल. मात्र योजना चांगल्या प्रकारे राबवायची असेल तर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार संजय राऊत यांनी, महाविकास आघाडीचे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, त्यात शेतकरी, सामान्य व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सत्तेवर सरकार कोणाचे आहे यापेक्षा त्या सरकारच्या कामांकडे पाहून त्याचे मूल्यमापन केले जावे, असे मत व्यक्त केले. नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी येतील त्याची हमी त्यांनी दिली. माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी, आपल्या अडीच वर्षांच्या राज्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची कामे केल्याचे सांगितले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने आता आणखी चांगली कामे करून सामान्य व्यक्तीला सावरण्याचे काम करण्यात येणार असल्याचे भुसे म्हणाले. यावेळी प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी तर अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Politicsराजकारणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदChagan Bhujbalछगन भुजबळSanjay Rautसंजय राऊत