शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेला मुंबई-आग्रा महामार्ग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:14 IST

इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्याने या ठिकाणी महामार्गाचे काम चांगल्या प्रतीचे होणे फार गरजेचे असून सुद्धा दरवर्षी त्याच ठिकाणी ...

इगतपुरी तालुका पावसाचे माहेरघर असल्याने या ठिकाणी महामार्गाचे काम चांगल्या प्रतीचे होणे फार गरजेचे असून सुद्धा दरवर्षी त्याच ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांमधून वाट काढावी लागत असते. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दरवर्षी पावसाळ्यात महामार्ग या ठिकाणी गायब झालेला असतो. टोलनाका ते घाटनदेवीपर्यंत पाच किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यात महामार्ग हरवला असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज अपघातांमध्ये वाढ झाली आहे. टोल प्रशासन हेतुपुरस्सर डोळेझाक करीत असून कुठल्याही प्रकारचे काम करताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

इन्फो

टोल प्रशासनावर निशाणा

पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात महामार्गाची चाळण झाली असून येत्या काळात पावसात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टोल प्रशासनाने महामार्गाची दुरुस्ती करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख संदीप किर्वे यांनी इशारा दिला आहे. टोलनाका प्रशासनाकडे खड्ड्यामुळे जाब विचारणाऱ्या चालकांची बाचाबाची नित्याचीच झाली असून, टोल वसुली करून रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध स्थानिक नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या खड्ड्यामुळे मोठा अपघात झाल्यास याकरिता टोल प्रशासन जबाबदार असणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

कोट :

महामार्गाची चाळण झालेली असून या महामार्गावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुस्त प्रशासनाने त्वरित महामार्गाची दुरुस्ती करावी, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करण्यात येईल. या खड्ड्यामुळे मोठे अपघात झाल्यास त्याला टोल प्रशासन जबाबदार असेल.

संदीप किर्वे, उपजिल्हाप्रमुख, मनसे

फोटो- २८ मुंबई-आग्रा रोड

280721\28nsk_19_28072021_13.jpg

फोटो- २८ मुंबई आग्रा रोड