शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा मिळणार कधी...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 18:02 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा होईल अशी विचारणा केली जात आहे.

ठळक मुद्देदिवसा उन्हाचे चटके अन‌् रात्री थंडी घेऊन बळीराजांच्या मेहनतीवर पाणी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या महावितरण कंपनीकडून बऱ्याच वीज उपकेंद्रामधून शेतीसाठी रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दिवसा कधी वीजपुरवठा होईल अशी विचारणा केली जात आहे. 

दिंडोरी तालुक्यात सध्या गहू, हरभरा तसेच कांदा लागवड चालू असल्यामुळे बळीराजाची धावपळ चालू असताना महावितरण कंपनीने कृषीपंपांना रात्रीचा वीजपुरवठा करून शेतकऱ्यांची गैरसोय केली आहे. त्यात रात्री विजेचा बिघाड झाल्यास तो दिवसही वाया जातो. त्याप्रमाणे ट्रान्स्फॉर्मरवर डीओ व फ्यूज वारंवार जात असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यात कायमच अडथळे निर्माण होत आहेत.तालुक्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्यांची दखल वनविभाग घेत नाही, त्यात सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे शेतकरी वर्गापुढे मोठे संकट आहे. रात्री पिकाला पाणी दिले नाही. तर पीक वाया जाण्याची भीती आणि रात्री बाहेर निघायचे तर बिबट्याची भीती असे दुहेरी संकट बळीराजापुढे उभे राहिले आहे.सध्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना तीन दिवस दिवसा, तर चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहे. संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीने ठप्प असताना आजही शेतकरी आपल्या शेतात राबत आहे. याची दखल कुठे तरी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे.दिवसाही शेतात काम करायचे व रात्री पिकांना पाणी द्यायचे त्यामुळे शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन अनेकांना व्याधींनी त्याला ग्रस्त केले आहे. अशी परिस्थिती असताना बळीराजाला कुणी वाली राहिलेला नाही, अशा स्वरूपाच्या तीव्र प्रतिक्रिया सध्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज