शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा मिळणार कधी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 18:02 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा होईल अशी विचारणा केली जात आहे.

ठळक मुद्देदिवसा उन्हाचे चटके अन‌् रात्री थंडी घेऊन बळीराजांच्या मेहनतीवर पाणी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा होईल अशी विचारणा केली जात आहे. 

दिंडोरी तालुक्यात सध्या गहू, हरभरा तसेच कांदा लागवड चालू असल्यामुळे बळीराजाची धावपळ चालू असताना महावितरण कंपनीने कृषीपंपांना रात्रीचा वीजपुरवठा करून शेतकऱ्यांची गैरसोय केली आहे. त्यात रात्री विजेचा बिघाड झाल्यास तो दिवसही वाया जातो. त्याप्रमाणे ट्रान्स्फॉर्मरवर डीओ व फ्यूज वारंवार जात असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात कायमच अडथळे निर्माण होत आहेत.तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्यांची दखल वनविभाग घेत नाही, त्यात सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे शेतकरी वर्गापुढे मोठे संकट आहे. रात्री पिकाला पाणी दिले नाही. तर पीक वाया जाण्याची भीती आणि रात्री बाहेर निघायचे तर बिबट्याची भीती असे दुहेरी संकट बळीराजापुढे उभे राहिले आहे.सध्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना तीन दिवस दिवसा, तर चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहे. संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीने ठप्प असताना आजही शेतकरी आपल्या शेतात राबत आहे. याची दखल कुठे तरी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.दिवसाही शेतात काम करायचे व रात्री पिकांना पाणी द्यायचे त्यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन अनेकांना व्याधींनी त्याला ग्रस्त केले आहे. अशी परिस्थिती असताना बळीराजाला कुणी वाली राहिलेला नाही, अशा स्वरूपाच्या तीव्र प्रतिक्रिया सध्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज