शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन क्षेत्र अनलॉक कधी करणार: तानचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:16 IST

नाशिक : (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत ...

नाशिक: (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत नसून ज्या भागात पर्यटन आहे. अशा ग्रामीण अथर्कारणाला त्यातून चालना मिळते. देशात सर्व उद्योग अ?ॅनलॉक होत असताना पर्यटन क्षेत्रच फक्त बंद का असा प्रश्न नाशिकच्या तान(ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक) या पर्यटन व्यवसायिकांच्य संघटनेचेअध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी केला आहे. ग्रामीण भागाला मोठा आधार असलेलाहा उद्योग शासनाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही बकरे यांनीकेली आहे.प्रश्न- पर्यटन क्षेत्राच्या सद्यस्थिती विषयी काय सांगाल?बकरे - देशाच्या अथर्कारणात नव्हे तर जीडीपीत देखील महत्वाचा वाटाअसलेल्या या पर्यटन आणि हॉस्पीटीलीटी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे.पर्यटन हा मुळातच अत्यावश्यक सेवेचा भाग नाही, असे मानले गेल्यानेलॉकडाऊनचा सर्वात पहिला फटका याच व्यवसायाला बसला. पंतप्रधानांनी देशातीलउद्योग व्यवसाय सावरण्यासाठी २०लाख कोटी रूपयांचे पॅकेज दिले मात्र,त्यात पर्यटन क्षेत्राचा कोठेही समावेश नाही. एकंदरच शासनाच्यादृष्टीकोनातून पर्यटन क्षेत्र सर्वाधिक दुर्लक्षीत आहे.प्रश्न- पर्यटनामुळे कोरोनाची भीती व्यक्त केली जाते...बकरे- आज पर्यटन क्षेत्राला अधिकृत परवानगी नसतानाही नागरीक लहान मोठ्या ट्रीप काढतच आहेत. त्यात नियमांचे पालन होईलच हे कसे गृहीत धरले जाते? पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास नागरीकांबरोबरच व्यवसायिक काळजी घेतील आणि सुरक्षा नियमांचे पालन देखील करतील. परंतु हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायाला पूणर्त: परवानगी द्यायला हवी. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी देखील केली आहे. परंतु उपयोगझालेला नाही.प्रश्न- शासनाने नेमके काय करावे असे वाटते?बकरे- पर्यटन व्यवसाय हा एजंटस पुरता मर्यादीत नाहीत. शेकडो उद्योगत्यावर अवलंबून आहेत. आज ग्रामीण भागात एखाद्या वनपर्यटनाला गेलेतरीतेथील किरकोळ खाद्य पदार्थ विकणाऱ्यांची, धार्मिक पर्यटन असेल तर फुलमाळा, पुजेचे साहित्य विकणाºयांची गुजराण पर्यटकांवर होते हे लक्षातघेतले पाहिजे. दुसरा टोकाचा विचार केला तर देश- विदेशातील पर्यटकांमुळेविदेशी चलन देखील मिळते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किमानसरकारी कमर्चाºयांच्या एलटीएमुळे तरी पर्यटन वाढेल अशी अपेक्षा होती.मात्र शासनाने त्यांना पर्यटनाऐवजी अन्य खर्चाचा विकल्प दिला आहे,अशामारक धोरणामुंळे पर्यटन क्षेत्र कसे टिकेल याचा विचार केला पाहिजे. मिशेनबिगेन मध्ये अन्य उद्योग आणि व्यवसायांबरोबरच पर्यटन वाढले पाहिजे, याकडेलक्ष पुरवण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक